PMJDY scheme: जुलैपर्यंत १.४ लाख जनधन योजनेअंतर्गत नव्या बँक खात्यांची भर

१ जुलैपर्यंत १.४ लाख नवी खाती उघडली - वित्त विभाग

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरु झाली होती. बँकिंग सेवेपासून वंचित समुहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने हा योजनाबद्ध निर्णय घेतला होता. ज्याला गेल्या १० वर्षात मोठा प्रतिसाद मिळाला होता. याच धर्तीवर सरकारने नव्या खात्यांची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे त्यातील माहितीनुसार, १ जुलैपासून देशभरात प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत (PMJDY) सुमारे १.४ लाख नवीन खाती उघडण्यात आली आहेत ' असे वित्तीय सेवा विभागाने (DFS) मंगळवारी सांगितले. या कालावधीत तीन जनसुरक्षा योजनांअंतर्गत ५.४ लाखांहून अधिक नवीन नोंदणी नोंदविण्यात आल्या आहेत असेही डीएफएस विभागाने म्हटले आहे. डीएफएसने त्यांच्या प्रमुख आर्थिक समावेशन योजना पीएमजेडीवाय, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि अटल पेन्शन योजना (APY) यांचा विस्तार करण्यासाठी १ जुलैपासून सुरू झालेली आणि ३० सप्टेंबरपर्यंत चालणारी तीन महिन्यांची देशव्यापी मो हीम राबवली आहे. प्रत्येक पात्र नागरिकाला या योजनांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी सर्व ग्रामपंचायती आणि शहरी स्थानिक संस्थांना कव्हर करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

या मोहिमेच्या पहिल्या दोन आठवड्यात, लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी आणि आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये ४३,४४७ नावनोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत त्यापैकी आतापर्यंत ३१,३०५ शिबिरांचे प्रगतीचा अहवाल संकलित करण्यात आले आहेत. त्याच आधारावर सरकारने ही संबंधित माहिती दिली आहे. या उपक्रमाविषयी बोलताना,' हा उपक्रम शेवटच्या टप्प्यातील आर्थिक सक्षमीकरण आणि अधिक सामाजिक आर्थिक समावेशनासाठी सरकारची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो ' असे अर्थ मंत्रालयाने आपल्या निवेदनात नुकतेच नमूद केले. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेरपर्यंत सुमारे २.७ लाख ग्रामपंचायती आणि शहरी संस्थांना या मोहिमेचा समावेश असणार आहे ज्यामध्ये अधिकाधिक खाती उघडण्यासाठी जनसा मान्यांसाठी सरकार बँकेचे कवाड खुले करणार आहे.

याव्यतिरिक्त तथापि अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले की ' सरकारने बँकांना निष्क्रिय पंतप्रधान जन धन योजना खाती बंद करण्याचे कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत.' वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने (DFS) बँकांना निष्क्रिय पंतप्रधान जनधन योजना खाती बंद करण्यास सांगितले आहे अशा माध्यमांमध्ये आलेल्या निव्वळ अफवा असल्याचे सांगत, डीएफएस (DFS) ने स्पष्ट केले आहे की त्यांनी बँकांना निष्क्रिय पंतप्रधान जन धन योजना खाती बंद करण्यास सांगितले नाही. आतापर्यंत, भारतात ५५.४४ कोटींहून अधिक जन धन खाती उघडण्यात आली आहेत, त्या खातेदारांपैकी ५६ टक्के महिला आहेत. या वर्षी २१ मे पर्यंत या खात्यांमधील ठेवी २.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाल्या होत्या.
Comments
Add Comment

Football fever in Kolhapur : क्रिकेटच्या देशात फुटबॉलचा थरार; अर्जेंटिनाच्या विजयाने कोल्हापूर झाले 'फुटबॉलमय'!

Kolhapur : भारत हा तसा क्रिकेटवेडा देश, पण कोल्हापूरची गोष्टच न्यारी आहे! 'सॉकर सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

FIFA WORLDCUP 2026 : अर्जेंटिनाच्या टीकाकारांना मेस्सीचे चोख उत्तर: 'आम्हाला काहीही आयते मिळालेले नाही'

लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाच्या विश्वचषक प्रवासावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. "आम्हाला काहीही फुकट

Major Cricket League : एका सामन्यात ३ शतकं, ५१ सिक्स अन् ५३७ रन; क्रिकेटच्या इतिहासात लिहिला गेला नवा अध्याय

मुंबई : टी-२० क्रिकेटच्या इतिहासात असा सामना पाहायला मिळाला, ज्याने या फॉरमॅटमधील (Format) जवळपास सगळे मोठे विक्रम (Records)

ICC : वर्ल्ड कपमध्ये आयसीसीचा ‘मास्टर प्लॅन’? भारत-पाक सामन्यांसाठी मोठा बदल

मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेला भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

BMC : धारावी, काळा किल्ला बेस्ट बस आगाराची जागा धारावी विकास प्रकल्पासाठीसाठी हस्तांतरीत

महापालिका सभागृहात बहुमताने प्रस्ताव मंजूर मुंबई : धारावी (Dharavi) बस डेपोची जागा पीपीपी तत्त्वावर धारावी विकास