अमेरिकेने पाकिस्तानला दिला जोरदार झटक, TRF ला घोषित केले दहशतवादी संघटना, पहलगाम हल्ल्यासाठी ठरवले जबाबदार

वॉशिंग्टन: अमेरिकेने पाकिस्तानच्या TRFला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. TRF पाकिस्तान स्थित लष्कर ए तोयबाची संघटना आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी याबाबतची माहिती दिली. विशेष म्हणजे अमेरिकेने TRFला पहलगाम हल्ल्यासाठीही जबाबदार ठरवले आहे. या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता.


अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांनी TRFला लष्कराचा मुखवटा असे म्हटले आहे. याचे मुख्यालय पाकिस्तानाच आहे आणि तेथूनच ऑपरेट केले जाते. अमेरिकेने पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच म्हटले होते की दहशतवादाविरूद्धच्या लढाईत ते भारतासोबत उभे आहेत.



TRFने घेतली होती पहलगाम हल्ल्याची जबाबदारी


रुबियो यांनी म्हटले की TRFला दहशतवादी संघटना घोषित करणे हे आमची राष्ट्रीय सुरक्षा हितांची रक्षा करण्याचे विचार दर्शवते. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय देण्यासाठी आम्ही किती प्रतिबद्ध आहोत हे ही दर्शवते. TRFने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. याला अमेरिकेने २००८मध्ये मुंबई हल्ल्यानंर भारतातील नागरिकांसाठी सर्वात घातक दहशतवादी संघटना असल्याचे म्हटले होते.



पाकिस्तानला मोठा झटका


TRFला दहशतवादी संघटना घोषित केल्यानंतर पाकिस्तानला चांगलाच झटका बसला आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांना पोसले जाते आणि त्यांचा वापर भारताविरुद्ध केला जातो. आता TRFवर कडक प्रतिबंध लादले जाऊ शकतात.

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल