राहुल गांधींना सशर्त जामीन

चाईबासा : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना झारखंडमधील चाईबासा येथील विशेष खासदार-आमदार न्यायालयात हजर झाल्यानंतर सशर्त जामीन मिळाला. खटल्यात सहकार्य करण्याच्या अटीवर न्यायालयाने राहुल गांधींना जामीन दिला.

राहुल गांधी यांनी २८ मार्च २०१८ रोजी एका सार्वजनिक भाषणादरम्यान भाजपचे त्यावेळचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात टिप्पणी केली होती. या टिप्पणी प्रकरणी भाजप नेते प्रताप कुमार यांनी जुलै २०१८ मध्ये झारखंडच्या चाईबासा सीजेएम कोर्टात राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीला राहुल गांधी गैरहजर होते. अखेर न्यायालयाने राहुल गांधी यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढले.

चाईबासा न्यायालयाने जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांनी झारखंड उच्च न्यायालयात दाद मागितली. झारखंड उच्च न्यायालयाने राहुल गांधींना ६ ऑगस्ट रोजी चाईबासा न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. या निर्देशांचे पालन करत राहुल गांधी बुधवार ६ ऑगस्ट २०२५ रोजी झारखंडमधील चाईबासा येथील विशेष खासदार-आमदार न्यायालयात हजर झाले. यानंतर खटल्यात सहकार्य करण्याच्या अटीवर न्यायालयाने राहुल गांधींना जामीन दिला.
Comments
Add Comment

NTA : पेपरफुटीवर केंद्राचा 'मास्टरप्लॅन'! NTA साठी 'सुपर 6' समितीची नियुक्ती

पेपर लीकवर केंद्राचा मोठा प्रहार! दोषींना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ₹१० कोटींपर्यंत दंड; संसदेत सोमवारी

PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय'

नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त

Karnataka Politics : '२०२८ ची कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार नाही': माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Assam Factory Blast : आसाममधील रॉड मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यात भीषण स्फोट; ४ कामगारांचा मृत्यू

दिसपुर : आसाममधील कछार जिल्ह्यात रविवारी सकाळी रॉड उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यात भीषण स्फोट होऊन किमान चार

Viral Love Story : NEET आंदोलनात गेले अन् जुळली रेशीमगाठ; जंतर-मंतरवर घडली अनोखी प्रेमकहाणी

Viral Love Story : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले नीट परीक्षा गैरप्रकाराविरोधातील आंदोलन देशभर चर्चेत