"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा आला आहे. या वर्षी १६ जुलै रोजी सायना नेहवालने एक पोस्ट शेअर करत पारुपल्ली कश्यपपासून ती वेगळे होत असल्याचे जाहीर केले होते. पण आता या जोडप्याने यू-टर्न घेतला आहे, सायना नेहवालने २ ऑगस्ट (शनिवार) रोजी एक पोस्ट शेअर करून सांगितले की आम्ही दोघेही पुन्हा एकत्र आलो आहोत.


सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप हे दोघं लहानपणापासूनचे चांगले मित्र आहेत, या दोघांनीही त्यांच्या बॅडमिंटन कारकीर्दमध्ये स्वतःची मोहर उमटवली. त्यानंतर या दोघांनी लग्न केले. मात्र लग्नाच्या ७ वर्षानंतर आम्ही वेगळं होत असल्याचे या जोडप्याने सोशल मीडियावर जाहीर केले होते. ज्यामुळे या जोडीचे चाहते नाराज झाले, मात्र सायना नेहवालने केलेल्या या नव्या पोस्टमुळे या जोडीचे चाहते पुन्हा एकदा सुखावले आहेत,



वेगळे होण्याच्या निर्णयापासून १७ दिवसांत घेतला यू-टर्न


सायना आणि पी. कश्यपने अवघ्या १७ दिवसांत त्यांच्या निर्णयापासून यू-टर्न घेतला आहे. सायना नेहवालने इंस्टाग्रामवर पारुपल्ली कश्यपसोबतचा फोटो शेअर केला आणि लिहिले, 'कधीकधी अंतर तुम्हाला उपस्थितीचे महत्त्व शिकवते.' 'आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत.'



 

सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांची भेट १९९७ मध्ये एका कॅम्प दरम्यान झाली. त्यानंतर दोघांनी हैदराबादमधील पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले. हळूहळू दोघांमधील जवळीक वाढत गेली. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१८ मध्ये सायना नेहवाल आणि पारुपल्ली यांचे लग्न झाले.


सायना नेहवालने पोस्ट शेअर करताच चाहते आणि सहकारी खेळाडूंनी सोशल मीडियावर तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. चाहत्यांना वाटले की जर प्रेम खरे असेल तर ते नक्कीच परत येते.



दोघांची बॅडमिंटन कारकीर्द कशी होती?


सायना नेहवालने लंडन ऑलिंपिकमध्ये (२०१२) भारतासाठी कांस्यपदक जिंकले. त्यानंतर ती २०१५ मध्ये बॅडमिंटन रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली. भारतातील महिला बॅडमिंटन खेळाडूने ही कामगिरी पहिल्यांदाच केली. दुसरीकडे, २०१० मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकून पारुपल्ली कश्यप प्रसिद्धीच्या झोतात आला. लंडन ऑलिंपिक (२०१२) मध्ये तो उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. हा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत (२०१४) पारुपल्ली कश्यपने सुवर्णपदक जिंकले.

Comments
Add Comment

India-Australia ODI XI : कमिन्सची ऑल-टाईम टीम जाहीर! रोहित-विराटला नाही स्थान; पॅट कमिन्सच्या टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका (ODI Series) १९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार

FIFA World Cup 2026 : ४८ संघ घेणार फुटबॉलच्या महासंग्राममध्ये सहभाग, या संघांनी केले क्वालिफाय

मुंबई: फिफा विश्वचषक २०२६ फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे. कारण, यावेळी प्रथमच या स्पर्धेत

वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा ऑस्ट्रेलिया ठरला पहिला संघ, बांगलादेशला केले पराभूत

मुंबई: आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेतील एका महत्त्वपूर्ण सामन्यात, ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा १० गडी राखून

अभिषेक शर्मा आणि स्मृती मानधनाला आयसीसी प्लेअर्स ऑफ द मंथ पुरस्कार

दुबई : भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा आणि स्मृती मानधना यांनी सप्टेंबर २०२५ साठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार

WTC Time Table : पाकिस्तानच्या विजयाने टीम इंडियाला फटका, पाहा कोण आहे अव्वल

नवी दिल्ली: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२०२७ च्या गुणतालिकेत एक महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. पाकिस्तान

IND vs AUS: इंग्लंड, वेस्ट इंडिजनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलची खरी परीक्षा

मुंबई: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. इंग्लंड आणि वेस्ट