रायगड-रत्नागिरीत पूरस्थिती: सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, महाड शहरात पाणी शिरले!

  77

महाड: गेल्या २४ तासांपासून रायगड जिल्हा आणि महाबळेश्वर विभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील काळ आणि सावित्री नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. याचा परिणाम म्हणून, महाड शहराच्या सखल भागांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.



नद्यांना पूर, वाहतूक विस्कळीत


गेल्या २४ तासांत महाड तालुक्यात ५८ मिमी तर महाबळेश्वर खोऱ्यात तब्बल १४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सकाळपासून रायगड आणि विन्हेरे परिसरात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे काळ आणि सावित्री नद्यांना पूर आला असून, सकाळी ११ वाजताच शहरातील सुकट गल्ली आणि दस्तुरी नाका ते नातेखिंड दरम्यानच्या रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे.


महाड-म्हाप्रळ मार्गावर असलेल्या रावढळ पुलावरून नागेश्वरी नदीचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. विन्हेरे भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागेश्वरी नदीचे पात्रही तुडुंब भरले असून, मल्लिकार्जुन मंदिरासमोरील पुलावरून पाणी वाहत आहे.



नागरिकांना सतर्कतेचा इशारा, शाळांना सुट्टी


सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड नगर परिषदेने सायरन वाजवून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच, दक्षिण रायगडमधील शाळा-महाविद्यालयांना आज सकाळपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुराचे पाणी महाडच्या बाजारपेठेत शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

टेरिफवाढीचा फटका भारताच्या जीडीपीत ! 'हे' होऊ शकतात गंभीर परिणाम

प्रतिनिधी: युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून घोषित केलेल्या आणखी २५% टेरिफवाढीचा परिणाम

सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांकडून नकारात्मक कौल ट्रम्प यांच्या नव्या निर्णयानंतर शेअर बाजारात भूकंप!

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात गिफ्ट निफ्टीतील घसरणीनेच आजही गुंतवणूकदारांचा मूड ऑफ होण्याचीच अधिक शक्यता

५०% टेरिफ झाले आता ट्रम्प यांची सेमीकंडक्टरवर मोठी धमकी!

मोहित सोमण: एकूण ५०% टेरिफ वाढीनंतर आता ट्रम्प यांनी नवी धमकी दिली आहे. अमेरिकेत उत्पादन न केल्यास सेमीकंडक्टर

बेस्ट तोट्यात जाण्यास तत्कालीन सत्ताधारी उबाठा शिवसेनाच जबाबदार, काँग्रेसचा घरचा आहेर!

काँग्रेसचे माजी आमदार मधु चव्हाण यांचा आरोप भाडेतत्वावरील खासगी बसेस बंद करा मुंबई : बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

नियमितपणे आढावा, समन्वय साधणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई : राज्यातील पाच

माधुरी लवकरच कोल्हापूरला परतणार!

कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश; माधुरीला परत पाठवण्याबाबत वनताराकडून आश्वासन कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या