‘चुकीचे मृतदेह मिळाले’

अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा


लंडन : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताबाबत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह अद्याप त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचलेले नाहीत. अशातच, पाठवण्यात आलेल्या मृतदेहांपैकी १२ मृतदेह चुकीच्या ठिकाणी पोहोचले आहेत. लंडनमधील पीडित कुटुंबांचे काम पाहणाऱ्या वकिलांनी हा दावा केला आहे. लंडनमध्ये जेव्हा हे मृतदेह तपासण्यात आले, तेव्हा ते दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे आढळून आले.


अद्याप या प्रकरणात एअर इंडियाकडून कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही.
या विमान अपघातात क्रू मेंबर्स व इतरांसह २६९ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतांमध्ये ५२ ब्रिटिश नागरिकांचाही समावेश होता. हा अपघात इतका भयानक होता की, मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले. त्यानंतर डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आणि मृतदेह संबंधित कुटुंबांकडे पाठवण्यात आले.


१२ मृतदेहांचे अवशेष परत पाठवले


अपघातातील पीडितांच्या कुटुंबांचे प्रतिनिधित्व करणारे वकील जेम्स हिली प्रॅट यांनी डेली मेलला सांगितले की, किमान १२ ब्रिटिश नागरिकांचे अवशेष परत पाठवण्यात आले आहेत. मी एका महिन्यापासून या ब्रिटिश कुटुंबांच्या संपर्कात आहे.


या लोकांना फक्त त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह परत हवे आहेत. यापैकी अनेकांना अद्याप त्यांच्या प्रियजनांचे अवशेषही मिळालेले नाहीत. काही लोकांना मृतदेह मिळाले, पण ते त्यांच्या प्रियजनांचे नाहीत. हा एक गंभीर निष्काळजीपणा आहे. याबाबत स्पष्टीकरण मिळायला हवे. त्यांनी आशा व्यक्त केली की, ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर ब्रिटन दौऱ्यावर येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर हा मुद्दा नक्कीच उपस्थित करतील.

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल