आनंदाची बातमी! पृथ्वीवर सुखरूप परतले शुभांशु शुक्ला

भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता कॅलिफोर्निया किनाऱ्यावर झाले लँड


कॅलिफोर्निया: १८ दिवसांच्या आयएसएस मुक्कामानंतर भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज १५ जुलै रोजी, भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता, त्यांच्या साथीदारांसह सॅन दिएगोजवळील समुद्रात सुखरूप उतरले. कॅलिफोर्निया किनाऱ्याजवळील पॅसिफिक महासागरात स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूलचे पॅराशूट चारही अंतराळवीरांना घेऊन उतरले आहे.

परतीचा आव्हानात्मक प्रवास


शुभांशु शुक्ला आणि टीमला पुन्हा पृथ्वीवर घेऊन येणारा हा प्रवास देखील शास्त्रज्ञासाठी आव्हानात्मक होता. कारण पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या ड्रॅगन कॅप्सूलला पृथ्वीच्या वातावरणात आणि गुरुत्वाकर्षण क्षेत्रात स्वतःला व्यवस्थापित करणे सर्वात महत्वाचे होते. त्यानुसार ड्रॅगन कॅप्सूलने २७००० किमी/तास वेगाने वातावरणात प्रवेश केला, ज्याचे तापमान अंदाजे १६००° सेल्सिअसपर्यंत पोहोचले. ज्यामुळे काही काळ नियंत्रण कक्षासोबत कॅप्सूलचा संपर्क तुटला. दरम्यान
लँडिंग आणि पुनर्प्राप्ती वातावरणातून बाहेर पडल्यानंतर, ड्रॅगन कॅप्सूलचे लहान आणि मोठे पॅराशूट उघडले गेले, ज्यामुळे अंतराळयानाची गती कमी होण्यासाठी आणि कॅप्सूल समुद्रात सुरक्षितपणे उतरवणे शक्य झाले. कॅप्सूल समुद्रात उतरल्यानंतर तिथे पूर्वीपासूनच तैनात असलेल्या पुनर्प्राप्ती पथकाच्या बोटी आणि हेलिकॉप्टरद्वारे शुभांशू आणि त्याच्या टीमला ताबडतोब वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात आले.


 

लँडिंगनंतर १० दिवसाचा एकांतवासात


शुभांशू आणि अ‍ॅक्स-४ टीमला १० दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे, जेणेकरून आरोग्य तपासणी करण्यासाठी आणि अंतराळाच्या परिणामांमधून बरे होण्यासाठी वेळ मिळेल. हे पुनरागमन भारतासाठी अभिमानाचा क्षण असेल.

 
Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल