मुंबईचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा अखेर नगरविकास खात्याला सादर

  16

प्रभाग रचना जुन्याच पद्धतीने, पण घातली विकास आराखड्याची सांगड


मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरता सध्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. या सुधारित प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बनवण्यात आला असून त्यावर महापालिका आयुक्त आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी रात्री उशिरापर्यंत झाल्यानंतर प्रारूप आराखडा नगरविकास खात्याकडे मंगळवारी सायंकाळी सादर करण्यात आला.


यामध्ये २२७ प्रभागाचा आराखडा बनवताना त्याला २०१४-३४ विकास आराखड्याची सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रभागाचे क्षेत्रफळ वाढले जाणार आहे, पण त्यात लोकसंख्या वाढली जाण्याची शक्यता कमी दिसून येत आहे. त्यामुळे प्रभाग रचना झाली तरी त्याचा परिणाम निवडणूक आणि पर्यायाने मतदानावर होणार नसल्याची माहिती मिळत आहे.


पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात प्राप्त झालेल्या प्रचाग रचना २०२५ च्या संदर्भातील सर्व अधिकारी महापालिका आयुक्तांना प्रदान करण्यात आली. निवडणुकीकरता प्रभाग रचना ही शासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने करावयाची आहे असे नमूद केले. मुंबईतील २२७ प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना तयार करून निवडणूक आयोगाची मान्यता पालिका आयुक्त घेतील आणि या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयुक्त हे मान्यता देणार आहेत.


सन २०११च्या जनगणनेनुसार महापालिका हद्दीतील प्रगणक एकूण लोकसंख्या, अनुसूचित जातीची,जमातीची लोकसंख्या, प्रगणक गटाचे नकाशे आणि घरयादी ही जनगणना कार्यालयाकडून उपलब्ध करून केली जाणार आहे. पण प्रभागातील मतदार संख्या अथवा सध्याची रहिवाशांची संख्या विचारात घेता येणार नसून याचा प्रभाग रचनेशी कसलाही संबंध नसेल असेही नमुद केले आहे. प्रभागाची लोकसंख्या ही त्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के जास्त किंवा १० टक्के कमी अशाप्रकारे मर्यादीत ठेवत रचना करता येणार आहे, असे सांगण्यात येत होते.


परंतु या प्रभाग रचनेत महापालिकेने २०१४ चा विकास आराखडा विचारात घेतला असल्याची माहिती मिळत आहे. २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी प्रारूप विकास आराखडा. तयार करण्यात आला होता आणि सन २०१८मध्ये याला अंतिम मान्यता मिळाली.


त्यामुळे मुंबईच्या प्रभागाची रचना २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे विकास आराखडा विचारात घेऊन त्यानुसार प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये मुंबईच्या चारही बाजूंनी असलेल्या सीमा मग त्या इतर महापालिकांच्या हद्दीत पूर्वी असतील किंवा समुद्र आणि खारफुटीचा भाग असेल यांचा मुंबईच्या
हद्दीत येणारा भाग प्रभाग रचनेत ग्राह्य धरला गेला आहे.

Comments
Add Comment

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसावर खटला

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस रेल्वेत गोळीबार आणि हत्या प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले

तुकाराम मुंढेंची २३वी बदली दिव्यांग कल्याण विभागात

मुंबई  : राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त तुकाराम

Kajol Honoured With Maharashtra State Film Awards : “आईच्या साडीचा अभिमान… पुरस्कार स्विकारताना काजोल भावूक”, काजोलचं मराठी भाषण ठरलं खास आकर्षण

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला मुंबईत पार पडलेल्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात

दूध भेसळीचे प्रमाण कमी करण्यासाठी दूध स्कॅनर

मुंबई (वार्ताहर) : दूध भेसळीमुळे सर्वसामान्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे रोखण्यासाठी

सणासुदीच्या हंगामात नारळ, डाळींचे चढे दर

मुंबई (वार्ताहर) :सध्या सणांचा काळ सुरु झाल्यामुळे डाळी तसेच नारळाचा वापर धार्मिक विधी आणि नैवेद्य दाखवण्यासाठी