पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवा, भविष्यात उत्तम नियोजन करा

मुंबई : पोस्ट ऑफिसमधील  ही सर्वात सुरक्षित मानली जाते. कारण भारतीय पोस्ट सेवेवर आजही केंद्र सरकारचे १०० टक्के नियंत्रण आहे. इथे तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून काही वर्षांनी चांगला परतावा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये काही अशा योजना आहेत ज्यात गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. गुंतवणुकीवर कोणतीही जोखीम नसते आणि परतावाही निश्चित मिळतो.


पोस्ट ऑफिसमध्ये अनेक योजना आहेत. योग्य योजनेत पैशांची गुंतवणूक केली तर भविष्यात एक मोठी रक्कम आपल्याला परतावा स्वरुपात मिळते . पोस्ट ऑफिसमधील रिकरिंग डिपॉझिट योजना या आधारावर आहे. यात प्रत्येक महिन्याला थोडी थोडकी रक्कम जमा केल्यानंतर भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. यामुळे तुम्हाला भविष्यातील मोठ्या खर्चांकरिता , उदा; मुलांचं शिक्षण, लग्न आणि प्रॉपर्टी घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो.



पोस्ट ऑफिसची आरडी योजना नेमकी आहे तरी काय ?


आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट योजना ही बचत योजना आहे. यात प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम तुम्ही गुंतवू शकता. यात व्याजासह रक्कम हळूहळू वाढते. मुदत संपल्यानंतर यातून तुम्हाला एकरकमी पैसे मिळू शकतात. पोस्ट ऑफिस सरकारच्या अधिपत्यात येते. त्यामुळे यात जोखीम खूपच कमी आहे. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने ही गुंतवणूक सुरक्षित ठरू शकते. जर तुम्ही या योजनेत पाच वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये जमा केले तर ६ लाख रुपये जमा होतील . व्याजासह तुम्हाला मॅच्युरिटीवेळी ७ लाख १३ हजार ६५९ रुपये मिळतील. म्हणजेच तु्म्हाला १,१३,६५९ रुपये इतके व्याज मिळेल. या योजनेंतर्गत प्रत्येक तीन महिन्याने व्याजदर चक्रवाढ होते.



किती आहे सध्याचा व्याजदर ?


जुलै ते सप्टेंबर २०२५ या तिमाहीत आरडी योजनेवर ६.७ टक्के व्याज आहे. कदाचित यात वाढ देखील होऊ शकते. कारण सरकार दर तीन महिन्यांनी या दराचा आढावा घेऊन अपडेट करते. ही योजना पाच वर्षांसाठी आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पुढे वाढवू शकता. दुसरीकडे, आरडी खात्यात तुम्ही एका वर्षात १२ हप्ते पूर्ण केले तर तुम्हाला जमा राशीच्या जवळपास ५० टक्के कर्ज मिळू शकते. त्यामुळे गरजेवेळी मदत होऊ शकते. पण कर्जावरील व्याजदर हा आरडीच्या व्याजदरापेक्षा २ टक्के अधिक असतो.


अस्वीकरण : ही संकलित माहिती आहे. 'प्रहार' या माहितीची हमी देत नाही. गुंतवणुकीचा निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे आहे.
Comments
Add Comment

मुंबईत २० लाख झोपड्यांचा पुनर्विकास, १० लाख परवडणारी घरे बांधणार - वडाळ्यात 'तिसरी मुंबई' आकाराला येणार

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर ; वडाळ्यात जागतिक दर्जाचे 'स्टार्टअप हब', मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा

Hawker : पथविक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपाची जागा उपलब्ध करून देणार; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : मुंबईतील पथविक्रेत्यांच्या (हॉकर) प्रश्नासंदर्भात दाखल असलेल्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून उच्च

अर्थसंकल्पात ‘लाडकी बहीण’ योजनेवर शिक्कामोर्तब; योजना पुढेही...

मुंबई : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध

Mumbai ATS Raid : दहशतवादी संघटनांशी संबंध, मुंबईत अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अटक

मुंबई : दहशतवादी संघटनांशी असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २१

अनिल अंबानी आणि रिलायन्स पॉवर लिमिटेडशी संबंधित अनेक कंपन्यांवर ईडीचे छापे

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या समूहाची कंपनी असलेल्या रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या मनी लाँड्रिंग चौकशीचा

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दुपारी दोन वाजता सादर होणार

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज