अयोध्येत श्रीराम तर बिहारमध्ये सीताधाम, अमित शाहंनी केली पायाभरणी

सीतामढी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील देवी सीतेच्या पवित्र जन्मस्थळी पुनौरा धाम मंदिराची पायाभरणी केली. नव्या मंदिराला माँ जानकी मंदिर असे नाव दिले जाणार आहे. शुक्रवार ८ ऑगस्ट रोजी दुपारी मंदिरासाठी पायाभरणीचा विधी झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार याप्रसंगी उपस्थित होते. सीतेचे मंदिर २०२८ मध्ये पूर्ण होईल.



पुनौरा धाम येथे झालेल्या कार्यक्रमात अमित शाह यांनी मंत्रोच्चारात माँ जानकी मंदिराची पायाभरणी केली. नितीश कुमार यांच्याव्यतिरिक्त उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी याप्रसंगी उपस्थित होते. अमित शाह यांनी शंखनादानंतर आरती पण केली. अयोध्या-काशी, मिथिला येथून आलेल्या पुजाऱ्यांनी मंत्रोच्चार केले. अमित शाह यांनी पूजा केली.

बिहारमध्ये काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधी सीतेच्या मंदिरासाठी पायाभरणी झाली. याआधी २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन झाले होते. पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले होते. याप्रसंगी हजारो मान्यवर आणि सेलिब्रेटी उपस्थित होते.

सीतेच्या मंदिरामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. विरोधक सनातन संस्कृतीपासून दुरावले आहेत. पण आम्ही आजही सनातन संस्कृतीनुसार वागत आहोत. ऋषी-संत, देवतांबद्दल आमच्या मनातील भावना सर्वांना माहिती आहे. शिवाय सीतेच्या मंदिरामुळे बिहारमधील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे बिहार भाजपच्या नेत्यांनी सांगितले.

मा जानकीचे जन्मस्थान असलेले पुनौरा धाम हे सीतामढी जिल्ह्यातील पुनौरा गावात आहे. दरवर्षी धार्मिक प्रसंगी येथे मोठ्या संख्येने भाविक पूजा करण्यासाठी येतात. यावर्षी, राज्य सरकारने अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या धर्तीवर पुनौरा धाममधील श्री जानकी जन्मभूमी, पुनौरा धाम मंदिर संकुलाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेला आकार देण्यासाठी, मंदिर संकुलाच्या आसपास ५० एकर जमीन संपादित केली जात आहे. या प्रसंगी, अमित शाह सीतामढी ते दिल्ली या अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील, ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवित्र ठिकाणी येणाऱ्या भाविकांना चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी मंजुरी दिली होती.

श्री जानकी जन्मभूमी, पुनौरा धाम मंदिराचे सुरळीत आणि प्रभावी कामकाज आणि व्यवस्थापन करण्यासाठी, बिहारच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विश्वस्त समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. अधिग्रहित जमिनीवर आणि धार्मिक विश्वस्त मंडळाच्या नियंत्रणाखाली असलेल्या जमिनीवर राज्य सरकारने एकूण ८८२,८७,००,००० रुपयांची योजना मंजूर केली आहे. ही योजना पर्यटन विभागामार्फत राबविली जात आहे. या प्रकल्पांतर्गत, भूसंपादन, मंदिर विकास, सीताकुंडचा विकास आणि पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल.

 
Comments
Add Comment

Vijay and Sangeetha Divorce : 'थलापती' विजय यांच्या संसाराचे वादळ शमले; पत्नी संगीता यांनी घटस्फोटाचा अर्ज घेतला मागे

तामिळनाडू : अभिनेते तथा तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या पत्नी संगीता यांनी दाखल केलेला

Kiren Rijiju Statement on Amit Shah : 'ज्या दिवशी अमित शाह उत्तर देतील, ते तुम्हाला ऐकताही येणार नाही!' किरेन रिजिजूंचा विरोधकांवर हल्लाबोल

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या जोरदार गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही

Redmi Note 17 5G Launched : Redmi Note 17 5G भारतात लाँच; ८०००mAh ची तगडी बॅटरी अन् ५०MP कॅमेरा, पाहा किमतीसह सर्व फीचर्स!

नवी दिल्ली : प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी शाओमीने (Xiaomi) आपल्या लोकप्रिय रेडमी नोट सिरीजचा विस्तार करत भारतीय बाजारात

Kochi Flight Emergency Door News : कोचीमध्ये विमानाचे इमर्जन्सी डोअर उघडण्याचा प्रयत्न; प्रवाशांमध्ये घबराट, केरळमधील तरुणाला अटक!

कोची : मलेशियाची राजधानी कुआलालंपूरहून केरळच्या कोची शहराकडे येणाऱ्या विमानात बुधवारी रात्री एका प्रवाशाच्या

IRCTC Japan Tour Package : IRCTC ची भन्नाट ऑफर : दिल्ली ते जपान १० दिवसांची मस्त सफर; टोकियो, ओसाका अन् हिरोशिमा फिरण्याची संधी!

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या 'इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन'ने (IRCTC) परदेशात

Assam Crime News : आसाम हादरले! १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; विटांनी ठेचून अत्यंत निघृण हत्या

हैलाकांडी : ईशान्य भारतातील आसाम (Assam) राज्यामधून एका अत्यंत भयानक आणि सुन्न करणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून