आरक्षित प्रवर्गांना ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ नाही

सीईटी कक्षाची विद्यार्थ्यांना सूचना


मुंबई : आरक्षित प्रवर्गांअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या (ईडब्ल्यूएस) आरक्षणातून प्रवेश घेता येणार नाही, अशी सूचना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. तसेच अशा विद्यार्थ्यांनी तक्रार निवारण कालावधीत आपल्या अर्जासोबतच्या कागदपत्रांमध्ये योग्य बदल करावे, असे आवाहनही सीईटी कक्षाने केले आहे.


सध्या अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र प्रवेश नोंदणी प्रक्रियेबरोबरच विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना विद्यार्थी आपल्या प्रवर्गांमधून आरक्षणासाठी अर्ज करतात. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजे, एनटी, इतर मागासवर्गीय, एसईबीसी, एसबीसी अशा प्रवर्गांचा समावेश आहे. त्याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीही आरक्षण असते.


अनेकदा आरक्षित प्रवर्गांमधून अर्ज करणारे विद्यार्थी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करतात. अशा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संबंधित आरक्षित प्रवर्गासाठी तक्रार निवारण कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह अर्जात योग्य बदल करावे, असे सीईटी कक्षाने सूचित केले आहे. अशा अभ्यासक्रमांसाठी नोंदणी कालावधीच्या शेवटच्या तारखेपर्यंत हे बदल करता येतील, असेही जाहीर करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा

महापालिका शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आता जेम पोर्टलवरून निविदा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया रद्द करून

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या

दिव्यांगांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर; दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग नावाने ओळखला जाणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत

शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत वरळीतील गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

मुंबई: वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक

राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे लवकर सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी