भूमी अभिलेख अपिलांसाठी मुंबईत 'लोक अदालत': रखडलेली प्रकरणं मार्गी लागणार!

मुंबई : कोकण विभागातील भूमी अभिलेखांच्या प्रलंबित अपिल प्रकरणांना गती देण्यासाठी एक महत्त्वाची 'लोक अदालत' आयोजित करण्यात आली आहे. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या निर्देशानुसार, ही लोक अदालत २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, उपसंचालक, भूमी अभिलेख, कोकण विभाग, मुंबई यांच्या कार्यालयात (डी.डी.बिल्डींग, १ ला मजला, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई- ४००००१) पार पडेल.


या लोक अदालतीचा मुख्य उद्देश कोकण विभागातील प्रलंबित अपिल प्रकरणांवर सुसंवादातून न्याय व जलद निर्णय घेणे हा आहे. यामुळे वेळेची आणि संसाधनांची बचत होऊन प्रकरणे तातडीने आणि पारदर्शकपणे निकाली काढण्यास मदत होईल.


संबंधित नागरिक किंवा अपीलकर्त्यांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सोबत घेऊन उपस्थित राहावे, जेणेकरून त्यांच्या प्रकरणांचा योग्य आणि अंतिम निपटारा करता येईल.


या संदर्भात अधिक माहितीसाठी, उपसंचालक, भूमी अभिलेख, कोकण विभाग, मुंबई यांच्या कार्यालयाशी किंवा व्हॉट्सॲप क्रमांक - ७७१०९६१८३८ वर केवळ व्हॉट्सॲप संदेशाद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

राज्यभरात आज दसरा मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे, नेस्कोमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे, तर बीडमध्ये पंकजा मुंडेंचा मेळावा

मुंबई : राज्यभरात आज विविध राजकीय नेत्यांचे दसरा मेळावे होत आहेत.  यंदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि

८ ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार

मुंबई (प्रतिनिधी) : २९ सप्टेंबरपासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र २ ते ७ ऑक्टोबर दरम्यान

सेंट झेवियरमधील भूमिगत पाण्याच्या साठवण टाकीचे नियोजन फसले

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील सर्वात मोठे पुरप्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जात असलेल्या हिंदमाता सिनेमा

अतिवृष्टी, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी आणखी एक संधी

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश

कोस्टल रोड- मार्वे रोड जोडणाऱ्या मार्गावरील पुलांच्या बांधकामाला आता गती, मागवल्या तब्बल २२०० कोटी रुपयांच्या निविदा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड मार्वे रोडशी जोडणारे नवीन मार्ग आणि

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द

मुंबई : राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के दरवाढ रद्द