Child Labour: ९ अल्पवयीन मुली आणि ६ मुलांची सुटका, आरोपींवर गून्हा दाखल

कामाचा कुठलाही मोबदला न देता बालकांना मारहाण केली जात होती


बीड: राज्यातील बालकामगारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  मागील दीड वर्षापासून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील गहूखेल येथे काही अल्पवयीन बालकामगारांकडून घरातील कामे, शेतीचे तसेच गोठ्यातील कामे करून घेतले जात असल्याची माहिती समोर आली होती . या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , बीडमधील ९ अल्पवयीन मुली आणि ६ मुलांची सुटका केल्याची माहिती अहिल्यानगर येथील सहायक कामगार आयुक्त व बाल संरक्षण अधिकारी यांच्या पथकानं २० जून केली होती. यातील एका बालकाच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी दोन आरोपींवर झिरो एफआयआर दाखल करत संबंधित प्रकरण बीड पोलिसांकडे वर्ग केलं आहे.

बालकांच्या तक्रारीनंतर पथकानं गावात टाकला छापा


याबाबतची मिळालेली माहिती अशी की, संबंधित बालकांचे पालक हे कर्नाटक येथे काम करण्यासाठी गेले होते. आष्टी येथे आरोपींकडून घरचे काम करून घ्यायचे, त्यांचे गुर सांभाळण्याचं काम लावले होते. यादरम्यान कामाचा कुठलाही मोबदला न देता उलट या बालकांना मारहाण केली जात होती. तसेच शिळे आणि सुके अन्न त्यांना खायला देत असल्याची तक्रार यावेळी बालकांनी केली. सततच्या मारहाणीला घाबरून यातील दोन बालके गावातून पळाले. रात्रभर तसेच दुसऱ्या दिवशी पायी प्रवास केल्यानंतर एक अनोळखी व्यक्तीनं या दोन बालकांना पोलिस स्टेशनमध्ये नेले.

त्यानंतर पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर या दोन बालकांना बालगृहात पाठविण्यात आलं. यावेळी बाल समितीच्या सदस्यांनी या बालकांकडे चौकशी केली असता त्यांनी आमच्यासारखे आणखीन १० ते १२ जण गहूखेल या गावात असल्याची माहिती दिली.  त्यानंतर अहिल्यानगर येथील सहायक कामगार आयुक्त आणि बाल संरक्षण अधिकारी यांच्या पथकानं २० जून रोजी कारवाई करत १५ बालकांची सुटका केली.

मुलांना बालगृहात पाठविलं


दरम्यान, या घटनेत सुरुवातीला अहिल्यानगर येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन बालकाच्या तक्रारीवरून झिरो एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षकांच्या तक्रारीवरून ९ आरोपींवर आंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सध्या, यातील सहा मुले बीडच्या बालगृहात तर ९ मुली आर्वी येथील मुलींच्या बालगृहात ठेवण्यात आलं आहे.
Comments
Add Comment

Maharashtra Rain News : IMD चा थेट इशारा! या जिल्ह्यांमध्ये पुढील ४ दिवस पाऊस; तुमचा भाग 'ऑरेंज' की 'यलो'?

मुंबई : महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्यामुळे आणि हे क्षेत्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

'आरएसएस' कार्यक्रमाला सरन्यायाधीशांच्या मातोश्रींच्या उपस्थितीवरून मोठा सस्पेन्स!

ते पत्र खोटं! सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या कार्यक्रमाला जाणार! राजेंद्र गवईंचा खुलासा अमरावती: देशाचे

पावसाचे कारण सांगून गैरहजर रहाणा-या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!

मुंबई : राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीचे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, अशा गंभीर परिस्थितीमध्ये

Maharashtra Rain Update : हवामान विभागाचा 'हाय अलर्ट', राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये मोठा धोका, घराबाहेर पडणे टाळाच!

राज्यात पूरस्थिती गंभीर : मुख्यमंत्री फडणवीसांकडून आढावा मुंबई : राज्यात सध्या पावसाने हाहाकार माजवला असून,

Rain Update : ठाणे जिल्ह्यासाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट; प्रशासन सज्ज, पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर

ठाणे : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ठाणे जिल्ह्यात दि.२८ सप्टेंबर २०२५ रोजी 'रेड अलर्ट' (Red Alert)