Anil Ambani: अनिल अंबानी यांच्यावर 'चारही बाजूंनी संकट' देशभरात ३५ हून अधिक ठिकाणी ईडीचे छापे

प्रतिनिधी:अनिल अंबानी प्रणित रिलायन्स इंडस्ट्रीजच्या विविध ठिकाणावर अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate ED) या नियामक संस्थेने छापे टाकले आहेत. माध्यमांच्या माहितीप्रमाणे देशभरातील ३५ प्रांगणात, ५० कंपनी संबंधित व्य क्तींच्या स्थांनावर छापे घालण्यात आले आहेत. माध्यमांच्या माहितीप्रमाणे, सध्या अनिल अंबानी यांच्या गाजत असलेल्या मनीलाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीने यानिमित्ताने वेग घेतला आहे. कंपनीने मिळवलेल्या कर्ज अनैतिक प्रकारे दुसऱ्या कारणांसाठी वळवण्यात आल्याचा गंभीर आरोप रिलायन्सवर करण्यात आला होता. मुकेश अंबानी यांनी २०१७ ते २०१९ या काळात कंपनीसाठी येस बँकेकडून ३००० कोटींचे कर्ज घेतले होते जे अपेक्षित कारणापेक्षा वेगळ्याच कारणासाठी वापरण्यात आल्याचा ठपका ईडीने कंपनीवर ठेवला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, कंपनीवर हा देखील आरोप आहे की कंपनीने कर्जाच्या अनैतिक वापरासह बँकेच्या कर्मचाऱ्यांना कर्जासाठी कथित प्रकरणात लाच दिली. यामुळे अनिल अंबानींच्या कंपनीचे धाबे दणाणले असून यावर ईडीची कारवाई सुरु आहे. याप्रकरणी आवश्यक ती सखोल माहिती घेऊन ईडी कंपनीवर कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


ईडीच्या प्राथमिक तपासात बँका, भागधारक, गुंतवणूकदार आणि इतर सार्वजनिक संस्थांची फसवणूक करून सार्वजनिक पैसे वळवण्यासाठी सुनियोजित आणि विचारपूर्वक योजना आखल्याचे उघड झाले आहे. येस बँक्स लिमिटेडच्या प्रवर्तका (Promoter) स ह बँक अधिकाऱ्यांना लाच देण्याचा गुन्हा देखील तपासाधीन आहे असे सूत्रांनी सांगितले.' कर्ज मंजूर होण्यापूर्वीच, येस बँकेच्या प्रवर्तकांना त्यांच्या संबंधित पैसे मिळाले असे आढळून आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांविरुद्धच्या चौक शीत गुप्तहेरांना सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI), नॅशनल हाऊसिंग बँक (NHB), SEBI, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी (NFRA) आणि बँक ऑफ बडोदा यासारख्या इतर एजन्सी आणि संस्थांकडून मदत मिळत आहे असेही सुत्राने प्रसारमाध्यमांना स्पष्ट केले.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,ईडीला संशयास्पद आर्थिक पद्धतींचा एक पँटर्न आढळला आहे जसे की खराब किंवा पडताळणी न केलेल्या ढिसाळ वित्तीय कामगिरी असलेल्या कंपन्यांना कर्ज देणे, सामान्य संचालक आणि पत्ते असणे, आवश्यक कागदपत्रे गहाळ होणे मंजूर फायली गायब असणे,अग्रभागी कंपन्यांना निधी धुणे असे अनेक गंभीर आरोप कंपनीवर करण्यात आले आहेत.


सेबीने ईडीला कळवले आहे की त्यांच्या एका कंपनीने, रिलायन्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा (RHFL) आर्थिक घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप सेबीन केला आहे. यासंबंधीची माहिती सेबीने ईडीला दिली आहे. कथित प्रकरणात आरएचएफएलने कॉ र्पोरेट कर्जांमध्ये २०१७-१८ आर्थिक वर्षात घेतलेले कर्ज ३७४२.६० कोटी रुपयांवरून २०१८-१९ च्या आर्थिक वर्षात ८६७०.८० कोटी रुपयांपर्यंत कसे गेले याविषयी संशयास्पद हालचालीवर व अनियमितेवर ईडी तपास करणार आहे ज्यामध्ये अनियमित आणि ज लद मंजुरी, प्रक्रियेतील विचलन यासारख्या अनेक बेकायदेशीर बाबी आढळून आल्या आहेत, असे सुत्रांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.


स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देखील RAAGA कंपनी, रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCom) आणि स्वतः अंबानी यांना 'फसवणूक' खात्यांपैकी एक म्हणून वर्गीकृत केले होते ज्यावर अनिल अंबानी यांनी नाराजी व्यक्त करत न्यायालयात धाव घेतली होती व न्या यालयाने अनिल अंबानी यांच्या रिलायन्सला आपले मांडण्याचा पुरेसा वेळ एसबीआयने द्यायला हवा असे ताषेरे एसबीआयवर ओढले होते. त्यावरही अधिक तपास नियामक मंडळाकडून सुरु आहे.

Comments
Add Comment

Nagpur Crime : लॉजवर घेऊन गेला अन् 30 तास हात पाय बांधून नको ते केलं, नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : नागपुरात (Nagpur) 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली

Jalgaon : जळगावकरांनो लक्ष द्या ! शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवणार; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Jalgaon : जळगाव शहरातील शिव कॉलनीतील रेल्वे मार्गावरील समांतर पूल आणि भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती

Usha Nadkarni Emotional Story : वडिलांचा कोयत्याने हल्ला, आईने काढले घराबाहेर; पडद्यावर खडूस सासू, पण खऱ्या आयुष्यात... उषा नाडकर्णींची हादरवणारी कहाणी

मुंबई : टेलिव्हिजन विश्वातील अतिशय गाजलेली मालिका ‘पवित्र रिश्ता’ आणि त्यात 'खडूस सासू' म्हणून घराघरांत

State Government : आयुष्यमान भारत आणि जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारांप्रकरणी एसआयटी

 १५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान

Multiple UPI Apps : एकाच मोबाईल नंबरवर चालणार २ किंवा त्याहून अधिक UPI! जाणून घ्या सोपी पद्धत आणि महत्त्वाचे नियम

मुंबई : आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येक व्यक्ती ऑनलाईन पेमेंटसाठी यूपीआय (UPI) चा वापर करत आहे. मात्र, अनेकदा

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त