मे महिन्यात लग्न झालेल्या नवविवाहित दाम्पत्याने चिपळूणमध्ये आत्महत्या का केली?

रत्नागिरी : चिपळूण शहरातील गांधारेश्वर पुलावरून दोन दिवसांपूर्वी नदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या नवविवाहित दाम्पत्यापैकी पत्नी अश्विनी अहिरे यांचा मृतदेह आढळून आला. मात्र पती नीलेश अहिरे याचा शोध अद्याप सुरू आहे.


मूळचे धुळे जिल्ह्यातील साक्री येथील रहिवासी असलेले नीलेश अहिरे शिक्षणासाठी चिपळूणमध्ये आले होते. डीबीजे महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मोबाइल दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले आणि बसस्थानकाजवळ स्वतःची मोबाइल शॉपी सुरू केली. मृदू स्वभाव, सचोटी आणि मेहनतीमुळे त्यांनी व्यवसायात चांगली प्रगती केली होती. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत त्यांनी नातेवाइकांच्या घरातून बाहेर पडून तीन-चार वर्षे स्वतंत्रपणे भाड्याच्या खोलीत वास्तव्य केले.



गेल्या ८ मे २०२५ रोजी नीलेशचा अश्विनीसोबत विवाह झाला. विवाहानंतर दोघेही नव्या आयुष्याची सुरुवात करत होते. पर्यटनस्थळांना भेटी, कुटुंबीयांचे भेटीगाठी अशा आनंदाच्या क्षणांनी त्यांच्या संसाराला सुरुवात झाली होती. काही दिवसांपूर्वी अश्विनीचा वाढदिवसही साजरा करण्यात आला होता. तिच्या आई आणि मामाही काही दिवस त्यांच्या घरी मुक्कामी होते. सर्व काही सुरळित सुरू असतानाच बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या दोघांनी गांधारेश्वर पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेत आत्महत्या केली.


बुधवारी सकाळी ते दोघेही मोटरसायकल घेऊन चिपळूणमधील गांधारेश्वर पुलावर आले. त्याठिकाणी दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर पुन्हा ते दोघे मोटरसायकल घेऊन पुढे निघून गेले. काही वेळाने ते पुन्हा पुलावर आले. अश्विनी आणि नीलेशने एकाच वेळी पुलावरून नदीपात्रात उडी मारल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांनी असे टोकाचे पाऊल का उचलले, याचं नेमकं कारण स्पष्ट झालेले नाही.


या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस, एनडीआरएफ पथक, स्थानिक प्रशासन आणि नातेवाईकांनी शोधमोहीम सुरू केली. अश्विनी अहिरे यांचा मृतदेह आढळून आला असून नीलेश यांचा शोध अद्याप सुरू आहे. दाभोळ खाडी परिसरातील गावांमध्ये सतर्कतेसाठी सूचना देण्यात आल्या असून बोटीच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू आहे.


या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नातेवाईक, परिचित आणि नागरिकांत या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे.

Comments
Add Comment

कोस्टल रोड- मार्वे रोड जोडणाऱ्या मार्गावरील पुलांच्या बांधकामाला आता गती, मागवल्या तब्बल २२०० कोटी रुपयांच्या निविदा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड मार्वे रोडशी जोडणारे नवीन मार्ग आणि

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द

मुंबई : राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के दरवाढ रद्द

यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर, सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनियन पब्लिक सर्व्हिसेस अर्थात यूपीएससीअंतर्गत येणाऱ्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस

शिंदेंचं एक पाऊल मागे! निवडणुकीत शिवसेना धाकटा भाऊ होणार, शिंदेंना कमी जागा मिळणार?

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डावपेच आणि रणनीतीमुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा बॅकफूटवर गेलेत.

Airbus, Tata Advanced System लिमिटेडने एका नवीन युगाची सुरवात केली: कर्नाटकातून पहिले 'मेड इन इंडिया' H125 हेलिकॉप्टर उड्डाण करणार

नवी दिल्ली: एअरबस H125 हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) द्वारे स्थापन करण्यात

एकनाथ खडसेंच्या जावयाची तुरुंगातून सुटका, ड्रग्स प्रकरणात क्लीन चीट

पुणे (प्रतिनिधी) : पुणे शहरातील खराडी येथे झालेल्या कथित ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रांजल