Child Labour: ९ अल्पवयीन मुली आणि ६ मुलांची सुटका, आरोपींवर गून्हा दाखल

  58

कामाचा कुठलाही मोबदला न देता बालकांना मारहाण केली जात होती


बीड: राज्यातील बालकामगारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  मागील दीड वर्षापासून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील गहूखेल येथे काही अल्पवयीन बालकामगारांकडून घरातील कामे, शेतीचे तसेच गोठ्यातील कामे करून घेतले जात असल्याची माहिती समोर आली होती . या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , बीडमधील ९ अल्पवयीन मुली आणि ६ मुलांची सुटका केल्याची माहिती अहिल्यानगर येथील सहायक कामगार आयुक्त व बाल संरक्षण अधिकारी यांच्या पथकानं २० जून केली होती. यातील एका बालकाच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी दोन आरोपींवर झिरो एफआयआर दाखल करत संबंधित प्रकरण बीड पोलिसांकडे वर्ग केलं आहे.

बालकांच्या तक्रारीनंतर पथकानं गावात टाकला छापा


याबाबतची मिळालेली माहिती अशी की, संबंधित बालकांचे पालक हे कर्नाटक येथे काम करण्यासाठी गेले होते. आष्टी येथे आरोपींकडून घरचे काम करून घ्यायचे, त्यांचे गुर सांभाळण्याचं काम लावले होते. यादरम्यान कामाचा कुठलाही मोबदला न देता उलट या बालकांना मारहाण केली जात होती. तसेच शिळे आणि सुके अन्न त्यांना खायला देत असल्याची तक्रार यावेळी बालकांनी केली. सततच्या मारहाणीला घाबरून यातील दोन बालके गावातून पळाले. रात्रभर तसेच दुसऱ्या दिवशी पायी प्रवास केल्यानंतर एक अनोळखी व्यक्तीनं या दोन बालकांना पोलिस स्टेशनमध्ये नेले.

त्यानंतर पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर या दोन बालकांना बालगृहात पाठविण्यात आलं. यावेळी बाल समितीच्या सदस्यांनी या बालकांकडे चौकशी केली असता त्यांनी आमच्यासारखे आणखीन १० ते १२ जण गहूखेल या गावात असल्याची माहिती दिली.  त्यानंतर अहिल्यानगर येथील सहायक कामगार आयुक्त आणि बाल संरक्षण अधिकारी यांच्या पथकानं २० जून रोजी कारवाई करत १५ बालकांची सुटका केली.

मुलांना बालगृहात पाठविलं


दरम्यान, या घटनेत सुरुवातीला अहिल्यानगर येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन बालकाच्या तक्रारीवरून झिरो एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षकांच्या तक्रारीवरून ९ आरोपींवर आंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सध्या, यातील सहा मुले बीडच्या बालगृहात तर ९ मुली आर्वी येथील मुलींच्या बालगृहात ठेवण्यात आलं आहे.
Comments
Add Comment

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

नियमितपणे आढावा, समन्वय साधणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई : राज्यातील पाच

माधुरी लवकरच कोल्हापूरला परतणार!

कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश; माधुरीला परत पाठवण्याबाबत वनताराकडून आश्वासन कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या

उत्तराखंडमधील ढगफुटीत अडकले महाराष्ट्रातील ५१ पर्यटक

सर्व पर्यटक सुखरूप असल्याची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई : उत्तराखंडमधील राज्यातील उत्तरकाशी

Hingoli Train Fire : हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग; संपूर्ण बोगी जळून खाक

हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३०

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना