मुंबईतील 'या' भागात १४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद

मुंबई : पाली हिल जलाशयाच्या इनलेट व आऊटलेट वरील एकूण ४ झडपा (व्हॉल्व्ह) बदलण्याचे कामकाज बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. गुरुवार ३१ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत एकूण १४ तास हे काम सुरु राहणार आहे. या कालावधीत एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागांचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

अ) कामकाजाच्या दरम्यान पाणीपुरवठा खंडित -


१. पाणीपुरवठा परिक्षेत्र : हनुमान नगर, लक्ष्मी नगर युनियन पार्क मार्ग क्रमांक १ ते ४, पाली हिल आणि च्युईम गावाचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० वा.) (पाणीपुरवठा बंद राहणार)

२. पाणीपुरवठा परिक्षेत्र : नर्गिस दत्त मार्ग, पद्मश्री देव आनंद मार्ग (जिग जॅग मार्ग) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - रात्री १०.०० ते मध्यरात्री १.०० वा.) (पाणीपुरवठा बंद राहणार)

३. पंप परिक्षेत्र २ : नर्गिस दत्त मार्ग, पाली माला मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी १०.०० ते दुपारी १२.३० वा.) (पाणीपुरवठा बंद राहणार)

ब) कमी दाबाने पाणीपुरवठा -


१. पेरी परिक्षेत्र : कांतवाडी परिसराचा काही भाग, पाली नाका, पाली गावठाण, शेरली, राजन व माला गावाचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वा.) (कमी दाबाने पाणीपुरवठा)

२. खारदांडा परिक्षेत्र : खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा, च्युईम गावठाण, गझधरबंध झोपडपट्टीचा काही भाग, खार पश्चिमेचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सायंकाळी ५.३० ते रात्री १०.०० वा.) (कमी दाबाने पाणीपुरवठा)

कृपया संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, तसेच नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून - गाळून प्‍यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Comments
Add Comment

अरुण गवळी कुटुंबाला धक्क्यावर धक्के

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रणागणांत कुख्यात गुंड अरुण गवळी यांच्या दोन मुलींसह वहिनीचा पराभव झाला

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या