कोचीहून मुंबईला येणारे एअर इंडियाचं विमान रनवेवरून घसरलं! एक मोठा अपघात टळला

मुंबई: मुंबई विमानतळावर एक मोठा विमान अपघात टळला आहे. एअर इंडियाचे कोचीहून निघालेले विमान मुंबई विमानतळावर लँडिंग करत असताना रनवेवरून अचानक घसरले. आज मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ही घटना घडली, यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान एआय २७४४ ए३२० (व्हीटी-टीवायए) हे सोमवारी मुंबई विमानतळावर उतरताना मुसळधार पावसामुळे धावपट्टीवरून भरकटल्याचा प्रकार समोर आला आहे. खराब हवामानामुळे विमान हे धावपट्टीवर उतरल्याबरोबर लगेच घसरले. सुदैवाने यावेळी मोठा अपघात टळला असून दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हि घटना सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली. हे विमान उतरत असताना त्याच्या तीन टायरांचा स्फोट झाला, इतकेच नाही तर इंजिनचे देखील नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.


एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सदर घटनेची माहिती देताना सांगितले की, २१ जुलै २०२५ रोजी कोच्चीहून मुंबईला येणाऱ्या फ्लाइट क्रमांक AI2744 चे लँडिंग होत असताना मुसळधार पावसामुळे लँडिंगनंतर विमानाला रनवेवरच चक्कर मारावी लागली. तरीही, विमान सुरक्षितपणे गेटपर्यंत पोहोचवण्यात आले आणि सर्व प्रवासी तसेच चालक दलाचे सदस्य सुरक्षितपणे विमानातून उतरले.



किरकोळ नुकसान


प्रवक्त्यांनी पुढे सांगितले की, मुख्य रनवे ०९/२७ मध्ये किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे, विमानतळावरील कामकाज सुरू ठेवण्यासाठी दुसरा रनवे १४/३२ कार्यान्वित करण्यात आला आहे. CSMIA मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.


 
Comments
Add Comment

मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणारा 'बिहारी' नोएडात सापडला

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या उत्सवाच्या एक दिवस आधी मुंबईच्या वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणाऱ्या एका

महाराष्ट्रात गणेश विसर्जन उत्साहात

मुंबई : गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका वाजत गाजत आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात सुरू आहेत.

३,१९० कोटींचे मालक अमिताभ बच्चन; पण संपत्तीचा वारस कोण? कोणाला किती मिळणार?

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन हे केवळ अभिनयाचेच नव्हे तर प्रचंड संपत्तीचेही बादशाह आहेत.

मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, एकाला केले अटक

मुंबई : आज सर्वत्र अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2025) ची धामधूम असताना, मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर

लालबागचा राजाच्या मिरवणुकीपूर्वी दुर्दैवी घटना, मुख्य प्रवेशद्वारावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू

मुंबई: गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज राज्यभरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. सकाळपासूनच

म्हाडाच्या १४९ अनिवासी गाळे विक्रीसाठीच्या ई-लिलावासाठी मुदतवाढ

१६ सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक)