अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद

मुंबई : काही वर्षांपूर्वी 'चकदा एक्सप्रेस' या सिनेमात अनुष्का शर्मा ही झुलन गोस्वामी भूमिका साकारत होती. सिनेमाचा फर्स्ट लूकही समोर आला होता. मात्र नंतर या सिनेमाबद्दल पुढे काहीच अपडेट आलं नाही. हा सिनेमा डबाबंद झाला अशीही चर्चा झाली. आता सिनेमातील एका अभिनेत्यानेच यावर भाष्य केलं आहे.


अभिनेता दिव्येंदु भट्टाचार्य यांनी एका मुलाखतीत म्हणाले "तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मी सुद्धा या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. मी नेहमी लोकांना सांगतो की, हा सिनेमा खूप दमदार बनला आहे. दिग्दर्शक प्रोसित रॉयच्या घरी मी हा सिनेमा पाहिला. मी त्यांना म्हणालो की 'सिनेमा अजून रिलीज होत नाहीये कमीत कमी मला तरी दाखवा.' तेव्हा ते म्हणाले की 'सिनेमा पूर्णपणे शूट झालेला नाही. अजून काम बाकी आहे.' पण मी तो पाहिला..खूपच सुंदर बनला आहे."


तो पुढे म्हणाला, "अनुष्का शर्माचा सर्वोत्तम अभिनय या सिनेमात पाहायला मिळतो. तिने खूप चांगलं काम केलं आहे. सिनेमा रिलीज का होत नाहीये हे मला माहित नाही. माझ्याकडे सिनेमाबद्दल काहीही माहिती असती तर मी लगेच सांगितली असती. पण मला खरोखर माहित नाही. एका बाजूला क्लीन सेट आणि दुसऱ्या बाजूला नेटफ्लिक्स आहे. दोघांमध्ये काय चाललंय काहीच कळत नाही. याचा प्रेक्षकांवरही परिणाम होत आहे आणि आर्थिक नुकसानही आहे. एक कलाकार म्हणून मला असंच वाटतं की सिनेमा रिलीज व्हायला पाहिजे. कारण कोणत्याही सिनेमामागे अनेक लोकांची मेहनत असते. हा एक लांबलचक आणि भावनिकरित्या शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा सिनेमा आहे."


अनुष्का शर्माने २०२२ साली 'चकदा एक्सप्रेस' कमबॅक सिनेमा म्हणून घोषणा केली होती. अनुष्काच्याच 'क्लीन स्लेट' प्रोडक्शनने याची निर्मिती केली होती. मात्र गेल्या वर्षीच अनुष्काने आपल्या प्रोडक्शन हाऊसमधून पायउतार झाली आणि आपल्या भावाकडे तिने जबाबदारी सोपवली.

Comments
Add Comment

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :