Raigad Rain: मुसळधार पावसातही सुट्टीच्या घोषणेस विलंब, विद्यार्थ्यांसह पालकांना मन:स्ताप

सुधागड-पाली : गेले दोन दिवस रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला, असे असतानाही शाळांना सुट्टीच्या घोषणा करताना विलंब झाल्याने विद्यार्थ्यांसह पालांकानाही याचा मन:स्ताप सहन करावा लागला आहे.

रायगड जिल्ह्याला सोमवारपासून पावसाने झोडपले. जिल्हा प्रशासनाने माणगाव, तळा, रोहा, पाली (सुधागड), महाड व पोलादपूर येथे शाळा व महाविद्यालयांना सुट्टीचा आदेश दिला. मात्र हा आदेश येण्यापूर्वीच अनेक विद्यार्थी शाळा व महाविद्यालयांमध्ये पोहोचले होते. त्यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय झाली. सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टीचा आदेश हा उशिरा पोहोचला, परिणामी तोपर्यंत विद्यार्थी शाळा व महाविद्यालयांमध्ये पोहोचले होते. मात्र अशा परिस्थितीत त्यांना मुसळधार पावसात पुन्हा घरी परतावे लागले.

लहान विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी वाढली होती. विद्यार्थ्यांना शाळेतून घरी आणण्यासाठी त्यांना वाटेतच मोठ्या पावसाचा सामना देखील करावा लागला. त्यामुळे पालक देखील संतप्त होते. दरम्यान, सुट्टीचा आदेश हा ठराविक तालुक्यांनाच देण्यात आला. मात्र या तालुक्यांना लागून असलेल्या गावांना देखील पावसाचा फटका बसला. मात्र ही गावं त्या सुट्टी दिलेल्या तालुक्यांमध्ये येत नसल्यामुळे तेथील शाळा व महाविद्यालय मात्र चालूच होती.

सुट्टीच्या आदेशामध्ये स्थानिक परिस्थिती पाहून तेथील प्रशासनाने व सक्षम प्राधिकरणाने सुट्टीचा निर्णय घ्यावा असे नमूद केले असले तरी देखील स्थानिक प्रशासन किंवा सक्षम प्राधिकरण सुट्टी देण्यासाठी पुढाकार घेताना दिसले नाही. वास्तविक पाहता हवामानाचा अंदाज हा आधीच प्रशासनाला माहिती असतो. मात्र महाविद्यालय व शाळांना सुट्टीचा आदेश अतिवृष्टी किंवा वादळाच्या दिवशी पाठवला जातो. म्हणजे मुल शाळेत गेल्यानंतर शासन आदेश देतात. अशा परिस्थितीत पालक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे सुधागड तालुका मनसे अध्यक्ष सुनील साठे यांनी सांगितले.
Comments
Add Comment

दीपिकाला सोडून आता संदीप रेड्डी वांगांच्या ‘स्पिरिट’मध्ये ‘नॅशनल क्रश’ ची एंट्री

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी ‘स्पिरिट’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

जेवल्यानंतर एक ग्लास ताक पिण्याने आरोग्याला होतात अनेक फायदे

ताक हे आरोग्यासाठी गुणकारी असून पूर्वीपासूनच आहारामध्ये ताकाचा समावेश केला जातो. ताक आणि दही हे दोन्हीही पदार्थ

प्लंबिंगपासून ते दिग्दर्शनापर्यंतचा प्रवास, ‘रुबाब’मधून मराठी सिनेसृष्टीत नव्या दिग्दर्शकाची एन्ट्री

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत नवनव्या विषयांसोबतच स्वतःच्या संघर्षातून घडलेले नवे दिग्दर्शक आपली ओळख निर्माण

आजचे Top Stocks Picks- देवयानी इंटरनॅशनलसह 'या' ६ शेअरला जेएमएफएल फायनांशियलकडून सल्ला

मुंबई: जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज लिमिटेड (JMFL) ब्रोकरेज कंपनीने गुंतवणूकदारांना काही

अभिनेता शाहरुख खान वादाच्या भोवऱ्यात ..त्या निर्णयामुळे शाहरुख खान अडचणीत ?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असलेले नाव आहे.मात्र,आता शाहरुख खान मोठ्या अडचणीत फसला.हेच नाही तर

धर्मेंद्र यांच्या अखेरच्या सिनेमाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद ; पहिल्याच दिवशी तंगडी कमई

Ikkis Box Office : प्रेक्षकवर्ग हा आतुरतेने हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत होता.कारण या चित्रपमध्ये सगळ्यांचे