अयोध्येत श्रीराम तर बिहारमध्ये सीताधाम, अमित शाहंनी केली पायाभरणी

सीतामढी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील देवी सीतेच्या पवित्र जन्मस्थळी पुनौरा धाम मंदिराची पायाभरणी केली. नव्या मंदिराला माँ जानकी मंदिर असे नाव दिले जाणार आहे. शुक्रवार ८ ऑगस्ट रोजी दुपारी मंदिरासाठी पायाभरणीचा विधी झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार याप्रसंगी उपस्थित होते. सीतेचे मंदिर २०२८ मध्ये पूर्ण होईल.



पुनौरा धाम येथे झालेल्या कार्यक्रमात अमित शाह यांनी मंत्रोच्चारात माँ जानकी मंदिराची पायाभरणी केली. नितीश कुमार यांच्याव्यतिरिक्त उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी याप्रसंगी उपस्थित होते. अमित शाह यांनी शंखनादानंतर आरती पण केली. अयोध्या-काशी, मिथिला येथून आलेल्या पुजाऱ्यांनी मंत्रोच्चार केले. अमित शाह यांनी पूजा केली.

बिहारमध्ये काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधी सीतेच्या मंदिरासाठी पायाभरणी झाली. याआधी २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन झाले होते. पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले होते. याप्रसंगी हजारो मान्यवर आणि सेलिब्रेटी उपस्थित होते.

सीतेच्या मंदिरामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. विरोधक सनातन संस्कृतीपासून दुरावले आहेत. पण आम्ही आजही सनातन संस्कृतीनुसार वागत आहोत. ऋषी-संत, देवतांबद्दल आमच्या मनातील भावना सर्वांना माहिती आहे. शिवाय सीतेच्या मंदिरामुळे बिहारमधील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे बिहार भाजपच्या नेत्यांनी सांगितले.

मा जानकीचे जन्मस्थान असलेले पुनौरा धाम हे सीतामढी जिल्ह्यातील पुनौरा गावात आहे. दरवर्षी धार्मिक प्रसंगी येथे मोठ्या संख्येने भाविक पूजा करण्यासाठी येतात. यावर्षी, राज्य सरकारने अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या धर्तीवर पुनौरा धाममधील श्री जानकी जन्मभूमी, पुनौरा धाम मंदिर संकुलाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेला आकार देण्यासाठी, मंदिर संकुलाच्या आसपास ५० एकर जमीन संपादित केली जात आहे. या प्रसंगी, अमित शाह सीतामढी ते दिल्ली या अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील, ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवित्र ठिकाणी येणाऱ्या भाविकांना चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी मंजुरी दिली होती.

श्री जानकी जन्मभूमी, पुनौरा धाम मंदिराचे सुरळीत आणि प्रभावी कामकाज आणि व्यवस्थापन करण्यासाठी, बिहारच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विश्वस्त समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. अधिग्रहित जमिनीवर आणि धार्मिक विश्वस्त मंडळाच्या नियंत्रणाखाली असलेल्या जमिनीवर राज्य सरकारने एकूण ८८२,८७,००,००० रुपयांची योजना मंजूर केली आहे. ही योजना पर्यटन विभागामार्फत राबविली जात आहे. या प्रकल्पांतर्गत, भूसंपादन, मंदिर विकास, सीताकुंडचा विकास आणि पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल.

 
Comments
Add Comment

Kailash Mansarovar Yatra 2026 : 'कैलास मानसरोवर यात्रेत व्हिसाशिवाय प्रवास टाळा'; परराष्ट्र मंत्रालयकडून भाविकांसाठी अॅडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झालेल्या कैलास मानसरोवर यात्रेबाबत (Kailash Mansarovar Yatra 2026)

UPSC Recruitment 2026 : केंद्र सरकारमध्ये १०५ पदांसाठी थेट भरती; कधी पर्यंत कराल अर्ज?

नवी दिल्ली : केंद्र सरकारमध्ये (Central Government) नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. युनियन पब्लिक

TET Paper Leak : ऐनवेळी टीईटीची परीक्षा रद्द! 'नीट' पाठोपाठ आता 'टीईटी' परीक्षेलाही पेपरफुटीचे ग्रहण! जाणून घ्या...

पुणे : राज्यातील लाखो डी.टी.एड (D.T.Ed) आणि बी.एड (B.Ed) धारक तरुण-तरुणींना मोठा धक्का बसला आहे. उद्या, म्हणजेच २८ जून २०२६

Crocs Styling Tips : Crocs ला स्टायलिश लुक देण्यासाठी फॉलो करा 'या' ७ टिप्स...

१. Crocs म्हणजे फक्त आरामदायी (Comfortable) Footwear (फुटवेअर) नाही! योग्य स्टाईलिंग (Styling) केल्यास Crocs तुमच्या फॅशन (Fashion) लुकला चार चाँद

UPSC : UPSCची मोठी कारवाई! AI तपासणीत परीक्षेपूर्वीच ६०० बनावट अर्ज बाद

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) २०२६ अधिक पारदर्शक (Transparent) आणि

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान