"माझ्या विधानावर पक्ष नाराज आहे, पण मी बरोबर आहे": शशी थरूर

पक्षनिष्ठेबाबत स्पष्टच बोलले शशी थरूर


नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) वर मोदी सरकार आणि सैन्याला पाठिंबा देत म्हटले आहे की देशाची सुरक्षा कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. त्यांनी स्पष्ट केले की ते त्यांच्या पक्षाचा आदर करतात, परंतु त्याहून जास्त महत्वाचा भारत येतो.


थरूर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की कोची येथील एका शालेय विद्यार्थ्याने त्यांना राष्ट्रीय सुरक्षेबद्दल प्रश्न विचारला. थरूर म्हणाले, 'मी या विषयावर सार्वजनिकरित्या बोलणे टाळत असलो तरी, मला या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक वाटले.'



जेव्हा देशाचा विचार येतो...


थरूर यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे ऊदाहरण देत म्हटले आहे की, 'जर देशच मेला तर कोण वाचेल?' ते म्हणाले की जेव्हा देशाचा विचार येतो तेव्हा आपण राजकीय मतभेद विसरून एकत्र उभे राहिले पाहिजे. शशी थरूर यांनी असेही म्हटले की, मोदी सरकारला पाठिंबा देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे अनेक लोक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. मात्र ते या भूमिकेवर ठाम राहतील कारण ते राष्ट्रीय हिताचे आहे.



राजकीय पक्षाआधी, भारत प्रथम येतो


केरळचे खासदार थरूर म्हणाले, 'राजकीय पक्ष हे देशाला चांगले बनवण्याचे माध्यम आहेत. पण जर एखादा निर्णय राष्ट्रीय हिताचा असेल तर त्याला पाठिंबा मिळाला पाहिजे. माझ्या मते, भारत प्रथम येतो.' थरूर यांनी कबूल केले की काही पक्षाचे नेते त्यांच्या विधानांवर नाराज आहेत. ते म्हणाले, 'मी सरकार आणि लष्कराला पाठिंबा दिल्यामुळे बरेच लोक माझी टीका करत आहेत, परंतु मी जे बोललो ते भारतासाठी योग्य आहे असे मला वाटते.'


ते म्हणाले की जेव्हा ते 'भारत' म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ फक्त काँग्रेस किंवा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्व भारतीयांचा असतो. थरूर यांच्या मते, संसदेत शेकडो पक्ष असू शकतात, परंतु राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर सर्वांनी एकत्र आले पाहिजे.

Comments
Add Comment

पाकिस्तानला संरक्षणमंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा, कराचीचा रस्ता इथूनच जातो म्हणाले राजनाथ सिंह

भुज : भारताच्या हद्दीत सर क्रीक खाडीचा प्रदेश येतो. या खाडीजवळ बांधकाम करत असलेल्या पाकिस्तानला संरक्षणमंत्री

प्रिसिक्रिप्शन वाचता येईल अशा मोठ्या अक्षरात लिहा, डॉक्टरांना हायकोर्टाचे आदेश

चंदिगड : रुग्णाला कोणते औषध कसे घ्यावे, कोणत्या टेस्ट करुन घ्याव्या ? आदी सूचना देण्यासाठी डॉक्टर चिठ्ठी लिहून

राजघाटावर पोहोचले पंतप्रधान मोदी, राष्ट्रपिता महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली: आज २ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी यांची जयंती देशभर मोठ्या आदराने साजरी होत आहे. याच निमित्ताने

प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचे ९१ व्या वर्षी वाराणसीत निधन

वाराणसी: प्रख्यात पद्मविभूषण पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचे आज, २ ऑक्टोबर २०२५

यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर, सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनियन पब्लिक सर्व्हिसेस अर्थात यूपीएससीअंतर्गत येणाऱ्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस

Mohsin Naqvi On Asia Trophy Ind vs Pak : अखेर BCCI समोर झुकला नक्वी! ट्रॉफी घेऊन पळणाऱ्या नक्कावींचा माज उतरला, नक्की काय म्हणाला मोहसीन नक्वी?

दुबई : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी अखेर बीसीसीआय (BCCI)