
#WATCH | On SC stays Bombay HC judgement acquitting 12 accused persons in 2006 Mumbai train blasts case, AIMIM MP Asaduddin Owaisi says, "The SC has put a stay on the HC judgement and said that the accused who were released after 18 years, will not be arrested again. I want to… pic.twitter.com/Mnc5xFYB2I
— ANI (@ANI) July 24, 2025
सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी केली आहे. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर तात्पुरती स्थगिती दिली आहे. कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की, जे आरोपी या प्रकरणात पूर्वीच निर्दोष ठरवले गेले आहेत आणि आता जामिनावर किंवा मुक्त झाले आहेत, त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवले जाणार नाही. सध्या या प्रकरणातील पुढील सुनावणीची प्रतीक्षा असून सर्वोच्च न्यायालयाने संबंधित सर्व पक्षकारांना नोटीस बजावून आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.

India-UK FTA : भारत-यूके फ्री ट्रेड डीलमुळे कोणत्या गोष्टी स्वस्त होणार? अन् त्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार!
लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे मोदींचा हा ब्रिटन दौरा खास असणार आहे. भारत आणि यूके या दोघांमध्ये ...
साखळी स्फोटात २०९ जणांचा मृत्यू
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये ११ जुलै २००६ रोजी ११ मिनिटांत झालेल्या ७ स्फोटांनी मुंबई हादरली होती. या साखळी बॉम्बस्फोटात २०९ जणांचा मृत्यू झाला होता. तर ८०० हून अधिकजण जखमी झाले होते. २०१५साली विशेष न्यायालयाने याप्रकरणातील १२ आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.