राहुल गांधींना सशर्त जामीन

चाईबासा : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना झारखंडमधील चाईबासा येथील विशेष खासदार-आमदार न्यायालयात हजर झाल्यानंतर सशर्त जामीन मिळाला. खटल्यात सहकार्य करण्याच्या अटीवर न्यायालयाने राहुल गांधींना जामीन दिला.

राहुल गांधी यांनी २८ मार्च २०१८ रोजी एका सार्वजनिक भाषणादरम्यान भाजपचे त्यावेळचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात टिप्पणी केली होती. या टिप्पणी प्रकरणी भाजप नेते प्रताप कुमार यांनी जुलै २०१८ मध्ये झारखंडच्या चाईबासा सीजेएम कोर्टात राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीला राहुल गांधी गैरहजर होते. अखेर न्यायालयाने राहुल गांधी यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढले.

चाईबासा न्यायालयाने जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांनी झारखंड उच्च न्यायालयात दाद मागितली. झारखंड उच्च न्यायालयाने राहुल गांधींना ६ ऑगस्ट रोजी चाईबासा न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. या निर्देशांचे पालन करत राहुल गांधी बुधवार ६ ऑगस्ट २०२५ रोजी झारखंडमधील चाईबासा येथील विशेष खासदार-आमदार न्यायालयात हजर झाले. यानंतर खटल्यात सहकार्य करण्याच्या अटीवर न्यायालयाने राहुल गांधींना जामीन दिला.
Comments
Add Comment

'Jag Vikram' LPG Ship : होर्मुज तणावात दिलासा; ‘जग विक्रम’ एलपीजी जहाज सुरक्षित कांडला बंदरात दाखल

होर्मुज सामुद्रधुनीत सुरू असलेल्या अमेरिकेच्या नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय एलपीजी जहाज ‘जग विक्रम’

Overloaded Vehicles : महामार्गांवर ओव्हरलोड वाहनांना बसणार दणका; २ ते ४ पट अधिक शुल्क

नवी दिल्ली : नॅशनल हायवेवर क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या वाहनचालकांना आता मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

Mangaluru News : मंगरूळमध्ये भीषण आग; निर्भवणे कुटुंबाचा संसार जळून खाक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान दुर्दैवी घटना; लाखांचे नुकसान चांदवड : एकीकडे भारतरत्न डॉ.

PM Modi Karnataka Visit : पंतप्रधान मोदींची आदिचुंचनगिरीत पवित्र भेट; श्री गुरु भैरवैक्य मंदिरात घेतलं दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच बुधवार १५ एप्रिल रोजी एका दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान

Vedanta plant in Chhattisgarh : छत्तीसगड : वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट; १४ कामगारांचा मृत्यू, १९ गंभीर जखमी

छत्तीसगड : छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील सिंहितराई स्थित वेदांता

ECOSOC India Elected : संयुक्त राष्ट्रसंघात भारताचा दबदबा! तीन जागतिक समित्यांमध्ये भारताची निवड

- २०२७-३० साठी मोठं राजनैतिक यश मुंबई : २ एप्रिल २०२६ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या इकोनॉमिक अँड सोशल कॉन्सिल कॉनशील