नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

  37

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात भारताच्या नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली आहे. आकाशदीपने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ९४ चेंडूत १२ चौकार मारत ६६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि आकाशदीप या दोघांच्या अर्धशतकांमुळे भारताची बाजू मजबूत झाली.



साई सुदर्शन बाद झाल्यावर शुभमन गिल फलंदाजीसाठी येणे अपेक्षित होते. पण नाईट वॉचमन म्हणून आकाशदीप मैदानात आला. आकाशदीप थोडा वेळ चेंडू तटवणार आणि वेळ काढणार असेच अनेकांना वाटत होते. प्रत्यक्षात आकाशदीपने चौकार मारत धावा वेगाने वाढवल्या. यशस्वी जयस्वाल सावध खेळी करत असताना आकाशदीप आक्रमकपणे खेळत होता. त्याने वेगाने अर्धशतक साकार केले.

नाईट वॉचमन म्हणजे केवळ काही चेंडू खेळून वेळ घालवणे आणि जमल्यास धावा वाढवणे ही कसोटी क्रिकेटमधील प्रचलित संकल्पना आहे. अनेकदा दिवस संपण्याच्या सुमारास अथवा उपहाराची वेळ जवळ आली असताना महत्त्वाच्या फलंदाजावर दबाव येऊ नये म्हणून एखादा फलंदाज बाद झाल्यावर नाईट वॉचमन म्हणून एखाद्या फलंदाजाला पुढे करतात. हा साधारपणे मुख्य फलंदाज नसतो. याच दृष्टीने इंग्लंडने आकाशदीपकडे बघितले आणि त्याला लवकर बाद करुन भारतावरील दबाव वाढवण्याचे नियोजन सुरू केले. प्रत्यक्षात आकाशदीपच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडच्या खेळाडूंवरील दबाव वाढला. आकाशदीपच्या खेळीमुळे भारताला १५० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत झाली.
Comments
Add Comment

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

IND vs ENG : भारताच्या गोलंदाजांचा भेदक मारा, इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर संपुष्टात

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर

IND vs ENG: ज्यो रूट आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यात मैदानातच जोरदार बाचाबाची!

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यातील आज दुसऱ्या दिवशीओव्हल क्रिकेट मैदानावर एक मोठा

केनिंग्टन ओव्हल कसोटीत भारताचा पहिला डाव 'एवढ्या' धावांत आटोपला

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये

दुखापतीमुळे ख्रिस वोक्स पाचव्या कसोटीतून बाहेर

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये

आयुष्याला थकलो होतो, आत्महत्या करावीशी वाटत होती...धनश्रीसोबत घटस्फोटावर युझवेंद्र चहलचे विधान

मुंबई: भारताचा क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या वर्षी मार्चमध्ये घटस्फोट झाला होता. आता चहलने धनश्री