‘रंगवेद’ आणि नाट्यकलेचा प्रयोग...

राजरंग : राज चिंचणकर


एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने ठाम निश्चय करून एखादे कार्य जिद्दीने हाती घेतले, तर ते निश्चितच तडीस जाऊ शकते. नाट्यसृष्टीत अलीकडेच असे एक उदाहरण कायम झाले आहे. मुंबईस्थित ‘रंगवेद’ या नाट्यसंस्थेने कोकणातल्या दुर्गम भागात जाऊन नाट्यकलेचा एक प्रयोग केला आणि रंगमंचावर एक अनोखा प्रवेश लिहिला गेला.


नाटक म्हणजे काय, याची काहीच कल्पना नसलेल्या मंडळींसमोर नाट्यकला सादर केली गेली तर, त्यांची प्रतिक्रिया पाहणे नक्कीच महत्त्वाचे ठरेल. असा एक प्रयोग करण्याचे ‘रंगवेद’ संस्थेच्या कलाकारांच्या मनात आले आणि त्यांनी त्याला मूर्त स्वरूप देण्याचा संकल्प केला. अशाप्रकारचा एखादा उपक्रम जेव्हा एखादी संस्था आणि तिचे कार्यकर्ते दुर्गम भागातल्या आदिवासी मुलांसाठी राबवतात; तेव्हा ती नक्कीच दखल घेण्याजोगी गोष्ट ठरते.


कुडाळजवळच्या मु. पो. वेताळ बांबूर्डे या आदिवासी पाड्यात ‘शोषित मुक्ती अभियान’ ही संस्था कार्यरत आहे. याच संस्थेच्या ‘नाग्या महादू निवासी वसतिगृह’ येथे भटक्या जमातीच्या मुलांपर्यंत ‘रंगवेद’ संस्था जाऊन पोहोचली. या संस्थेचे कार्यकर्ते व रंगकर्मी शीतल तळपदे, हिमांगी शुक्ल, संध्या ओक, प्रतिमा कंटक आदींच्या मार्गदर्शनाखाली सुनिता रामटेके, अभिषेक थोरात, शिवांजली सापे आदी कलाकार यात कार्यरत होते. नाट्यशास्त्रातल्या नवरसांची ओळख करून देत या कलाकारांनी त्या मुलांमध्ये दडलेले कलागुण शोधून काढले. हे कार्य बजावताना, ती मुले शहरी चालीरीतींपासून दूर आहेत असे वाटलेच नाही; असा अनुभव या कलाकारांना आल्याचे ही मंडळी सांगतात.


या अनोख्या उपक्रमाबद्दल ‘रंगवेद’चे कलाकार म्हणतात, “कधीही नाटक हा प्रकार पाहिलेला नसताना व आत्मविश्वासाचा पूर्णपणे अभाव असताना त्या मुलांकडून असे काही करून घेणे खरे तर कठीण होते. पण आमच्या कलाकारांनी हे आव्हान स्वीकारले. तुम्ही जंगलातले भटके लोक नाहीत; तर तुम्ही जंगलचे राजे आहात; अशा आशयाच्या त्यांना येत असलेल्या गाण्याचा उपयोग करून, ‘मदत’ या मध्यवर्ती संकल्पनेवर एक नाटक तिथे बसवले गेले. या मुलांना शिकवताना एक गोष्ट आम्हाला प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे निसर्ग हा सर्वात मोठा गुरू असतो. निसर्गाच्या सानिध्यात वाढणाऱ्या या मुलांमध्ये असलेले सूर, ताल आणि नाद यांचे उपजत ज्ञान अचंबित करणारे होते. ज्यांना ‘नाटक’ या प्रकाराची काहीही कल्पना नाही, अशा मुलांकडून नाटक बसवून घेण्याचा आनंद काय असतो; हे व्यक्त करायला आमच्याकडे शब्दच नाहीत”.

Comments
Add Comment

मी आणि ‘घासीराम कोतवाल’

भालचंद्र कुबल : पाचवा वेद घासीराम पुराण इतक्या लवकर आवरतं घेता येईल असं काही वाटत नाही. पण मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक

झेंडे प्लॅटर...!

आसावरी जोशी : मनभावन आपला देश, महाराष्ट्र, मुंबई ... या तिन्हींशी निगडित प्रत्येक चांगली गोष्ट आमच्या घरासाठी

ती आई होती म्हणून...

पितृपक्षाला प्रारंभ झाला की, सर्वांना आपापल्या पूर्वजांची आवर्जून आठवण येते. हे स्वाभाविकच असले, तरी आपल्या

कोकणच्या मातीची मिठ्ठास भ्रमंती...

राजरंग : राज चिंचणकर कोकणचा प्रदेश, तिथला निसर्ग, तिथली माणसे या सगळ्यांत गोडवा ठासून भरलेला आहे. अशा प्रकारची

मी आणि घासीराम कोतवाल

भालचंद्र कुबल : पाचवा वेद घासीराम नव्याने उभे करायचे म्हणजे नेमके काय करायचे याबाबत माझ्या डोक्यात काही

पुढच्या वर्षी लवकर या!

आसावरी जोशी : मनभावन श्यामची आई पुस्तकात आईच्या तोंडी एक वाक्य आहे. अगदी सहज मनास भिडणारे. देवाच्या घरून येणारे