'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही

सीडीएस जनरल अनिल चौहान यांची माहिती


नवी दिल्ली : भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तानवर जोरदार कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला असला तरी, 'ऑपरेशन सिंदूर' अजून थांबले नाही, अशी माहिती देशाचे सशस्त्र दलाचे प्रमुख (सीडीएस जनरल) अनिल चौहान यांनी दिली.
ते म्हणाले की 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरू आहे.


सैन्याला नेहमीच सतर्क राहावे लागते. आजचे युद्ध पारंपारिक आणि आधुनिक पद्धतींचे मिश्रण आहे. यामध्ये गतिज (शस्त्रांवर आधारित) आणि गैर-गतिज (माहितींवर आधारित) दोन्ही रणनीतींचा समावेश आहे. हे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीच्या युद्ध तंत्रांचे समन्वय आहे. युद्धासाठी शास्त्र आणि शस्त्र (ज्ञान) दोन्ही आवश्यक आहेत. ऑपरेशन सिंदूर अजूनही थांबलेले नाही. सैन्याने सर्व परिस्थितीत ३६५ दिवस तयार असले पाहिजे.


दरम्यान, गुरुवारी राज्यसभेत परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह म्हणाले की, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिलेला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर ७ मे रोजी सुरू करण्यात आले. ही कारवाई दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे आणि दहशतवाद्यांना मारणे यावर केंद्रित होती. ऑपरेशन सिंदूर आंतरराष्ट्रीय दबावाखाली सुरू करण्यात आले होते का?, असे सरकारला विचारले असता, परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, ही भारताची उत्स्फूर्त आणि ठोस प्रतिक्रिया होती. यात आंतरराष्ट्रीय दबाव नव्हता.


भारतीय हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान


ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेले जैश-ए-मोहम्मद, हिज्बुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि १०० हून अधिक दहशतवादी ठार केले. जेव्हा पाकिस्तानने भारतीय लष्करी आणि नागरी लक्ष्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भारताने पाकिस्तानी हवाई तळ आणि लष्करी तळांवरही हल्ला केला.

Comments
Add Comment

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर

दिवाळी-छटसाठी देशभरात धावणार १२ हजार विशेष गाड्या

नवी दिल्ली  : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या

भारत-ब्रिटनमध्ये 'व्हिजन २०३५' वर निर्णायक चर्चा! PM मोदी 'या' खास पाहुण्याचं करणार स्वागत

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचा पहिला भारत दौरा; फिनटेक आणि आर्थिक सहकार्यावर लक्ष मुंबई: पंतप्रधान

मोदी सरकारचा मोठा 'मास्टरस्ट्रोक'! महाराष्ट्रासह चार राज्यात रेल्वे ट्रॅकची क्षमता वाढणार; २४,६३४ कोटी मंजूर!

'४१% रेल्वे वाहतूक' असलेल्या कॉरिडॉरला ४ ते ६ लेनमध्ये विस्तार; वाहतूक खर्च होणार कमी नवी दिल्ली : केंद्रीय