कशेडी घाटात धोकादायक दरडींवर जाळ्यांचे कवच

गल्वेनाईज्ड स्टील लावून दिला तात्पुरता दिलासा


पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटामध्ये उभ्या कापलेल्या डोंगरातून लाल मातीचे ढिगारे कोसळतात. यासाठी गल्वेनाईज्ड स्टील जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. यामुळे घाटातील वाहतूकीच्यावेळी अचानक दरडी कोसळून ठप्प होणार नाही असा तात्पुरता दिलासा मिळाला आहे.


कशेडी घाटामध्ये २००५पासून दरडी कोसळण्याचे सातत्य कायम आहे. तीन वर्षांपूर्वी एका फार्महाऊसकडे जाण्यासाठी चोळई येथील डोंगरावर रस्ता तयार केल्यानंतर डोंगरातून लालमातीचा ढिगारा दरडींसह महामार्ग व्यापून दरीकडील बाजूच्या लोकवस्तीतील घरांना धोका निर्माण झाला होता. चौपदरीकरणाचे काम सुरू असताना महामार्गालगतचे डोंगर उभे कापण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना झाल्या. यामुळे महामार्ग बांधकाम विभागामार्फत रस्ता आणि डोंगराच्या पायथ्याशी काँक्रीटच्या संरक्षक भिंती उभारल्या. २० ते ३५ फूट उंच उभ्या कापलेल्या डोंगरातून सुटणारे दगड आणि लालमातीचे ढिगारे साधारणपणे ३ ते ९ फूट उंचीच्या या काँक्रीटच्या संरक्षक भितीमुळे महामार्गावर कोसळण्यास प्रतिबंध होतो नसल्याने काँक्रीटच्या संरक्षक भिंती निरुपयोगी ठरून वाहतुकीला असलेला दरडींचा धोका कायम राहिला असल्याचे स्पष्ट झाले. काँक्रीटच्या संरक्षक भिंतींवर अनेक ठिकाणी मोठमोठ्या आकाराच्या दरडी कोसळून स्थिरावल्याचे तरीही त्या दरडी कोसळतील की काय अशी धडकी भरवणारे दृश्य दिसून येत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील चोळई व धामणदेवी भोगाव या दरडग्रस्त क्षेत्रावर महामार्ग बांधकाम विभागामार्फत उभ्या कापलेल्या डोंगरातून कोसळू पाहणाऱ्या धोकादायक दरडींवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून गल्वेनाईज्ड स्टीलच्या ३०-३५ फूट उंच जाळ्या टाकण्यात येत आहेत.


चोळई गावठाणापासून धामणदिवीपर्यंत उभ्या कापलेल्या डोंगरातून कोसळणाऱ्या दरडींना काही प्रमाणात प्रतिबंध करण्यात आला आहे. दरडग्रस्त भागात धोकादायक दरडींवर गल्वेनाईज्ड स्टीलच्या जाळीचे सुरक्षा कवच टाकण्यात येत असल्याने वाहनचालक व प्रवासी जनतेला तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी डोंगरातून महाकाय दरडी अथवा लाल मातीचे ढिगारे मोठ्या प्रमाणात कोसळल्यास गल्वेनाईज्ड स्टीलच्या जाळ्या तकलादू उपाययोजना ठरणार आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग