'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही

सीडीएस जनरल अनिल चौहान यांची माहिती


नवी दिल्ली : भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तानवर जोरदार कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला असला तरी, 'ऑपरेशन सिंदूर' अजून थांबले नाही, अशी माहिती देशाचे सशस्त्र दलाचे प्रमुख (सीडीएस जनरल) अनिल चौहान यांनी दिली.
ते म्हणाले की 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरू आहे.


सैन्याला नेहमीच सतर्क राहावे लागते. आजचे युद्ध पारंपारिक आणि आधुनिक पद्धतींचे मिश्रण आहे. यामध्ये गतिज (शस्त्रांवर आधारित) आणि गैर-गतिज (माहितींवर आधारित) दोन्ही रणनीतींचा समावेश आहे. हे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीच्या युद्ध तंत्रांचे समन्वय आहे. युद्धासाठी शास्त्र आणि शस्त्र (ज्ञान) दोन्ही आवश्यक आहेत. ऑपरेशन सिंदूर अजूनही थांबलेले नाही. सैन्याने सर्व परिस्थितीत ३६५ दिवस तयार असले पाहिजे.


दरम्यान, गुरुवारी राज्यसभेत परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह म्हणाले की, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिलेला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर ७ मे रोजी सुरू करण्यात आले. ही कारवाई दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे आणि दहशतवाद्यांना मारणे यावर केंद्रित होती. ऑपरेशन सिंदूर आंतरराष्ट्रीय दबावाखाली सुरू करण्यात आले होते का?, असे सरकारला विचारले असता, परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, ही भारताची उत्स्फूर्त आणि ठोस प्रतिक्रिया होती. यात आंतरराष्ट्रीय दबाव नव्हता.


भारतीय हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान


ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेले जैश-ए-मोहम्मद, हिज्बुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि १०० हून अधिक दहशतवादी ठार केले. जेव्हा पाकिस्तानने भारतीय लष्करी आणि नागरी लक्ष्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भारताने पाकिस्तानी हवाई तळ आणि लष्करी तळांवरही हल्ला केला.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत