महाराष्ट्रातील सर्व शाळांचे होणार सुरक्षा ऑडिट

मुंबई : राजस्थानमध्ये सरकारी शाळेची इमारत कोसळून सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी प्रार्थनेवेळी घडली. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने पावले उचलत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कंबर कसली आहे.


शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुक्रवारी एका उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील सर्व सरकारी शाळांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे व धोकादायक इमारतींना तातडीने निधी देण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेश भोयर यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिले आहेत.


राजस्थानमधील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. राज्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या इमारतींच्या सद्यस्थितीचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. राजस्थानसारखी दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडू नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.

Comments
Add Comment

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट

भायखळा-सायन स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी ब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : सायन (शीव) आणि भायखळा अशा दोन रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलाच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून

पथदर्शी धोरणानुसार मुंबई महापालिकेच्या शाळा १० मजली होणार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने आपल्या शाळांच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोवंडीतील शताब्दी रुग्णालयातही मिळणार महापलिकेच्या शीव रुग्णालयाप्रमाणे आरोग्यसेवा, वैद्यकीय महाविद्यालय बनणार

मुंबई(सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालये खासगी संस्थांना चालवण्यास देण्याचा निर्णय घेत काही

IMD: महाराष्ट्रासाठी 'चक्रीवादळ शक्ती'चा इशारा; ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

पुणे/मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) अरबी समुद्रात विकसित होत असलेल्या 'चक्रीवादळ शक्ती' च्या पार्श्वभूमीवर