आरक्षित प्रवर्गांना ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ नाही

सीईटी कक्षाची विद्यार्थ्यांना सूचना


मुंबई : आरक्षित प्रवर्गांअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या (ईडब्ल्यूएस) आरक्षणातून प्रवेश घेता येणार नाही, अशी सूचना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. तसेच अशा विद्यार्थ्यांनी तक्रार निवारण कालावधीत आपल्या अर्जासोबतच्या कागदपत्रांमध्ये योग्य बदल करावे, असे आवाहनही सीईटी कक्षाने केले आहे.


सध्या अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र प्रवेश नोंदणी प्रक्रियेबरोबरच विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना विद्यार्थी आपल्या प्रवर्गांमधून आरक्षणासाठी अर्ज करतात. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजे, एनटी, इतर मागासवर्गीय, एसईबीसी, एसबीसी अशा प्रवर्गांचा समावेश आहे. त्याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीही आरक्षण असते.


अनेकदा आरक्षित प्रवर्गांमधून अर्ज करणारे विद्यार्थी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करतात. अशा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संबंधित आरक्षित प्रवर्गासाठी तक्रार निवारण कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह अर्जात योग्य बदल करावे, असे सीईटी कक्षाने सूचित केले आहे. अशा अभ्यासक्रमांसाठी नोंदणी कालावधीच्या शेवटच्या तारखेपर्यंत हे बदल करता येतील, असेही जाहीर करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

कबुतरखान्यांसाठी महापालिकेकडून पर्यायी जागांचा शोध

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन मुंबई

बेस्टच्या १५७ नव्या वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण

बेस्टला सक्षम करण्याचे राज्य सरकारचे ध्येय मुंबई : 'जोपर्यंत बेस्ट उपक्रम ४० टक्क्यांपर्यंत बस

जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी - तटकरे

मुंबई : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ

तानसा धरणावर १०० मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प; महापालिकेचे वाचणार वर्षाला १६५ कोटी रुपये

मुंबई (खास प्रतिनिधी) : ​मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तानसा धरणावर आता वीज निर्मिती प्रकल्प उभारला

आश्रय योजनेतील पहिल्या ५१२ सदनिकांचे डिसेंबर अखेरपर्यंत सफाई कामगारांना होणार वाटप

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई शहराला स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महानगरपालिकेच्या सफाई