पश्चिम रेल्वेतर्फे पाच गणपती विशेष गाड्या धावणार

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल-ठोकूर, मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस-रत्नागिरी, वडोदरा-रत्नागिरी आणि विश्वामित्री-रत्नागिरी स्थानकांदरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे.


०९०११ मुंबई सेंट्रल - ठोकूर स्पेशल मंगळवारी मुंबई सेंट्रलहून सकाळी ११:३० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८:५० वाजता ठोकूरला पोहोचेल. ही ट्रेन २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी धावेल.


त्याचप्रमाणे ०९०१२ ठोकूर - मुंबई सेंट्रल ही विशेष गाडी बुधवारी ठोकूर येथून सकाळी ११ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७:१५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन दि. २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी धावेल.


ट्रेन क्रमांक ०९०१९ मुंबई सेंट्रल - सावंतवाडी रोड विशेष आठवड्यातून रविवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी धावेल. ही ट्रेन मुंबई सेंट्रलहून सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे २:३० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०२० सावंतवाडी रोड - मुंबई सेंट्रल विशेष गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे रविवार, सोमवार, गुरुवार आणि शनिवार धावेल. ही ट्रेन सावंतवाडीहून पहाटे ४:५० वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री ८ :१० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर पर्यंत धावेल.


ट्रेन क्रमांक ०९०१५ वांद्रे टर्मिनस - रत्नागिरी स्पेशल ही गाडी गुरुवारी दुपारी २:२० वाजता वांद्रे टर्मिनस येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२ :३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही ट्रेन २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०१६ रत्नागिरी - वांद्रे टर्मिनस स्पेशल शुक्रवारी रत्नागिरीहून रात्री १:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १२ :३० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंत धावेल.


ट्रेन क्रमांक ०९११४ वडोदरा - रत्नागिरी स्पेशल मंगळवारी वडोदरा येथून सकाळी ११:१५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२ :३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही ट्रेन २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९११३ रत्नागिरी-वडोदरा स्पेशल बुधवारी रत्नागिरीहून पहाटे १:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५ :३० वाजता वडोदरा येथे पोहोचेल. ही ट्रेन २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी धावेल.


ट्रेन क्रमांक ०९११० विश्वामित्री - रत्नागिरी स्पेशल ही बुधवार आणि शनिवारी सकाळी १०:०० वाजता विश्वामित्रीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री १२ :३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही ट्रेन २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९१०९ रत्नागिरी - विश्वामित्री स्पेशल ही गाडी रविवार आणि गुरुवारी रत्नागिरीहून पहाटे १:३० वाजता निघेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५: ३० वा. विश्वामित्रीला पोहोचेल. ही ट्रेन २४ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर पर्यंत धावेल. ०९०११, ०९०१९, ०९०१५, ०९११४ आणि ०९११० या ट्रेन क्रमांकांसाठी बुकिंग दि. २३ जुलैपासून सर्व पीआरएस काउंटर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल.

Comments
Add Comment

Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी