Bhaskar Jadhav : अखेर भास्कर जाधव यांनी सभागृहात मागितली माफी!

मुंबई : राजकारणात कितीही मस्तवाल झाला, तरी एक वेळ अशी येतेच… जेव्हा “मीच चुकलो!” हे मान्य करावं लागतं. काल अध्यक्षच विधानसभेच्या परंपरा पाळत नाहीत असं म्हणत आमदार भास्कर जाधवांनी (Bhaskar Jadhav) माध्यमांसमोर हल्लाबोल केला होता, आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात अध्यक्षांवर गंभीर आरोप केले होते. अध्यक्ष सभागृहाच्या परंपरा पायदळी तुडवत असून, सरकारला वाचवण्याचं काम करत असल्याचं जाधव म्हणाले होते. विरोधकांच्या हक्कांचं संरक्षण करत नसल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली. “महाराष्ट्राच्या विधीमंडळाची संपूर्ण परंपरा या अध्यक्षांनी धुळीस मिळवलेली आहे,” असं जाधव यांनी माध्यमांसमोर नमूद केलं. त्यावरती आज भास्कर जाधवांनी सभागृहात माफी मागितली आहे.



तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी स्विकारायला तयार : भास्कर जाधव


मी हातवार करून बोलतो, मी जाणिवपुर्वक हातवारे करून बोलतो, मला सस्पेंड करायचं असेल तर करा, जे आहे ते मी सांगतो. 'मी लगेच उठलो, मला माहिती आहे मी कधी उठलो नव्हतो, मला चांगलं माहिती आहे, आत्ता सुध्दा माझे हात हालत आहेत. आत्ताही आपण राम कदम यांना पुढचा प्रश्न विचारला तर त्यांनी हात पुढे केले. आमचा गुन्हा आम्ही मान्य करतो. अध्यक्ष महोदय माझ्याकडून जे शब्द बाहेर बोलले गेले, त्या संदर्भात मी माफी मागतो. यावर तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी स्विकारायला तयार आहे, असंही पुढे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे, त्यावर विधानसभा अध्यक्षांनी भास्कर जाधव यांनी जी भावना व्यक्त केली ती मोठ्या मनाने स्विकारावी, असं म्हटलं आहे.



हवी ती शिक्षा मला द्या


माझ्याकडून माध्यमांसमोर जे शब्द गेले ते जायला नको होते, अध्यक्ष महोदय मी जाहीरपणे सांगतो हे शब्द माझ्याकडून गेले त्याबद्दल हवी ती शिक्षा मला द्या मी ती शिक्षा मान्य करायला तयार आहे, असंही पुढे भास्कर जाधवांनी म्हटलं आहे. भास्कर जाधव यांनी अखेर आपली चूक मान्य केली आहे. माझ्याकडून बाहेर जे शब्द गेले ते योग्य नाही, माझी चूक झाली मी ते कबूल करतो आणि मी माफी मागतो, असं म्हणत भास्कर जाधव यांनी सभागृहाची माफी मागितली आहे, आणि सभागृहानेसुद्धा भास्कर जाधवांना मोठ्या मनाने माफ केलं.



नेमकं काल काय घडलं?


भास्कर जाधव यांनी सभागृहात काल (गुरूवारी) केलेले हातवारे आणि वापरलेली भाषा, याबाबत विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. विरोधकांच्या २९३च्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिल्यानंतर विरोधकांकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा काही प्रश्न विचारण्याची (राइट टू रिप्लाय) परवानगी अध्यक्षांकडे मागितली. मात्र, चर्चेची सुरुवात ठाकरे यांनी केली होती, आता ते सभागृहात नाहीत, त्यामुळे इतर कोणालाही मी ही संधी देणार नाही, असे सांगत अध्यक्षांनी परवानगी नाकारली. परवानगी नाकारल्यानंतर आक्रमक होत जाधव अध्यक्षांकडे हातवारे करत जोरदार बोलत होते. जाधव यांच्या या कृतीने शिंदेसेनेचे मंत्री आणि आमदार वेलमध्ये उतरले आणि मोठा गोंधळ झाला होता.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक

Chandrashekar Bawankule : देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याच्या प्रारूपाला स्थगिती

सुधारित प्रारूपासाठी खारगे समिती स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : महाराष्ट्रातील

Weekly Public Transport Day in BKC : बीकेसीमध्ये दर शुक्रवारी पाळणार ‘साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’

- इंधन बचतीसाठी निर्णय; २ लाख कर्मचारी करणार सार्वजनिक प्रवासी वाहनांचा वापर मुंबई : जागतिक इंधन तुटवड्याच्या

Mumbai News : मुंबईत १५ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य? सात बांगलादेशी नागरिक अटकेत, पोलिसांचा तपास सुरू

मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवैध स्थलांतराविरोधात मोठी कारवाई करत सात बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना अटक केली