'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही

सीडीएस जनरल अनिल चौहान यांची माहिती


नवी दिल्ली : भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तानवर जोरदार कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला असला तरी, 'ऑपरेशन सिंदूर' अजून थांबले नाही, अशी माहिती देशाचे सशस्त्र दलाचे प्रमुख (सीडीएस जनरल) अनिल चौहान यांनी दिली.
ते म्हणाले की 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरू आहे.


सैन्याला नेहमीच सतर्क राहावे लागते. आजचे युद्ध पारंपारिक आणि आधुनिक पद्धतींचे मिश्रण आहे. यामध्ये गतिज (शस्त्रांवर आधारित) आणि गैर-गतिज (माहितींवर आधारित) दोन्ही रणनीतींचा समावेश आहे. हे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीच्या युद्ध तंत्रांचे समन्वय आहे. युद्धासाठी शास्त्र आणि शस्त्र (ज्ञान) दोन्ही आवश्यक आहेत. ऑपरेशन सिंदूर अजूनही थांबलेले नाही. सैन्याने सर्व परिस्थितीत ३६५ दिवस तयार असले पाहिजे.


दरम्यान, गुरुवारी राज्यसभेत परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह म्हणाले की, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिलेला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर ७ मे रोजी सुरू करण्यात आले. ही कारवाई दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे आणि दहशतवाद्यांना मारणे यावर केंद्रित होती. ऑपरेशन सिंदूर आंतरराष्ट्रीय दबावाखाली सुरू करण्यात आले होते का?, असे सरकारला विचारले असता, परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, ही भारताची उत्स्फूर्त आणि ठोस प्रतिक्रिया होती. यात आंतरराष्ट्रीय दबाव नव्हता.


भारतीय हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान


ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेले जैश-ए-मोहम्मद, हिज्बुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि १०० हून अधिक दहशतवादी ठार केले. जेव्हा पाकिस्तानने भारतीय लष्करी आणि नागरी लक्ष्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भारताने पाकिस्तानी हवाई तळ आणि लष्करी तळांवरही हल्ला केला.

Comments
Add Comment

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या

US-India Trade Deal: वर्षभराच्या चर्चेनंतर भारत-अमेरिका व्यापार करारावर एकमत; ट्रम्प-मोदींच्या चर्चेनंतर 'टॅरिफ'मध्ये मोठी कपात

भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः पंतप्रधान