Saturday, August 2, 2025

केळीच्या बागांत राहणाऱ्या वाघांना ओळख देण्यात वनविभागाचे अपयश

केळीच्या बागांत राहणाऱ्या वाघांना ओळख देण्यात वनविभागाचे अपयश

अनेर - मेळघाट काॅरीडॉर प्रकल्प प्रलंबितच…


विजय पाठक


जळगाव : जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने वन्यजीव संरक्षण संस्था आणि वनविभागाच्या वतीने जागतिक व्याघ्र दिन २९ जुलैला साजरा करण्यात आला असला तरी मुक्ताईनगर, रावेर तालुक्यात केळीच्या बागात राहणाऱ्या वाघांना आपली वेगळी ओळख देण्यात वनविभाग कमी पडले. अनेर मेळघाट कॉरिडॉर प्रकल्प १२ वर्षांपासून प्रलंबित असून यात वन खात्याची उदासीनता दिसून येते.


मुक्ताई-भवानी अभयारण्याची घोषणा चार वर्षांपूर्वी झाली असली तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत वनविभागाकडून पावले उचलली गेली नाहीत. या पार्श्वभूमीवर आज जळगाव आणि यावल वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीस जंगल वाचवा वाघ वाचवा घोषणा देत जळगाव येथून उत्साहात सुरुवात झाली.


उप वनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या दोन दिवसांच्या रॅलीमध्ये राज्यभरातून आलेले १०० व्याघ्रदूत आणि विवेकानंद प्रतिष्ठानचे २५ विद्यार्थी
सहभागी झाले.


रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना असून यावल वनविभागाकडून जंगल सफारीचा अनुभव देण्यात येणार आहे. नशिराबाद, भुसावळ, सावदा, फैजपूरमार्गे पाल या ठिकाणी पोहोचेल. रॅली दरम्यान वाघ वाचवा, जंगल वाचवा; असा संदेश देत विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी पथनाट्य सादर केले. जंगलाच्या प्रतिकृतीसारख्या सजवलेल्या सफारी वाहनावर उभे असलेले दोन मानवी वाघ विशेष आकर्षण ठरले.


महाराष्ट्रातील वाघ संवर्धनात जळगाव जिल्ह्याचा वाटा आहे. विशेषतः यावल प्रादेशिक वनविभागात २०११ नंतर पुन्हा वाघ दाखल झाला. मेळघाटातून वाघ वाघदऱ्या, वढोदा रेंजमार्गे स्थलांतर करून यावलच्या जंगलात येतो, हे आता सिद्ध झाले. २०२४ मध्ये ट्रॅप कॅमेऱ्यात स्पष्टपणे वाघाचे दृश्य नोंदवले गेले. २०२५ मध्ये गौताळा-ऑट्रामघाट परिसरातही अशाच प्रकारच्या वाघाच्या उपस्थितीचे दाखले मिळाले.


असे असले तरी रावेर मुक्ताईनगर तालुक्यात केळाच्या बागात प्रजननासाठी येणारे वाघ यांना संरक्षण नाही केळाच्या बोत गारवा आणि लपण्यासाठी जागा असल्याने या वाघांना बनााना टायगर संबोधले जाते.आज जिल्हयात आठ ते नउ वाघ असल्याचे व्याघ्र अभ्यासक अभय उजागरे राजेंद्र नन्नवरे सांगतात.

Comments
Add Comment