Mumbai Airport : “थोड्याच वेळात धमाका होणार!” मुंबई एअरपोर्टला धमकीचे ३ कॉल; सुरक्षा यंत्रणांची धाबे दणाणली!

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आला आहे आणि थोड्याच वेळात मोठा स्फोट होणार असा धमकीचा फोन आला आहे. शुक्रवारी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एकामागोमाग ३ वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमकीचे फोन आले, ज्यामुळे सगळी खळबळ उडाली. या कॉलनंतर, मुंबई पोलिसांचे पथक तातडीनं सतर्क झाले आणि पोलिस अधिकारी, तसेच बॉम्ब शोध पथकाने विमानतळ गाठलं. प्रत्येक तास सखोल शोध घेऊन मोहीम राबवण्यात आली, मात्र एअरपोर्टवर कुठेही, काहीच संशयास्पद आढळून आलेलं नाही.


पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २ वर एका अज्ञात व्यक्तीने बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे उच्च अधिकारी आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी दाखल झाले. एअरपोर्टचा संपूर्ण परिसर खाली करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक कोपऱ्याची, सखोल, बारकाईने तपासणी करण्यात आली. मात्र पोलिस व बॉम्बशोधक पथकाला कुठेच, काहीही संशयास्पद आढळलं नाही. त्यामुळे बॉम्बची ही केवळ अफवा असल्याचं दिसून आलं.



आसाम-बंगाल सीमेशी सक्रिय असलेले कॉल


प्राथमिक तपासामध्ये असं दिसून आलंय की, हे धमकीचे कॉल आसाम आणि पश्चिम बंगाल सीमेजवळ सक्रिय असलेल्या मोबाईल नंबरचा वापर करून केले गेले होते. मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी अज्ञात कॉलरविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास तात्काळ सुरू केला. सध्या, पोलिस संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. धमकी देणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याचे हेतू शोधता येतील यासाठी तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही