Infosys Q1 Results: देशातील क्रमांक दोन आयटी कंपनी इन्फोसिसचा निकाल गुंतवणूकदारांना सुखावणारा ! कंपनीच्या नफ्यात 'इतके' टक्के वाढ !

  120

प्रतिनिधी: देशातील क्रमांक दोनची आयटी कंपनी इन्फोसिस (Infosys) कंपनीने आपला बहुप्रतिक्षित तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) कंपनीच्या नफ्यात ८.७% वाढ झाल्याने नफा ६९२१ को टींवर पोहोचला आहे. काही तज्ञांनी कंपनीच्या तिमाही निकालातपूर्वी कंपनीचा निव्वळ नफा (Net Profit) ६७७८ कोटींवर जाऊ शकतो असे भाकीत केले होते. त्या आकड्याला पार करत कंपनीने ६९२१ कोटींचा नफा मिळवला. कंपनीला आर्थिक वर्ष २०२५ - २०२६ मध्ये १ ते ३% वाढ अपेक्षित आहे असे त्यांनी निकाला दरम्यान म्हटले आहे. कंपनीच्या ऑपरेटिंग मार्जिनही कंपनीने अबाधित राखले आहे जे सध्या २० ते २२% वर कायम आहे. माहितीनुसार कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात या तिमाहीत इयर ऑन इयर बेसि सवर ६.२% वाढ झाल्याने ती ८८०३ कोटींच्या घरात गेली आहे. मुख्यतः कंपनीच्या महसूलात (Revenue) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ७.५% वाढ झाल्याने महसूल ४२२७९ कोटींवर गेला आहे.

निकालाविषयी बोलताना,'पहिल्या तिमाहीतील कामगिरी हे अनेक आघाड्यांवरील आमच्या अढळ लक्षाचे स्पष्ट प्रतिबिंब आहे, ज्यामुळे तिमाहीत २.६ टक्के वाढ, २०.८ टक्के लवचिक मार्जिन आणि वार्षिक उत्पन्नात ८.६ टक्के वाढ झाली आहे. नफा वाढविण्यासा ठी आणि शेअरहोल्डर मूल्य वाढविण्यासाठी धोरणात्मक प्राधान्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आम्ही प्रोजेक्ट मॅक्सिमसचा वापर करत राहतो', असे इन्फोसिसचे सीएफओ जयेश संघराजका म्हणाले आहेत. दरम्यान, त्यांनी कॅश फ्लो (Cash Flow) बाबत बोलता ना म्हटले की,' सलग पाचव्या तिमाहीत रोख प्रवाह (Cash Flow Conversion) १०० टक्क्यांहून अधिक होते. आमच्या सक्रिय हेजिंग धोरणाद्वारे चलनातील अस्थिरतेचा परिणाम प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यात आला' असेही संघराजका म्हणाले आहेत.

माहितीनुसार, कंपनीने तिमाहीच्या अखेरीस ७५३३ कोटी रुपयांचा मोफत रोख प्रवाह (Cash Flow) नोंदवला आणि ४५२०४ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि गुंतवणूक ठेवली होती.
Comments
Add Comment

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

वांद्रे येथे ५२ फुटी काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा

मुंबई : दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

बाप्पाच्या आगमनापूर्वी सोने स्वस्त पण चांदी महाग झाली 'ही' आहेत कारणे जाणून घ्या आजचे दर

मोहित सोमण:आज जागतिक अस्थिरतेच्या तोंडावर आज व गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पुन्हा सोन्यात घसरण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना