Nagpanchami 2025 : उद्या नागपंचमी! या दिवशी काय करावं? अन् काय करू नये? जाणून घ्या

  135

हिंदू धर्मामध्ये नागपंचमी सणाचे विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो, श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची विधीवत पूजा केल्यास फलप्राप्ती होते, असे म्हणतात. श्रावण महिन्यात महादेवांची भक्ती भावानं पूजा केली जाते, श्रावण महिन्यात अनेक सण, उत्सव देखील असतात त्यामुळे या महिन्याला उत्सवाचा महिना देखील मानलं जातं. या महिन्यात येणारा प्रमुख सण म्हणजे नागपंचमी. उद्या म्हणजेच मंगळवारी सर्वत्र उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. नागपंचमी हा सण नागदेवतेला समर्पित असतो. चला तर मग या दिवशी काय करावं आणि काय करू नये? ते जाणून घेऊयात...



नागपंचमी पूजा विधी


नागपंचमीच्या दिवशी, सर्वप्रथम सूर्योदयापूर्वी उठावे आणि नित्यकर्मातून निवृत्त व्हावे. स्नान करावे. यानंतर, भगवान शिवासोबत नागदेवतेची पूजा करावी. नागदेवतेच्या पूजेसाठी फळे, फुले, मिठाई आणि दूध अर्पण करावे. मान्यतांनुसार, ज्या लोकांच्या कुंडलीत काळसर्प दोष किंवा राहू-केतूशी संबंधित कोणताही दोष आहे, त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा अवश्य करावी.



नागपंचमीदिवशी काय करावं?


नागपंचमीच्या दिवशी महादेवांसोबत नागदेवतेची देखील पूजा करावी. महादेव आणि नागदेवतेची प्रार्थना करावी. सकाळी लवकर उठून घराजवळ कुठे नागदेवतेचं मंदिर असेल तर तिथे जाऊन नागदेवतेची पूजा करावी, किंवा घरीच नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा केली जाते. नागदेवतेला दूध अर्पण करावं, अशी मान्यता आहे, की नागदेवतेची पूजा केल्यानं नागदेवतेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतो. एक मान्यता अशीदेखील आहे की, या दिवशी फक्त उकडलेलंच अन्न खावं, या मागे अनेक कारण आहेत, श्रावण हा महिना पावसाळ्यात येतो, पावसाळ्यामध्ये तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते, उकडलेलं अन्न हे पचनासाठी हलकं असतं, त्यामुळे या दिवशी उकडलेलं अन्नच खावं अशी मान्यता आहे. या सणासोबत आणखी एक प्रथा जोडली गेली आहे, ती म्हणजे या दिवशी झोके बांधले जातात. शहरी भागात ही प्रथा काहीशी लोप पावली असली तरी देखील ग्रामीण भागांमध्ये आजही सर्वत्र मोठ्या उत्साहात नागपंचमीच्या दिवशी झोके बांधले जातात. या सणाला विवाहित महिला आपल्या माहेरी येतात, या महिला झोका खेळण्याचा आनंद घेतात, ही प्रथा आजही ग्रामीण भागांमध्ये सुरू आहे.



नागपंचमीदिवशी काय करू नये?


नागपंचमीच्या दिवशी अनेक ठिकाणी जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे, महाराष्ट्रातही एक -दोन ठिकाणी, पूर्वी ही प्रथा सुरू होती, मात्र आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं जिवंत नागाची पूजा करू नये, त्याला दूध पाजण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्यामुळे त्याच्या जीवाला हानी पोहचण्याची शक्यता असते, तसेच सर्पदंश झाल्यास तुम्हाला देखील जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीनं जिवंत साप पकडू नये, असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी कोणाचंही मन दुखवू नये. नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदणे टाळावे. असे मानले जाते की जमिनीच्या आत सापांची बिळे असतात. जमीन खोदल्याने सापांचे घर किंवा बिळे नष्ट होऊ शकतात. असे केल्याने अनेक पिढ्यांना पाप लागते. धार्मिक शास्त्रानुसार, नागपंचमीच्या दिवशी धारदार वस्तूंचा वापर करू नये. जसे की शिवणकाम, भरतकाम इत्यादी अशुभ मानले जाते.


(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल प्रहार न्यूजलाईन कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Comments
Add Comment

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत

Oben Electric : ओबेन इलेक्ट्रिकची आकर्षक 'नेक्स्ट जनरेशन रॉर्र ईझी' लवकरच बाजारात

५ ऑगस्टला लॉन्च होणार मुंबई: भारतातील स्वदेशी संशोधन आणि विकासावर (Research and Development R&D) आधारित इलेक्ट्रिक मोटरसायकल

Toyota Kirloskar: टोयोटा किर्लोस्‍कर मोटर्स विक्रीत जुलैत विक्रमी वाढ !

जुलैमध्‍ये थेट ३२,५७५ युनिट्सची विक्री केली गतवर्षीच्या तुलनेत जुलैमधील विक्रीत ३ टक्क्यांची वाढ मुंबई:

Pune Accident: पुण्यात खड्ड्याने घेतला वृद्धाचा जीव, यंत्रणेचा निष्काळजीपणा की हेल्मेटचा अभाव?

पुणे:  पुण्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामुळे एका ६१ वर्षीय वृद्ध नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ते

३ ऑगस्टला ब्रह्म मुहूर्तावर सूर्य आश्लेषा नक्षत्रात करणार प्रवेश, 'या' ५ राशींसाठी येणार आनंदाचे दिवस!

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी आणि नक्षत्रांमधील बदल मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. लवकरच सूर्य