आनंदाची बातमी! पृथ्वीवर सुखरूप परतले शुभांशु शुक्ला

भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता कॅलिफोर्निया किनाऱ्यावर झाले लँड


कॅलिफोर्निया: १८ दिवसांच्या आयएसएस मुक्कामानंतर भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज १५ जुलै रोजी, भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता, त्यांच्या साथीदारांसह सॅन दिएगोजवळील समुद्रात सुखरूप उतरले. कॅलिफोर्निया किनाऱ्याजवळील पॅसिफिक महासागरात स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूलचे पॅराशूट चारही अंतराळवीरांना घेऊन उतरले आहे.

परतीचा आव्हानात्मक प्रवास


शुभांशु शुक्ला आणि टीमला पुन्हा पृथ्वीवर घेऊन येणारा हा प्रवास देखील शास्त्रज्ञासाठी आव्हानात्मक होता. कारण पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या ड्रॅगन कॅप्सूलला पृथ्वीच्या वातावरणात आणि गुरुत्वाकर्षण क्षेत्रात स्वतःला व्यवस्थापित करणे सर्वात महत्वाचे होते. त्यानुसार ड्रॅगन कॅप्सूलने २७००० किमी/तास वेगाने वातावरणात प्रवेश केला, ज्याचे तापमान अंदाजे १६००° सेल्सिअसपर्यंत पोहोचले. ज्यामुळे काही काळ नियंत्रण कक्षासोबत कॅप्सूलचा संपर्क तुटला. दरम्यान
लँडिंग आणि पुनर्प्राप्ती वातावरणातून बाहेर पडल्यानंतर, ड्रॅगन कॅप्सूलचे लहान आणि मोठे पॅराशूट उघडले गेले, ज्यामुळे अंतराळयानाची गती कमी होण्यासाठी आणि कॅप्सूल समुद्रात सुरक्षितपणे उतरवणे शक्य झाले. कॅप्सूल समुद्रात उतरल्यानंतर तिथे पूर्वीपासूनच तैनात असलेल्या पुनर्प्राप्ती पथकाच्या बोटी आणि हेलिकॉप्टरद्वारे शुभांशू आणि त्याच्या टीमला ताबडतोब वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात आले.


 

लँडिंगनंतर १० दिवसाचा एकांतवासात


शुभांशू आणि अ‍ॅक्स-४ टीमला १० दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे, जेणेकरून आरोग्य तपासणी करण्यासाठी आणि अंतराळाच्या परिणामांमधून बरे होण्यासाठी वेळ मिळेल. हे पुनरागमन भारतासाठी अभिमानाचा क्षण असेल.

 
Comments
Add Comment

अमेरिकेकडून होर्मुज सामुद्रधुनीजवळील इराणी भागात ५,००० पौंडांचा बॉम्ब हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेने बुधवारी पहाटे इराणवर अनेक मोठे हल्ले केले आहेत. अमेरिकन सैन्याने सांगितले की या

सौदी अरेबियाकडून भारताला रेड सी मार्गे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरातील संकट अधिक

इराण-इस्रायल युद्ध सुरु राहिले तर उपासमारी येईल?; डब्ल्यूएफपीने काय सांगितले?, जाणून घ्या

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाने (WFP) इशारा दिला आहे की, अमेरिका, इस्रायल आणि इराण

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

Dubai Airport : दुबई विमानतळ बंद : एअर इंडियाची सर्व उड्डाणे तात्पुरती रद्द; प्रवाशांमध्ये गोंधळ

पश्चिम आशियात तणाव कायम असताना, एअर इंडियाने सोमवारी (१६ मार्च) दुबईकडे जाणारी आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

Iran-US-Israel War : इराणमधील भारतीय दूतावासकडून पुन्हा एकदा सूचना जारी

इराणमध्ये भू-राजकीय संकट सुरू झाल्यानंतर मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार