मीरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मेट्रो लाईन समवेत असणारे काशिगाव मेट्रो स्थानक ते काशिमिरा नाक्यापर्यंत तसेच मीरागाव ते काशिगाव मेट्रो स्थानकापर्यंतचे वाया आकाराचे पूल मुख्य पुलला जोडण्याच्या कामास गती देण्यात यावी. तसेच मिरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्ता, काशिमिरा नाका ते रेल्वे फाटक पर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रीटचे करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.



विधानभवन येथे मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र मेहता, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, प्रधान सचिव नगरविकास विभाग डॉ. के. एच. गोविंदराज, एमएमआरडीएचे महानगरआयुक्त डॉ. संजय मुखर्जी, उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगन, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, ऊर्जा विभागाच्या सचिव आभा शुक्ला, मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद अरिबम शर्मा उपस्थित होते.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मीरा रोड परिसरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता या ठिकाणी नवीन शिधावाटप कार्यालय करण्यात येईल तसेच उपनिबंधक कार्यालयाच्या निर्मितीसाठी ३५ पदांच्या निर्मितीचा प्रस्ताव पाठवण्यात यावा. मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या जागांच्या आरक्षणाची यादी तयार करावी. शाळांकरिता किंवा अन्य कोणत्या प्रयोजनासाठी आरक्षित ठेवलेल्या जागा अन्य कोणत्याही कारणासाठी वापरता येणार नाहीत अशी जागा वापरात येत असेल तर तत्काळ काम थांबवावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.


यावेळी भाईंदर- दहिसर लिंक रोड, भाईंदर पूर्व जैसलपार्क- घोडबंदर रस्ता, सूर्या धरणातून मीरा-भाईंदर शहराची पाणीपुरवठा योजनेची कामे, मीरा-भाईंदर शहरात प्रस्तावित क्लस्टरचे आराखडे, धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाकरता सवलती, एसटी महामंडळाची पडीक जागा मीरा-भाईंदर पालिकेच्या परिवहन विभागासाठी देणे आदी प्रश्नांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

Comments
Add Comment

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ईशान आणेकरचे घवघवीत यश

जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई ठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड