रायगड पोलिसांनी केला ‘डिजीटल अरेस्ट’ रॅकेटचा पर्दाफाश

३५ मोबाईलसह ६१७५ सिमकार्ड जप्त, ११ आरोपींना अटक


अलिबाग : वयोवृद्ध नागरिकांना फसवण्यासाठी ‘डिजीटल अरेस्ट’च्या नावाखाली सुरू असलेल्या अत्याधुनिक सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश करत रायगड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या गुन्ह्याच्या तपासात एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ६६ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक उघड झाली आहे. आरोपींनी टेलिकॉम कंपन्यांच्या एसआयपी लाईन्सचा गैरवापर करत, बनावट कागदपत्रांद्वारे देशभरातील नागरिकांना फसवले. हे आरोपी विविध बनावट कंपन्यांच्या नावावर नागरिकांना बनवताना आढळले असून, त्यांच्या कब्जातून तब्बल ६१७५ सिमकार्ड्स, ३५ मोबाईल फोन, लॅपटॉप, स्टँप, रोकड व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.


ही कारवाई २३ मे २०२५ रोजी दाखल तक्रारीच्या अनुषंगाने सुरू करण्यात आली होती. आरोपींनी बनावट कंपन्या उघडून त्याद्वारे लोकांकडून कर्ज, ऑनलाइन नोकऱ्या, इन्व्हेस्टमेंट, स्कॉलरशिप आदींच्या आमिषाने लाखो रुपये उकळले. यात वापरलेले मोबाइल नंबर, सिमकार्ड्स, SIP LINE, आणि बनावट कागदपत्रे हे सर्व देशभरात सक्रिय असलेल्या संगठित सायबर टोळीचे पुरावे म्हणून समोर आले आहेत. या कारवाईत ३५ मोबाईल फोन्स, ४ रबर स्टँप, १ अमेझॉन कंपनीचा टॅब, १ डेल कंपनीचा लॅपटॉप, १ सोनी कंपनीचा डीपीएन स्वीच पोर्ट, १ पी.ओ.ई. स्विच, १ बँक पासबुक, कॅनरा बँक एटीएम, रोख रक्कम ६.६ लाख रुपये, ६ हजार १७५ सिम कार्डस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.



११ अटक आरोपींमध्ये अब्दुस सलाम बारभुयान, बिलाल फैजान अहमद, नदीम महमद अस्लम अहमद, लारैब मोहम्मद रफीक खान, शादान येतात अहमद खान, मोहम्मद फैसल सैराउद्दीन खान, बलमोरी विनयकुमार राव, गंगाधर गंगाराम मूटटन, अमन संतराम प्रकाश मिश्रा, मोहसिन मियां खान आणि शम्स ताहीर खान यांचा समावेश आहे. या टोळीचा प्रमुख आरोपी आदित्य उर्फ अभय मिश्रा उत्तर प्रदेशातील असून, तो ऑनलाईन स्कॉलरशिप व नोकरीच्या आमिषाने लोकांकडून पैसे उकळत होता. तो भारत, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आदी देशांतील नागरिकांशी संपर्क साधून फसवणूक करत असे.


नागरिकांनी सतर्क राहावे, कोणत्याही अपरिचित व्यक्तीकडून आलेल्या कॉल/संदेश/ई-मेलवर विश्वास ठेवू नये. सायबर फसवणूक झाल्यास सायबर हेल्पलाईन १९३०, १९४५ किंवा १४४०७ वर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधिक्षक आँचल दलाल यांनी केले आहे.

Comments
Add Comment

रस्त्यांच्या नियमित स्वच्छतेसाठी रस्ते दत्तक उपक्रम महापालिका राबवणार, कनिष्ठ पर्यवेक्षकांवर दोन ते तीन रस्त्यांची जबाबदारी सोपवणार

मुंबई :  मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्यांची समस्या निकालात काढण्यासाठी महापालिकेने रस्ते अभियंता

पुण्यात गोळीबार, एकाचा मृत्यू; पोलीस तपास सुरू

पुणे : कोंढवा परिसरात झालेल्या गोळीबारात गणेश काळे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. गणेश काळे हा आंदेकर टोळीशी

मोठी बातमी: सगळ्या करदात्यांना मोठा दिलासा आयटीआर रिटर्न भरण्यासाठी आयकर विभागाकडून मुदतवाढ! 

प्रतिनिधी:आयकर भरणाऱ्या करदात्यांना मोठा दिलासा सीबीडीटी विभागाने दिला आहे. माहितीनुसार, सीबीडीटी विभागाने (Central

जीएसटी कलेक्शन सुसाट ! ऑक्टोबर महिन्यात थेट ४.६% वाढले, अर्थमंत्रालयाकडून आकडेवारी प्रकाशित

प्रतिनिधी:केंद्रीय वित्त मंत्रालयाने जीएसटी संकलनाची (GST Collection) आकडेवारी जाहीर केली. त्या माहिती आधारे, अधिकृत

मुंबईत कोणी घर देत का घर? ऑक्टोबरमध्ये १४% घट होऊनही मुंबईतील मालमत्ता नोंदणी ११००० पेक्षा अधिक वाढ

मध्यमवर्गाकडून वाढलेली मागणी, सर्वाधिक मागणी पश्चिम उपनगरात प्रतिनिधी: नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार,

Urban Company Q2FY26 Results: आयपीओनंतर प्रथमच तिमाहीत निकालात अर्बन कंपनीचा जलवा ! मात्र निव्वळ तोटा वाढला 'या' कारणामुळे

मोहित सोमण:  नुकत्याच आलेल्या आयपीओनंतर प्रथमच अर्बन कंपनी लिमिटेडने (Urban Company Limited) आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे.