सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप झाले वेगळे, ७ वर्षांपूर्वी झाले होते लग्न

a भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने रविवारी आपला जोडीदार पारुपल्ली कश्यपासून वेगळे होण्याची घोषणा केली. सायनाने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून याची माहिती दिली आहे. सायना आणि पारुपल्ली यांचे ७ वर्षांपूर्वी लग्न झाल होते. दोघेही हैदराबाद येथे पुलेला गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत होते. दोघेही दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१८मध्ये त्यांनी लग्न केले होते.


सायना नेहवालने २०१२मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते तर २०१५मध्ये वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंगमध्ये तिने पहिले स्थान मिळवत इतिहास रचला होता. ती जगातील नंबर वन बनणारी पहिली भारतीय महिला खेळाडू होती. खेळामध्ये ती स्पोर्ट्स आयकॉन होती. तर पारुपल्ली कश्यपने २०१४मध्ये कॉमनवेल्स गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले होते. तसेच वर्ल्ड रँकिंगमध्ये तो सहाव्या स्थानावर पोहोचला होता. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी करत आपली ओळख बनवली होती.



सायना नेहवालने रविवारी रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर एक धक्कादायक विधान केले. तिने लिहिले, आयुष्य कधी कधी आपल्याला वेगवेगळ्या दिशेला नेते. खूप विचार विनिमयानंतर कश्यप पारुपल्ली आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आम्ही एकमेकांसाठी शांतता, प्रगती आणि दिलासेचा मार्ग निवडला आहे. मी त्या क्षणांसाठी आभारी आहे आणि पुढील प्रवास चांगला होईल अशी आशा करते. या दरम्यान आमच्या प्रायव्हसीचा आदार राखण्यासाठी धन्यवाद. दरम्यान, कश्यपकडून अद्याप कोणतेही विधान आलेले नाही.


Comments
Add Comment

ॲशेस मालिका : सिडनीच्या मैदानात स्टीव्ह स्मिथची बॅट तळपली

'द वॉल' द्रविडचा विक्रम मोडीत काढून ३७ वे कसोटी शतक पूर्ण सिडनी : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने

हरमनप्रीतची झेप; दीप्तीचे अव्वल स्थान निसटले!

आयसीसी टी-२० क्रमवारी जाहीर दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या महिला टी-२०

श्रेयस अय्यर फिटनेस परीक्षेत उत्तीर्ण

विजय हजारे करंडक : मुंबई, कर्नाटक, सौराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत दाखल मुंबई : विजय हजारे करंडक २०२५-२६ स्पर्धेच्या

मुस्तफिजूर रहमानसाठी संपूर्ण बांगलादेश वेठीला!

आयपीएल प्रसारणावरील बंदीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये संताप नवी दिल्ली : बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल फ्रँचायझी

आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे नवीन वेळापत्रक?

भारतात खेळण्यास नकार देऊन बांगलादेशचा बीसीसीआयला दणका नवी दिल्ली : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ बांगलादेशमुळे

बीसीसीआयच्या आदेशामुळे KKR ने मुस्तफिजूरला सोडल, ९.२० बसणार फटका ?

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. बीसीसीआयच्या