आंबेनळी घाटात दरड कोसळली

वाहनांच्या लांबच लांब लागल्या रांगा


पोलादपूर : महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दरवर्षीप्रमाणे यंदाही दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पावसाच्या जोरदार सरींमुळे घाटातील रस्त्यांवर दरडी कोसळत असून, नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे. शनिवारी (दि.१९) झालेल्या मुसळधार पावसात पुन्हा दरड कोसळल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.


गेल्या १४ दिवसांत या मार्गावर चार वेळा दरड कोसळली आहे. सुरुवातीला घाट चार दिवस बंद ठेवण्यात आला होता. १५ जुलैनंतर हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली असली, तरी १५ ऑगस्टपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.


संपूर्ण रस्त्याचे काम सुरेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. मात्र, सततच्या पावसामुळे काम संथ गतीने सुरू आहे. शनिवारी दुपारी चिरेखिंड-बावली टोकजवळ दरड कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि संबंधित अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने माती आणि दरड बाजूला करण्यात आली आणि एकेरी मार्ग सुरू करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.


तहसीलदार कपिल घोरपडे आणि पोलीस एपीआय आनंद रावडे हे घाट परिसरात सतत पाहणी करत आहेत. चिरेखिंड-बावली परिसरात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याने रस्ता काही काळासाठी पूर्णपणे बंद झाला होता. मात्र, कंपनीचे अभियंते आणि प्रशासन यांच्या समन्वयाने तातडीने काम हाती घेऊन वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

करंजाचा धाडसी युवक आतिश कोळी ठरला ‘देवदूत’

वादळात अडकलेल्या १५ खलाशांचा वाचवला जीव अलिबाग  : उरण तालुक्यातील करंजा पाडा येथील आतिश सदानंद कोळी या युवकाने

अलिबागच्या समुद्रात बेपत्ता झालेल्या मुंबईतील दोन तरुणाचा शोध सुरू

अलिबाग  : अलिबाग शहराजवळील जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी दोघे

टाटा मिनी बसचा अपघात, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेल्या दोघांचा मृत्यू

कर्जत : समृद्धी महामार्गावर कर्जतजवळ बोगद्यात टाटा मिनी बसचा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे

अरे बापरे! मांडवा जेट्टीच्या नव्या पुलाचे खांब निकामी होण्याच्या मार्गावर; जेट्टी कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता

लोखंडी सळ्याही आल्या बाहेर, मूलभूत सुविधांचाही अभाव अलिबाग : गेटवे-मुंबई ते मांडवा-अलिबागला जलमार्गाने

रायगड जिल्ह्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

अलिबाग  : आलिशान चारचाकी वाहनाने रेकी करून रायगड जिल्ह्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

कर्जत : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत - सीएसएमटी (मुंबई सीएसएमटी किंवा छत्रपती