Raigad Rain: मुसळधार पावसातही सुट्टीच्या घोषणेस विलंब, विद्यार्थ्यांसह पालकांना मन:स्ताप

सुधागड-पाली : गेले दोन दिवस रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला, असे असतानाही शाळांना सुट्टीच्या घोषणा करताना विलंब झाल्याने विद्यार्थ्यांसह पालांकानाही याचा मन:स्ताप सहन करावा लागला आहे.

रायगड जिल्ह्याला सोमवारपासून पावसाने झोडपले. जिल्हा प्रशासनाने माणगाव, तळा, रोहा, पाली (सुधागड), महाड व पोलादपूर येथे शाळा व महाविद्यालयांना सुट्टीचा आदेश दिला. मात्र हा आदेश येण्यापूर्वीच अनेक विद्यार्थी शाळा व महाविद्यालयांमध्ये पोहोचले होते. त्यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय झाली. सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टीचा आदेश हा उशिरा पोहोचला, परिणामी तोपर्यंत विद्यार्थी शाळा व महाविद्यालयांमध्ये पोहोचले होते. मात्र अशा परिस्थितीत त्यांना मुसळधार पावसात पुन्हा घरी परतावे लागले.

लहान विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी वाढली होती. विद्यार्थ्यांना शाळेतून घरी आणण्यासाठी त्यांना वाटेतच मोठ्या पावसाचा सामना देखील करावा लागला. त्यामुळे पालक देखील संतप्त होते. दरम्यान, सुट्टीचा आदेश हा ठराविक तालुक्यांनाच देण्यात आला. मात्र या तालुक्यांना लागून असलेल्या गावांना देखील पावसाचा फटका बसला. मात्र ही गावं त्या सुट्टी दिलेल्या तालुक्यांमध्ये येत नसल्यामुळे तेथील शाळा व महाविद्यालय मात्र चालूच होती.

सुट्टीच्या आदेशामध्ये स्थानिक परिस्थिती पाहून तेथील प्रशासनाने व सक्षम प्राधिकरणाने सुट्टीचा निर्णय घ्यावा असे नमूद केले असले तरी देखील स्थानिक प्रशासन किंवा सक्षम प्राधिकरण सुट्टी देण्यासाठी पुढाकार घेताना दिसले नाही. वास्तविक पाहता हवामानाचा अंदाज हा आधीच प्रशासनाला माहिती असतो. मात्र महाविद्यालय व शाळांना सुट्टीचा आदेश अतिवृष्टी किंवा वादळाच्या दिवशी पाठवला जातो. म्हणजे मुल शाळेत गेल्यानंतर शासन आदेश देतात. अशा परिस्थितीत पालक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे सुधागड तालुका मनसे अध्यक्ष सुनील साठे यांनी सांगितले.
Comments
Add Comment

गणेशोत्सव काळात एसटीला बाप्पा पावला

१ कोटी ८० लाखांचे उत्पन्न; ३१,५४६ प्रवाशांचा प्रवास पालघर(प्रतिनिधी) : पालघर एसटी विभागाच्या माध्यमातून

‘ओसी’ नसलेल्या इमारतीसुद्धा रडारवर

बांधकाम परवानग्यांचे संकलन सुरू विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार पालिका क्षेत्रात टोलेजंग इमारती उभ्या करून,

आता शनिवारी-रविवारीही महापालिकेत होणार विवाह नोंदणी

सोमवार ते शुक्रवारमध्ये दररोज ‘जलद विवाह नोंदणी सेवा’ मुंबई (खास प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या सार्वजनिक

मंत्रालयातच फसवणूक! सरकारी नोकरीच्या नावाखाली घेतली मुलाखत, आणि...

नागपूर: सरकारी नोकरीचे स्वप्न प्रत्येकांचे असते, त्यासाठी तरुणवर्ग विविध भरती प्रक्रियेची तयारी करतात, मुलाखती

महापालिकेचा रेबीजमुक्त मुंबईसाठी पुढाकार

भटक्या श्वानांचे लसीकरण २०२६ पर्यंत पूर्ण होणार मुंबई (खास प्रतिनिधी) : श्वानांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज

मुंबईतील ५७४ रस्त्यांची कामे ऑक्टोबरपासून सुरू होणार

अर्धवट कामे पूर्ण झाल्यानंतरच नवीन रस्त्यांची कामे सुरू होणार मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने