नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात भारताच्या नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली आहे. आकाशदीपने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ९४ चेंडूत १२ चौकार मारत ६६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि आकाशदीप या दोघांच्या अर्धशतकांमुळे भारताची बाजू मजबूत झाली.



साई सुदर्शन बाद झाल्यावर शुभमन गिल फलंदाजीसाठी येणे अपेक्षित होते. पण नाईट वॉचमन म्हणून आकाशदीप मैदानात आला. आकाशदीप थोडा वेळ चेंडू तटवणार आणि वेळ काढणार असेच अनेकांना वाटत होते. प्रत्यक्षात आकाशदीपने चौकार मारत धावा वेगाने वाढवल्या. यशस्वी जयस्वाल सावध खेळी करत असताना आकाशदीप आक्रमकपणे खेळत होता. त्याने वेगाने अर्धशतक साकार केले.

नाईट वॉचमन म्हणजे केवळ काही चेंडू खेळून वेळ घालवणे आणि जमल्यास धावा वाढवणे ही कसोटी क्रिकेटमधील प्रचलित संकल्पना आहे. अनेकदा दिवस संपण्याच्या सुमारास अथवा उपहाराची वेळ जवळ आली असताना महत्त्वाच्या फलंदाजावर दबाव येऊ नये म्हणून एखादा फलंदाज बाद झाल्यावर नाईट वॉचमन म्हणून एखाद्या फलंदाजाला पुढे करतात. हा साधारपणे मुख्य फलंदाज नसतो. याच दृष्टीने इंग्लंडने आकाशदीपकडे बघितले आणि त्याला लवकर बाद करुन भारतावरील दबाव वाढवण्याचे नियोजन सुरू केले. प्रत्यक्षात आकाशदीपच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडच्या खेळाडूंवरील दबाव वाढला. आकाशदीपच्या खेळीमुळे भारताला १५० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत झाली.
Comments
Add Comment

अभिषेक शर्माने रचला इतिहास! ICC T20I फलंदाजी क्रमवारीत आजवरचे सर्वोच्च रेटिंग

नवी दिल्ली: भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)

IND vs WI: भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला धक्का!

अहमदाबाद: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला

ICC Womens World Cup : भारतीय संघाची विजयी सलामी

गुवाहाटी : भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात शानदार पद्धतीने केली. पहिल्या सामन्यात

ICC Womens cricket world cup : दीप्ती-अमनजोतची दमदार अर्धशतके; श्रीलंकेसमोर २७० धावांचे आव्हान

गुवाहाटी: आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२५ (ICC Women's ODI World Cup 2025) च्या पहिल्याच सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेसमोर २७०

आशिया कप ट्रॉफी वादावर बीसीसीआय आक्रमक! विजेत्या संघाला ट्रॉफी का दिली नाही? नक्वींना राजीव शुक्लांचा थेट सवाल

दुबई: आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावले असले तरी, पारितोषिक

ICC Womens Cricket World Cup 2025: आता वर्ल्डकपमध्ये आमनेसामने येणार भारत-पाकिस्तान

कोलंबो: क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आणि रोमांचक बातमी आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ (ICC Women's ODI World Cup 2025)