Raigad Rain: मुसळधार पावसातही सुट्टीच्या घोषणेस विलंब, विद्यार्थ्यांसह पालकांना मन:स्ताप

सुधागड-पाली : गेले दोन दिवस रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला, असे असतानाही शाळांना सुट्टीच्या घोषणा करताना विलंब झाल्याने विद्यार्थ्यांसह पालांकानाही याचा मन:स्ताप सहन करावा लागला आहे.

रायगड जिल्ह्याला सोमवारपासून पावसाने झोडपले. जिल्हा प्रशासनाने माणगाव, तळा, रोहा, पाली (सुधागड), महाड व पोलादपूर येथे शाळा व महाविद्यालयांना सुट्टीचा आदेश दिला. मात्र हा आदेश येण्यापूर्वीच अनेक विद्यार्थी शाळा व महाविद्यालयांमध्ये पोहोचले होते. त्यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय झाली. सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टीचा आदेश हा उशिरा पोहोचला, परिणामी तोपर्यंत विद्यार्थी शाळा व महाविद्यालयांमध्ये पोहोचले होते. मात्र अशा परिस्थितीत त्यांना मुसळधार पावसात पुन्हा घरी परतावे लागले.

लहान विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी वाढली होती. विद्यार्थ्यांना शाळेतून घरी आणण्यासाठी त्यांना वाटेतच मोठ्या पावसाचा सामना देखील करावा लागला. त्यामुळे पालक देखील संतप्त होते. दरम्यान, सुट्टीचा आदेश हा ठराविक तालुक्यांनाच देण्यात आला. मात्र या तालुक्यांना लागून असलेल्या गावांना देखील पावसाचा फटका बसला. मात्र ही गावं त्या सुट्टी दिलेल्या तालुक्यांमध्ये येत नसल्यामुळे तेथील शाळा व महाविद्यालय मात्र चालूच होती.

सुट्टीच्या आदेशामध्ये स्थानिक परिस्थिती पाहून तेथील प्रशासनाने व सक्षम प्राधिकरणाने सुट्टीचा निर्णय घ्यावा असे नमूद केले असले तरी देखील स्थानिक प्रशासन किंवा सक्षम प्राधिकरण सुट्टी देण्यासाठी पुढाकार घेताना दिसले नाही. वास्तविक पाहता हवामानाचा अंदाज हा आधीच प्रशासनाला माहिती असतो. मात्र महाविद्यालय व शाळांना सुट्टीचा आदेश अतिवृष्टी किंवा वादळाच्या दिवशी पाठवला जातो. म्हणजे मुल शाळेत गेल्यानंतर शासन आदेश देतात. अशा परिस्थितीत पालक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे सुधागड तालुका मनसे अध्यक्ष सुनील साठे यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Ravi Pandit Passes Away : पुण्यातील नामांकित उद्योजक रवी पंडित यांचे निधन; आयटी क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्व हरपले...

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि KPIT Technologies चे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांचे आज (८ मे) पुण्यात निधन झाले. कंपनीने

Chief Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केपीआयटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली

देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या पहिल्या फळीतील मार्गदर्शक उद्योजक हरपला मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या

Yuzi Chahal : युजवेंद्र चहलने वापरली ई - सिगरेट ; विमानातला 'तो' व्हिडिओ होतोयं व्हायरल...

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. हंगाम संपायला आता काही सामने बाकी आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून रोज

कौतुकास्पद ! पेपर विक्रेत्याच्या मुलीने मिळविले शंभर टक्के, शिकवणी न लावता श्रावणीने गाठले यशाचे शिखर

नाशिक :  मनात जिद्द असेल तर आयुष्यातील कठोर प्रसंगांवरही मात करता येते. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. आर्थिक

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

मिरा भाईंदरमधील २५४ एकर जमिनीसाठी; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

मुंबई : मिरा भाईंदर येथील मिठागराची तब्बल २५४ एकर मोक्याची शासकीय जमीन एका खासगी कंपनीच्या घशात जाण्याची