Anil Ambani: अनिल अंबानी यांच्यावर 'चारही बाजूंनी संकट' देशभरात ३५ हून अधिक ठिकाणी ईडीचे छापे

प्रतिनिधी:अनिल अंबानी प्रणित रिलायन्स इंडस्ट्रीजच्या विविध ठिकाणावर अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate ED) या नियामक संस्थेने छापे टाकले आहेत. माध्यमांच्या माहितीप्रमाणे देशभरातील ३५ प्रांगणात, ५० कंपनी संबंधित व्य क्तींच्या स्थांनावर छापे घालण्यात आले आहेत. माध्यमांच्या माहितीप्रमाणे, सध्या अनिल अंबानी यांच्या गाजत असलेल्या मनीलाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीने यानिमित्ताने वेग घेतला आहे. कंपनीने मिळवलेल्या कर्ज अनैतिक प्रकारे दुसऱ्या कारणांसाठी वळवण्यात आल्याचा गंभीर आरोप रिलायन्सवर करण्यात आला होता. मुकेश अंबानी यांनी २०१७ ते २०१९ या काळात कंपनीसाठी येस बँकेकडून ३००० कोटींचे कर्ज घेतले होते जे अपेक्षित कारणापेक्षा वेगळ्याच कारणासाठी वापरण्यात आल्याचा ठपका ईडीने कंपनीवर ठेवला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, कंपनीवर हा देखील आरोप आहे की कंपनीने कर्जाच्या अनैतिक वापरासह बँकेच्या कर्मचाऱ्यांना कर्जासाठी कथित प्रकरणात लाच दिली. यामुळे अनिल अंबानींच्या कंपनीचे धाबे दणाणले असून यावर ईडीची कारवाई सुरु आहे. याप्रकरणी आवश्यक ती सखोल माहिती घेऊन ईडी कंपनीवर कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


ईडीच्या प्राथमिक तपासात बँका, भागधारक, गुंतवणूकदार आणि इतर सार्वजनिक संस्थांची फसवणूक करून सार्वजनिक पैसे वळवण्यासाठी सुनियोजित आणि विचारपूर्वक योजना आखल्याचे उघड झाले आहे. येस बँक्स लिमिटेडच्या प्रवर्तका (Promoter) स ह बँक अधिकाऱ्यांना लाच देण्याचा गुन्हा देखील तपासाधीन आहे असे सूत्रांनी सांगितले.' कर्ज मंजूर होण्यापूर्वीच, येस बँकेच्या प्रवर्तकांना त्यांच्या संबंधित पैसे मिळाले असे आढळून आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांविरुद्धच्या चौक शीत गुप्तहेरांना सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI), नॅशनल हाऊसिंग बँक (NHB), SEBI, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी (NFRA) आणि बँक ऑफ बडोदा यासारख्या इतर एजन्सी आणि संस्थांकडून मदत मिळत आहे असेही सुत्राने प्रसारमाध्यमांना स्पष्ट केले.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,ईडीला संशयास्पद आर्थिक पद्धतींचा एक पँटर्न आढळला आहे जसे की खराब किंवा पडताळणी न केलेल्या ढिसाळ वित्तीय कामगिरी असलेल्या कंपन्यांना कर्ज देणे, सामान्य संचालक आणि पत्ते असणे, आवश्यक कागदपत्रे गहाळ होणे मंजूर फायली गायब असणे,अग्रभागी कंपन्यांना निधी धुणे असे अनेक गंभीर आरोप कंपनीवर करण्यात आले आहेत.


सेबीने ईडीला कळवले आहे की त्यांच्या एका कंपनीने, रिलायन्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा (RHFL) आर्थिक घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप सेबीन केला आहे. यासंबंधीची माहिती सेबीने ईडीला दिली आहे. कथित प्रकरणात आरएचएफएलने कॉ र्पोरेट कर्जांमध्ये २०१७-१८ आर्थिक वर्षात घेतलेले कर्ज ३७४२.६० कोटी रुपयांवरून २०१८-१९ च्या आर्थिक वर्षात ८६७०.८० कोटी रुपयांपर्यंत कसे गेले याविषयी संशयास्पद हालचालीवर व अनियमितेवर ईडी तपास करणार आहे ज्यामध्ये अनियमित आणि ज लद मंजुरी, प्रक्रियेतील विचलन यासारख्या अनेक बेकायदेशीर बाबी आढळून आल्या आहेत, असे सुत्रांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.


स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देखील RAAGA कंपनी, रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCom) आणि स्वतः अंबानी यांना 'फसवणूक' खात्यांपैकी एक म्हणून वर्गीकृत केले होते ज्यावर अनिल अंबानी यांनी नाराजी व्यक्त करत न्यायालयात धाव घेतली होती व न्या यालयाने अनिल अंबानी यांच्या रिलायन्सला आपले मांडण्याचा पुरेसा वेळ एसबीआयने द्यायला हवा असे ताषेरे एसबीआयवर ओढले होते. त्यावरही अधिक तपास नियामक मंडळाकडून सुरु आहे.

Comments
Add Comment

FIFA World Cup 2026 : फ्रान्सची विजयी घोडदौड कायम! Ousmane Dembele च्या हॅट्ट्रिकने नॉर्वेचा पराभव

FIFA World Cup 2026 : फ्रान्सने (France) गट 'आय'मध्ये (Group I) अव्वल स्थान (Top Spot) निश्चित करत नॉर्वेचा (Norway) ४-१ असा पराभव केला. या सामन्यात

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक २०२६ मध्ये १२वा Own Goal; २०१८ च्या रेकॉर्डशी बरोबरी

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) स्पर्धेत Own Goal चा विक्रम बरोबरीत आला आहे. ट्युनिशियाचा (Tunisia) कर्णधार एलियेस

Plane Crashes : बीजिंगमध्ये हाहाकार! १७०० फुटी 'चायना झुन' टॉवरमध्ये घुसलं विमान

बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीला विमानाची जोरदार धडक   चीन: चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) शुक्रवारी एक

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि