"माझ्या विधानावर पक्ष नाराज आहे, पण मी बरोबर आहे": शशी थरूर

पक्षनिष्ठेबाबत स्पष्टच बोलले शशी थरूर


नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) वर मोदी सरकार आणि सैन्याला पाठिंबा देत म्हटले आहे की देशाची सुरक्षा कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. त्यांनी स्पष्ट केले की ते त्यांच्या पक्षाचा आदर करतात, परंतु त्याहून जास्त महत्वाचा भारत येतो.


थरूर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की कोची येथील एका शालेय विद्यार्थ्याने त्यांना राष्ट्रीय सुरक्षेबद्दल प्रश्न विचारला. थरूर म्हणाले, 'मी या विषयावर सार्वजनिकरित्या बोलणे टाळत असलो तरी, मला या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक वाटले.'



जेव्हा देशाचा विचार येतो...


थरूर यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे ऊदाहरण देत म्हटले आहे की, 'जर देशच मेला तर कोण वाचेल?' ते म्हणाले की जेव्हा देशाचा विचार येतो तेव्हा आपण राजकीय मतभेद विसरून एकत्र उभे राहिले पाहिजे. शशी थरूर यांनी असेही म्हटले की, मोदी सरकारला पाठिंबा देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे अनेक लोक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. मात्र ते या भूमिकेवर ठाम राहतील कारण ते राष्ट्रीय हिताचे आहे.



राजकीय पक्षाआधी, भारत प्रथम येतो


केरळचे खासदार थरूर म्हणाले, 'राजकीय पक्ष हे देशाला चांगले बनवण्याचे माध्यम आहेत. पण जर एखादा निर्णय राष्ट्रीय हिताचा असेल तर त्याला पाठिंबा मिळाला पाहिजे. माझ्या मते, भारत प्रथम येतो.' थरूर यांनी कबूल केले की काही पक्षाचे नेते त्यांच्या विधानांवर नाराज आहेत. ते म्हणाले, 'मी सरकार आणि लष्कराला पाठिंबा दिल्यामुळे बरेच लोक माझी टीका करत आहेत, परंतु मी जे बोललो ते भारतासाठी योग्य आहे असे मला वाटते.'


ते म्हणाले की जेव्हा ते 'भारत' म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ फक्त काँग्रेस किंवा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्व भारतीयांचा असतो. थरूर यांच्या मते, संसदेत शेकडो पक्ष असू शकतात, परंतु राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर सर्वांनी एकत्र आले पाहिजे.

Comments
Add Comment

Barmati Couple Car Accident Tirupati : तिरुपती दर्शनाहून परतणाऱ्यांवर दु:खाचा डोंगर! बारामतीमधील दांपत्याच्या कारला ट्रक धडकला अन्...

बारामती : गेल्या काही दिवसांत देवदर्शनासाठी निघालेल्या किंवा परतणाऱ्या भाविकांच्या अपघाताच्या दुर्दैवी घटना

महाराष्ट्राचे सुपुत्र वेदमूर्ती देवव्रत रेखेंना 'दण्डक्रम विक्रमादित्य' ही मानाच्या पदवी पात्र! पंतप्रधानांनी केले कौतुक

वाराणसी: अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी २०० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. दोन

Woman Injured : पाणीपुरीमुळे जबडा अडकला अन् थेट निखळला; डॉक्टरांनाही करावी लागली शस्त्रक्रिया, 'ही' बातमी वाचून तुम्हीही थबकाल!

दिबियापूर : पाणीपुरी हे सर्वांचेच आवडते खाद्य आहे, विशेषतः महिलांसाठी तो एक 'विक पॉईंट' असतो. पाणीपुरीच्या गाडीवर

म्यानमारमधून भारतात येणाऱ्या ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश! घनदाट जंगलाचा रस्ता, नदीतून बोटीचा प्रवास कशी केली कारवाई? जाणून घ्या सविस्तर

गुवाहाटी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गुवाहाटी झोनल युनिटने एका समन्वित कारवाईत म्यानमारमधून भारतात

विशेष कारणासाठी पुतिन देणार भारताला भेट! असे असेल पुतिन यांचे वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली