Saturday, August 2, 2025

कोल्हापूरकरांच्या गेल्या ४० वर्षांच्या लढ्याला अखेर यश, मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत दिली माहिती, काय ते वाचा....

कोल्हापूरकरांच्या गेल्या ४० वर्षांच्या लढ्याला अखेर यश, मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत दिली माहिती, काय ते वाचा....

कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच


कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून येत्या १८ ऑगस्टपासून त्याचं काम सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींकडून १ ऑगस्ट रोजी याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामुळे कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांच्या ४० वर्षांच्या लढ्याला यश मिळालं आहे. याबद्दलची माहिती मुख्यमंत्री देवेंद्रा फडणवीस यांनी एक्सद्वारे (ट्विट) दिली असून, त्याबद्दल आनंद देखील व्यक्त केला आहे. (Circuit Bench of Kolhapur High Court)



काय म्हणाले मुख्यमंत्री?


कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यात आलं असून, गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे ही मागणी अनेक वर्षांपासून मागणी होती. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार होता. परंतु याचा निर्णय होत नव्हता. मात्र अखेर मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. याबाबतचे राजपत्र सुद्धा प्रकाशित करण्यात आले असून, याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे कळवली आहे.





ते म्हणाले, "मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था (सर्किट बेंच) उपलब्ध करुन दिली आहे. याबाबतचे राजपत्र सुद्धा प्रकाशित करण्यात आले असून, १८ ऑगस्ट २०२५ पासून ते कार्यान्वित होईल. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ६ जिल्ह्यांसाठी ही व्यवस्था असेल.


या भागातील नागरिकांची ही फार जुनी मागणी होती. अनेक वर्ष हा लढा चालला. सातत्याने ते यासाठी मला भेटायचे. पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तेव्हापासून यासाठी पाठपुरावा सुरु केला होता. अखेर त्याला यश आले. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोवा असे तीन खंडपीठ होतेच. त्याला आता या सर्किट बेंचची जोड असणार आहे.


भारताचे सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवई जी, महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश मा. आलोक आराधे जी यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. न्यायदानाचे कार्य अधिक गतिमान होण्यास यामुळे निश्चितपणे मोठी मदत होईल. शिवाय नागरिकांचा वेळ, श्रम, पैसा याचीही यामुळे बचत होणार आहे.


परिसरातील नागरिक, वकिलांचेही मन:पूर्वक अभिनंदन!


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा