दुखापतीमुळे ख्रिस वोक्स पाचव्या कसोटीतून बाहेर

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये सुरू आहे. याच सामन्यात पहिल्या दिवशी भारताविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना ख्रिस वोक्सला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे ख्रिस वोक्स पाचव्या कसोटीतून बाहेर पडला आहे. तो खेळण्याची शक्यता मावळली आहे.

सामन्याच्या पहिल्या दिवशी ख्रिस वोक्सच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. या दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागणार असल्यामुळे ख्रिस वोक्स पाचव्या कसोटीत पुढे खेळणार नाही, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केले आहे. भारताच्या पहिल्या डावातील ५७ व्या षटकात क्षेत्ररक्षण करताना वोक्सला दुखापत झाली. त्याने मिड-ऑफमधून चेंडूचा पाठलाग केला आणि चेंडू अडवण्यासाठी उडी मारली. ही उडी चुकली आणि त्याच्या डाव्या खांद्याला जबर मार लागला. डाव्या खांद्याला दुखापत झाली.

बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स यांच्या अनुपस्थितीत जोश टंग, गस अ‍ॅटकिन्सन आणि जेमी ओव्हरटन यांच्या खांद्यांवर इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीची धुरा आहे. वोक्सने भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १८१ षटके टाकली आणि ११ बळी घेतले.
Comments
Add Comment

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी