महाराष्ट्रातील सर्व शाळांचे होणार सुरक्षा ऑडिट

मुंबई : राजस्थानमध्ये सरकारी शाळेची इमारत कोसळून सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी प्रार्थनेवेळी घडली. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने पावले उचलत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कंबर कसली आहे.


शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुक्रवारी एका उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील सर्व सरकारी शाळांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे व धोकादायक इमारतींना तातडीने निधी देण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेश भोयर यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिले आहेत.


राजस्थानमधील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. राज्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या इमारतींच्या सद्यस्थितीचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. राजस्थानसारखी दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडू नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.

Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही