पश्चिम रेल्वेतर्फे पाच गणपती विशेष गाड्या धावणार

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल-ठोकूर, मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस-रत्नागिरी, वडोदरा-रत्नागिरी आणि विश्वामित्री-रत्नागिरी स्थानकांदरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे.


०९०११ मुंबई सेंट्रल - ठोकूर स्पेशल मंगळवारी मुंबई सेंट्रलहून सकाळी ११:३० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८:५० वाजता ठोकूरला पोहोचेल. ही ट्रेन २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी धावेल.


त्याचप्रमाणे ०९०१२ ठोकूर - मुंबई सेंट्रल ही विशेष गाडी बुधवारी ठोकूर येथून सकाळी ११ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७:१५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन दि. २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी धावेल.


ट्रेन क्रमांक ०९०१९ मुंबई सेंट्रल - सावंतवाडी रोड विशेष आठवड्यातून रविवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी धावेल. ही ट्रेन मुंबई सेंट्रलहून सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे २:३० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०२० सावंतवाडी रोड - मुंबई सेंट्रल विशेष गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे रविवार, सोमवार, गुरुवार आणि शनिवार धावेल. ही ट्रेन सावंतवाडीहून पहाटे ४:५० वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री ८ :१० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर पर्यंत धावेल.


ट्रेन क्रमांक ०९०१५ वांद्रे टर्मिनस - रत्नागिरी स्पेशल ही गाडी गुरुवारी दुपारी २:२० वाजता वांद्रे टर्मिनस येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२ :३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही ट्रेन २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०१६ रत्नागिरी - वांद्रे टर्मिनस स्पेशल शुक्रवारी रत्नागिरीहून रात्री १:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १२ :३० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंत धावेल.


ट्रेन क्रमांक ०९११४ वडोदरा - रत्नागिरी स्पेशल मंगळवारी वडोदरा येथून सकाळी ११:१५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२ :३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही ट्रेन २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९११३ रत्नागिरी-वडोदरा स्पेशल बुधवारी रत्नागिरीहून पहाटे १:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५ :३० वाजता वडोदरा येथे पोहोचेल. ही ट्रेन २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी धावेल.


ट्रेन क्रमांक ०९११० विश्वामित्री - रत्नागिरी स्पेशल ही बुधवार आणि शनिवारी सकाळी १०:०० वाजता विश्वामित्रीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री १२ :३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही ट्रेन २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९१०९ रत्नागिरी - विश्वामित्री स्पेशल ही गाडी रविवार आणि गुरुवारी रत्नागिरीहून पहाटे १:३० वाजता निघेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५: ३० वा. विश्वामित्रीला पोहोचेल. ही ट्रेन २४ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर पर्यंत धावेल. ०९०११, ०९०१९, ०९०१५, ०९११४ आणि ०९११० या ट्रेन क्रमांकांसाठी बुकिंग दि. २३ जुलैपासून सर्व पीआरएस काउंटर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल.

Comments
Add Comment

Mumbai-Bhopal Flight Accident : मुंबई ते भोपाळ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १६६ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले

मुंबई : विमान अपघाताच्या अनेक घटना या समोर येत आहेत. अहमदाबादची एक भयंकर मोठी विमान दुर्घटनेच्या आठवणी आजही

Marine Drive Accident : मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण थरार! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सोमवार, २७ एप्रिल रोजी पहाटे मरीन ड्राईव्ह परिसरात भीषण अपघात घडला असून यात तिघांचा मृत्यू झाला

अमेरिकेच्या येल विद्यापिठाचा विद्यार्थी करणार मुंबई बंदर, माथाडी कामगार, शहराचा विकासावर पीएचडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अमेरिकेच्या येल विद्यापिठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी हा , विसाव्या शतकातील

Malad BMC School : मालाड पश्चिममधील अतिधोकादायक नेमाणी शाळेत शिकतात महापालिकेची मुले

- भाजप नगरसेविकेने शिक्षण समितीच्या बैठकीत शाळा बंद करण्याची केली मागणी - पर्यायी शाळा लिबर्टी गार्डन शाळेत सुरु

BMC News : महापालिकेच्या स्टॉल्सचा परवाना अविवाहित व्यक्तीच्या मृत्यूनंतर आई, वडिलांच्या नावे होणार

- भाऊ आणि बहिणीच्या नावे करण्यास प्रशासनाने दर्शवला ठाम नकार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेचे स्टॉल्स

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे