ध्यास मराठीतून शिकण्याचा

  39

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर


मी १३ वीत असताना आमच्या कोकजे सरांनी नेरळ येथील वेगवेगळ्या शाळांची ओळख करून दिली. कोतवालवाडी, आनंदवाडी हे तिथले पाडे लक्षात राहिले ते तिथल्या छोट्या छोट्या मराठी शाळांमुळे! हा सगळा आदिवासी पट्टा, कर्जतमधील कोंदिवडे नि नेरळमधील जुम्मा पट्टीची आश्रम शाळा हे पुढे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय झाले. याचे कारण म्हणजे तेथील निवासी शिबिरे. छोट्या छोट्या उपक्रमांतून या भागातील शाळांशी नाते जोडले गेले होतेच, पण साधारणपणे १९९५ - ९६ पासून सलग आठ दिवसांची निवासी शिबिरे येथील माणगाववाडी आश्रम शाळेत होऊ लागली. शाळेत मुलांची संख्या तेव्हा नुकतीच कुठे वाढू लागली होती. शौचालयांची देखील सोय नव्हती पण तेथील शिक्षकांमध्ये मुलांना सतत ध्यास घेऊन घडवण्याची आस होती.

गेल्या काही वर्षांत शाळेने चांगलीच प्रगती केली. दादासाहेब गायकवाड, मुख्याध्यापक साळवी आणि इकारे सर शिक्षक चमूसोबत सतत कार्यरत आहेत.

सभागृह, मुलांच्या राहण्याची सोय, मुलांच्या आहाराची उत्तम व्यवस्था या सर्व गोष्टींमुळे शाळेत उत्तम बदल घडले आहेत. आज या शाळेत जवळपास पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संगीत, नृत्य, विविध खेळांतील नैपुण्य अशा सर्व अंगांनी मुले घडत आहेत. मुलांच्या कौशल्य विकासासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

अतिशय तुटपुंज्या आर्थिक बळासह ही मराठी शाळा मुलांना परिस्थितीशी टक्कर घ्यायला शिकवते आहे.

गेली २५ वर्षे मराठी शाळांची वाताहात मनाला अस्वस्थ करते आहे. अनेक मराठी शाळा अखेरचा श्वास मोजत आहेत. माहीम येथील महानगर पालिकेची न्यू माहीम मराठी शाळा ही धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात इमारत धोकादायक आहे की ती तशी असल्याचा बनाव करण्यात आला आहे? हा प्रश्न शाळेचे माजी विद्यार्थी आणि पालक विचारत आहेत. भांडुप हा तर अस्सल मराठमोळ्या वस्तीचा भाग. या भागातील मराठी
शाळांची पडझड मन अस्वस्थ करणारी आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर कोकणातील वैभववाडीची जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी श्रुती घोडके हिने आयआयटीची मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवून घवघवीत यश संपादन केले. ग्रामीण भागातील मुले जिद्दीने काय करू शकतात हे दाखवून दिले. मराठी माध्यमातील शिक्षणावर संशय घेणाऱ्यांना मिळालेले हे चोख उत्तर आहे.
Comments
Add Comment

हरवलेलं माणूसपण

मोरपीस: पूजा काळे स्वामी तुम्ही पाहताय ना! काळ सोकावलायं, माणसातील माणूसपण हरवत चाललयं! देवळाबाहेरच्या परिसरात

शेतकरी बांधवांना वरदान ठरणारी 'सब्जी कोठी'

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे रक्षाबंधन हा बहीण-भावांच्या नात्याचा उत्सव. भावाने बहिणीची रक्षा करावी म्हणून ती त्यास

सण आयलाय गो...

उदय खोत नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा जिव्हाळ्याचा सण. दरवर्षी दर्याराजाची पूजा करून नारळ अर्पण करून

हसरी शंभरी...

चारुहास पंडित : प्रसिद्ध व्यंगचित्रकार आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून शब्देवीण संवाद साधणारे ज्येष्ठ

सुखावणारा ऋतुगंध

तुझी माझी पहिली भेट म्हणजे मृद्गंधाचे अनमोल दरवळते अत्तर नाते तुझे नी माझे हृदयस्थ सुंदर बहरत राहते माझ्या मनी

सखी झाल्या उद्योजिका

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे मैत्री ही या जगातली एक सुंदर गोष्ट आहे. निखळ मैत्रीमुळे आयुष्य समृद्ध होतं. अशाच त्या