Raigad Rain: मुसळधार पावसातही सुट्टीच्या घोषणेस विलंब, विद्यार्थ्यांसह पालकांना मन:स्ताप

सुधागड-पाली : गेले दोन दिवस रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला, असे असतानाही शाळांना सुट्टीच्या घोषणा करताना विलंब झाल्याने विद्यार्थ्यांसह पालांकानाही याचा मन:स्ताप सहन करावा लागला आहे.

रायगड जिल्ह्याला सोमवारपासून पावसाने झोडपले. जिल्हा प्रशासनाने माणगाव, तळा, रोहा, पाली (सुधागड), महाड व पोलादपूर येथे शाळा व महाविद्यालयांना सुट्टीचा आदेश दिला. मात्र हा आदेश येण्यापूर्वीच अनेक विद्यार्थी शाळा व महाविद्यालयांमध्ये पोहोचले होते. त्यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय झाली. सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टीचा आदेश हा उशिरा पोहोचला, परिणामी तोपर्यंत विद्यार्थी शाळा व महाविद्यालयांमध्ये पोहोचले होते. मात्र अशा परिस्थितीत त्यांना मुसळधार पावसात पुन्हा घरी परतावे लागले.

लहान विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी वाढली होती. विद्यार्थ्यांना शाळेतून घरी आणण्यासाठी त्यांना वाटेतच मोठ्या पावसाचा सामना देखील करावा लागला. त्यामुळे पालक देखील संतप्त होते. दरम्यान, सुट्टीचा आदेश हा ठराविक तालुक्यांनाच देण्यात आला. मात्र या तालुक्यांना लागून असलेल्या गावांना देखील पावसाचा फटका बसला. मात्र ही गावं त्या सुट्टी दिलेल्या तालुक्यांमध्ये येत नसल्यामुळे तेथील शाळा व महाविद्यालय मात्र चालूच होती.

सुट्टीच्या आदेशामध्ये स्थानिक परिस्थिती पाहून तेथील प्रशासनाने व सक्षम प्राधिकरणाने सुट्टीचा निर्णय घ्यावा असे नमूद केले असले तरी देखील स्थानिक प्रशासन किंवा सक्षम प्राधिकरण सुट्टी देण्यासाठी पुढाकार घेताना दिसले नाही. वास्तविक पाहता हवामानाचा अंदाज हा आधीच प्रशासनाला माहिती असतो. मात्र महाविद्यालय व शाळांना सुट्टीचा आदेश अतिवृष्टी किंवा वादळाच्या दिवशी पाठवला जातो. म्हणजे मुल शाळेत गेल्यानंतर शासन आदेश देतात. अशा परिस्थितीत पालक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे सुधागड तालुका मनसे अध्यक्ष सुनील साठे यांनी सांगितले.
Comments
Add Comment

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

सुदानमध्ये ७७ लाख लोक करतायत उपासमारीचा सामना, लाखो मुलांना कुपोषणाचा धोका

सुदान (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात गरीब देश दक्षिण सुदान सध्या भयंकर संकटाचा सामना करत आहेत. तेथे आलेल्या

'या' तारखेपासून विंडोज १०चा सपोर्ट होणार बंद

वॉशिंग्टन डीसी :  टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जगभरात मोठ्या

मुंबईतले आठ हजार बॅनर हटवले

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबईत नवरात्रौत्सवात मोठ्याप्रमाणात शुभेच्छांचे बॅनर आणि फलक लावण्यात आले होते. यामुळे

रिया चक्रवर्तीला दिलासा: मुंबई उच्च न्यायालयाने पासपोर्ट परत करण्याचे दिले आदेश!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट