'मुलगा सुखरूप पृथ्वीवर परतला, आता काही भीती नाही!" शुभांशू शुक्लाच्या आईवडिलांनी दिली भावनिक प्रतिक्रिया, पंतप्रधानांनीही केले अभिनंदन

नवी दिल्ली: अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेतून यशस्वीरित्या परतल्यानंतर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लाच्या कुटुंबामध्ये आनंदाची लाट पसरली आहे. "मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण होऊन मुलगा सुखरूप परतला, आता कोणतीही भीती नाही" असे भावोद्गार शुभांशु शुक्ला यांच्या आईने काढले. तर त्यांच्या वडिलांनीदेखील आनंद व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदींनी देखील शुभांशु शुक्ला यांचे अभिनंदन करत त्यांना अब्जावधी स्वप्नांचा प्रेरणास्थान म्हटले.


१८ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज मंगळवारी पृथ्वीवर सुरक्षितपणे परतले. त्यांच्या या ऐतिहासिक मोहिमेनंतर संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. या खास प्रसंगी शुभांशूची आई आशा शुक्ला यांनी आनंदाश्रूसोबत आपला आनंद व्यक्त केला.


"मुलगा खूप मोठे मिशन पूर्ण करून परतला आहे. तो कसा गेला आणि कसा परत आला हे पाहणेच खूप मोठी गोष्ट होती. मी सतत देवाला प्रार्थना करत होती की लँडिंग सुरक्षित व्हावे. आता सर्व भीती संपली आहे आणि मी पूर्णपणे निश्चिंत झाले आहे" अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या,


शुभांशूचे वडील शंभू दयाळ शुक्ला यांनीही आनंद व्यक्त करताना सांगितले की "या मोहिमेसाठी आमच्या मुलाला प्रोत्साहन आणि भरभरून आशीर्वाद देणाऱ्या सर्वांचे आम्ही आभार मानतो." शुभांशूच्या कुटुंबाने केक कापत त्यांच्या परतीचा आनंद साजरा केला.



पंतप्रधान मोदींनी केले शुभांशू शुक्ला यांचे अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या खास प्रसंगी अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे अभिनंदन केले. "आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून शुभांशू शुक्ला यांनी धैर्य आणि समर्पण भावनेने अब्जावधी स्वप्नांना प्रेरणा दिली आहे. आपल्या स्वतःच्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेच्या दिशेने हा आणखी एक मैलाचा दगड आहे - गगनयान, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर एक पोस्ट करत शुभांशूचे स्वागत केले.

Comments
Add Comment

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग

Massive Fire : लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून थरारक उड्या

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून

West Bengal's Bold Budget : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २० टक्क्यांनी वाढला; विद्यार्थीनी आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा आणि विविध घटकांना दिलासा देणारा राज्याचा अर्थसंकल्प

Monsoon havoc in Jharkhand : वीज पडून ८ जणांचा मृत्यू, क्रिकेट सामन्यादरम्यान एकाचा दुर्दैवी अंत

रांची (झारखंड) : झारखंडमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. गेल्या २४

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन