प्रेक्षकांची लाडकी 'आम्ही सारे खवय्ये' मालिका लवकरच परत येतेय!

  64

मुंबई: 'झी' वाहिनी प्रेक्षकांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना पुन्हा एकदा मनोरंजनाच्या प्रवासात घेऊन जाण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रेक्षकांची लाडकी आणि लोकप्रिय खाद्यसंस्कृतीवर आधारित मालिका 'आम्ही सारे खवय्ये' लवकरच एका नव्या पर्वातून परत येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या लोकप्रिय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करणार आहे.


'झी मराठी' वाहिनीवरील सध्या गाजत असलेल्या 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेच्या एका खास भागात खुद्द संकर्षण कऱ्हाडेने हजेरी लावली होती. याच वेळी त्याने 'आम्ही सारे खवय्ये'च्या पुनरागमनाचं 'गुपित' उघड केलं. मालिकेत संकर्षण तिलोत्तमासोबत गप्पा मारत असताना तो म्हणाला, "तू ऐकलंस का? 'आम्ही सारे खवय्ये' परत येतंय!" त्याच्या या एका वाक्याने प्रेक्षकांना सुखद धक्का बसला.





हा व्हिडिओ लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चर्चांना उधाण आलं.


या घोषणेमुळे 'झी मराठी' वाहिनीने टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा नंबर वन येण्यासाठी जोरदार कंबर कसल्याचं दिसून येतंय. एकामागोमाग एक नव्या मालिकांची घोषणा करत वाहिनी प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.


कधी आणि कुठे पाहता येणार?


'आम्ही सारे खवय्ये'च्या या नव्या पर्वाची नेमकी तारीख आणि वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र लवकरच 'झी मराठी' वाहिनीवर हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संकर्षण कऱ्हाडेच्या सूत्रसंचालनामुळे या पर्वाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Comments
Add Comment

अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन

पुणे: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर

Sholay turns 50 : ‘शोले’ चित्रपटाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष! अमिताभ–धर्मेंद्र–हेमा–संजय यांची मैत्री सांगणारे ९ खास फोटो पहा

शोलेच्या शूटिंगदरम्यानचा एक कॅन्डिड क्षण म्हणजे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी अमिताभ बच्चन यांनी काढलेल्या

Kangana Ranaut : "बाप रे, एकाच खोलीत पाचवेळा… कंगनाचा थरारक खुलासा ऐकून अंगावर शहारे येतील!" नेमकं काय घडलं त्यावेळी?

बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी कंगना राणौत केवळ तिच्या दमदार अभिनयासाठीच नव्हे, तर स्पष्टवक्तेपणा आणि

शमिता शेट्टीने केला राष्ट्रगीताचा अपमान? व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

मुंबई: आज संपूर्ण देशात ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहेत. या खास प्रसंगी भारतात प्रत्येक ठिकाणी १५ ऑगस्ट

रहस्यमय ‘घबाडकुंड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, भव्य-दिव्य सेटवर होणार चित्रीकरण

मुंबई: प्रत्येकालाच आयुष्यात एकदा तरी 'घबाड' मिळावं आणि रातोरात श्रीमंत व्हावं असं वाटतं. अशाच एका घबाडाच्या

गायकाने तब्बल २० वर्षांनी केले हे खास काम, म्हणाला 'आयुष्यातील मोठी संधी...

मुंबई : 'इंडियन आयडल'च्या पहिल्या पर्वाचा विजेता आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गायक अभिजीत सावंत