पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवा, भविष्यात उत्तम नियोजन करा

मुंबई : पोस्ट ऑफिसमधील  ही सर्वात सुरक्षित मानली जाते. कारण भारतीय पोस्ट सेवेवर आजही केंद्र सरकारचे १०० टक्के नियंत्रण आहे. इथे तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून काही वर्षांनी चांगला परतावा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये काही अशा योजना आहेत ज्यात गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. गुंतवणुकीवर कोणतीही जोखीम नसते आणि परतावाही निश्चित मिळतो.


पोस्ट ऑफिसमध्ये अनेक योजना आहेत. योग्य योजनेत पैशांची गुंतवणूक केली तर भविष्यात एक मोठी रक्कम आपल्याला परतावा स्वरुपात मिळते . पोस्ट ऑफिसमधील रिकरिंग डिपॉझिट योजना या आधारावर आहे. यात प्रत्येक महिन्याला थोडी थोडकी रक्कम जमा केल्यानंतर भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. यामुळे तुम्हाला भविष्यातील मोठ्या खर्चांकरिता , उदा; मुलांचं शिक्षण, लग्न आणि प्रॉपर्टी घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो.



पोस्ट ऑफिसची आरडी योजना नेमकी आहे तरी काय ?


आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट योजना ही बचत योजना आहे. यात प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम तुम्ही गुंतवू शकता. यात व्याजासह रक्कम हळूहळू वाढते. मुदत संपल्यानंतर यातून तुम्हाला एकरकमी पैसे मिळू शकतात. पोस्ट ऑफिस सरकारच्या अधिपत्यात येते. त्यामुळे यात जोखीम खूपच कमी आहे. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने ही गुंतवणूक सुरक्षित ठरू शकते. जर तुम्ही या योजनेत पाच वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये जमा केले तर ६ लाख रुपये जमा होतील . व्याजासह तुम्हाला मॅच्युरिटीवेळी ७ लाख १३ हजार ६५९ रुपये मिळतील. म्हणजेच तु्म्हाला १,१३,६५९ रुपये इतके व्याज मिळेल. या योजनेंतर्गत प्रत्येक तीन महिन्याने व्याजदर चक्रवाढ होते.



किती आहे सध्याचा व्याजदर ?


जुलै ते सप्टेंबर २०२५ या तिमाहीत आरडी योजनेवर ६.७ टक्के व्याज आहे. कदाचित यात वाढ देखील होऊ शकते. कारण सरकार दर तीन महिन्यांनी या दराचा आढावा घेऊन अपडेट करते. ही योजना पाच वर्षांसाठी आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पुढे वाढवू शकता. दुसरीकडे, आरडी खात्यात तुम्ही एका वर्षात १२ हप्ते पूर्ण केले तर तुम्हाला जमा राशीच्या जवळपास ५० टक्के कर्ज मिळू शकते. त्यामुळे गरजेवेळी मदत होऊ शकते. पण कर्जावरील व्याजदर हा आरडीच्या व्याजदरापेक्षा २ टक्के अधिक असतो.


अस्वीकरण : ही संकलित माहिती आहे. 'प्रहार' या माहितीची हमी देत नाही. गुंतवणुकीचा निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे आहे.
Comments
Add Comment

स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थान मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत

Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway : दहिसर-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो-९ ला 'ग्रीन सिग्नल', १० स्थानके, १३ किमी मार्गाचा रुट; फेब्रुवारीत धावणार पहिली ट्रेन

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा एकदा पुढे,कधी आहेत?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुळीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात

मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या