"आपला तो बबल्या दुसऱ्याचं कार्ट..." राम कुलकर्णी यांची विखारी टिका, रोहिणी खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई: शरद पवार गट राष्ट्रवादी पक्ष महिला अघाडी प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल यांना पुण्यात रेव्ह पार्टी करतांना पोलिसांनी रंगेहात पकडल्या नंतर रोहिणी खडसे यांची पदावरून हकालपट्टी करणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता भाजप आणि पोलिसांवरच खडसे यांचा पक्ष आरोप करत असल्याचे दिसून येत आहे. ज्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून विखारी टीका केली.


महायुती सरकारला विरोध करायचा आणि खडसे बापलेकीला समर्थन द्यायचे म्हणून शरद पवार गटाचे व उबाठाचे नेते काहीही बोलत सुटले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करताना राम कुलकर्णी यांनी सुप्रिया सुळे, रोहित पवार यांबरोबरच शरद पवार राष्ट्रवादी पक्षधोरणांवर देखील प्रश्न उपस्थित केले. "जयंत पाटील पायउतार झाल्यापासून पक्षात प्रमुख भुमीका बजावणारे, सत्ताधारी पक्षावर बेछूट अरोप करत मोबाईल फूटेस्तोवर ट्विट करणारे रोहित पवार यांची दातखिळी बसली का ?" असा सवाल त्यांनी केला. तर "सुप्रिया सुळे या प्रकरणात रोहिणी खडसे यांचा राजीनामा घेतील असे वाटले पण त्यांनाही सदर प्रकरणात राजकिय वास येणे योग्य नव्हे." असे देखील त्यांनी म्हंटले.



रोहिणी खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी


शरद पवारांच्या पक्षात काही नैतिकता असेल तर खऱ्या अर्थाने अगोदर रोहिणी खडसे यांचा त्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी करत आपला तो बबल्या दुसऱ्याचं कार्ट , असं राजकारण चालत नसतं असे खडसावले.

Comments
Add Comment

Raghav Chaddha : राघव चड्ढा यांच्यासह ‘आप‘च्या 'त्या' ७ खासदारांच्या भाजपमधील विलीनीकरणास मंजुरी

- उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी दिली मंजुरी भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यसभेतील आपले स्थान आणखी मजबूत

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Raghav Chadha : ‘आप’ने आत्मचिंतन करण्याची गरज - राघव चड्ढा यांचा टोला

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) सध्या अंतर्गत नाराजी आणि वादांच्या भोवऱ्यात अडकला असून, पक्षाने आत्मचिंतन

Chitra Wagh : 'कितीही विरोध झाला तरी भाजपा महिलांना आरक्षण मिळवून देणारच'

मुंबई : महिला आरक्षणाला विरोध करून लाखो महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणाऱ्या विरोधी पक्षांना या लाखो