मुलांच्या आकलन क्षमतेवर मोबाइलचा घाव

अमोल हुमे


आजच्या डिजिटल युगात मोबाइल आणि सोशल मीडिया हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. माहिती मिळवण्याचे, संवाद साधण्याचे आणि मनोरंजनाचे प्रभावी साधन असले तरी याचा अतिरेकाने वापर केल्यास त्याचे दुष्परिणाम विशेषतः विद्यार्थ्यांच्या आयुष्यात स्पष्टपणे दिसून येतात.


पहिले पाहिले तर मोबाईलचा उपयोग शैक्षणिक उद्दिष्टांसाठी केला जात होता. ऑनलाईन वर्ग, शैक्षणिक अ‍ॅप्स, व्हिडीओज आणि विविध उपयुक्त वेबसाईट्समुळे शिक्षण अधिक प्रभावी होत होते. पण जसजसा वेळ गेला, तसे या साधनांचा वापर मनोरंजनासाठी, विशेषतः सोशल मीडियाच्या आहारी जाण्यासाठी जास्त होऊ लागला.


मुख्य दुष्परिणाम :




  • एकाग्रतेचा अभाव : मोबाइल सतत वापरल्याने विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होते. सतत सूचना येत राहिल्यामुळे अभ्यासात लक्ष लागणे कठीण होते.

  • झोपेचा अभाव : रात्री उशिरापर्यंत मोबाइल वापरण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये वाढली आहे. त्यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी शाळेत दुर्लक्ष होते.

  • मानसिक आरोग्यावर परिणाम : सतत सोशल मीडियावर दिसणारे आकर्षक फोटो, यशोगाथा यामुळे आत्मविश्वास कमी होणे, न्यूनगंड येणे किंवा अस्वस्थ वाटणे असे परिणाम दिसून येतात.

  • शारीरिक आरोग्याची हानी : मोबाइलचा जास्त वेळ वापर डोळ्यांसाठी हानिकारक ठरतो. पाठदुखी, डोळ्यांची जळजळ, वजनवाढ असे परिणामही दिसून येतात.

  • वाचन-लेखन क्षमतेत घट : सतत स्क्रीनवर माहिती बघितल्याने वाचनाचे आणि लेखनाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे भाषा कौशल्यही मागे पडत आहेत.


उपाययोजना :
पालकांनी मुलांबरोबर संवाद साधावा आणि मोबाइल वापरावर मर्यादा घालाव्यात.
शाळांमध्ये डिजिटल स्वच्छता (digital hygiene) यावर विशेष सत्रे घ्यावीत.
मुलांना मोबाइलशिवाय करमणुकीचे पर्याय - वाचन, खेळ, हस्तकला, इ. शैक्षणिक उपक्रमांकडे वळवावे.
पालक आणि शिक्षक यांनी एकत्र येऊन नियोजनपूर्वक मार्गदर्शन करावे.


निष्कर्ष :
मोबाइल आणि सोशल मीडियाचा विवेकी वापर करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल असावे, त्यांचा अभ्यासात रस वाढावा आणि त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य टिकून राहावे, यासाठी ही जबाबदारी पालक, शिक्षक आणि समाजाने एकत्रितपणे घ्यावी.

Comments
Add Comment

आई जगदंबे

कृपावंत जगदंबेच्या अंतरंगी वसलेली दया-माया महानवमी माळेत जीव ओतते. आई भक्ताला पावते. दैत्याबरोबर नऊ दिवस नऊ

भारताची पहिली महिला ट्रकचालक : योगिता रघुवंशी

दुर्गा माता ही भक्ती आणि शक्तीचं रूप मानलं जातं. महिला सशक्तीकरणाचे ते एक प्रतीक आहे. आजच्या काळात स्त्री चूल आणि

अनुवादाची आनंदपर्वणी

आज एका चर्चासत्राच्या निमित्ताने जुनी गोष्ट आठवली. अनुवाद विषयक एका चर्चासत्राचे आयोजन आम्ही केले होते. या

कृतिरूप संघ दर्शन

कंदिलाची काच ज्या रंगाची असते, तशा रंगाची ज्योत आत आहे असे लोकांना वाटते. तसेच आपल्या संपर्कात ज्या व्यक्ती येतात

वाढती सत्तांतरे आणि भारतासाठी धडा

आरिफ शेख दक्षिण आणि पूर्व आशियातील देशांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून भू-राजनीतीक संघर्ष सुरू आहे. २०२२ पासून

सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील यशस्वी 'अंबिका'

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी लग्न, सात वर्षांत घटस्फोट, दोन वर्षांच्या मुलीचा एकल पालक