चीन दौऱ्यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

बीजिंग : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर चीनच्या दौऱ्यावर आहेत. भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्यादृष्टीने हा दौरा महत्त्वाचा आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांच्याशी चर्चा केली. आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुंता बघता भारत आणि चीन यांनी द्वीपक्षीय चर्चेतून एकमेकांविषयीचा विश्वास वाढेल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. विचारांची खुली देवाणघेवाण झाली आणि एकमेकांविषयीचा विश्वास वाढला तरच दोन्ही देशांतील मैत्री वृद्धिंगत होईल. दोन्ही देशांच्या हितांचे रक्षण करणे शक्य होईल यावर चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.

परराष्ट्र मंत्री त्यांच्या दोन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात सकाळी सिंगापूरहून बीजिंगला पोहोचले. जयशंकर चीनच्या तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत सहभागी होण्यासाठी चीन दौऱ्यावर आहेत. भारत आणि चीन दरम्यान २०२० मध्ये लडाखमध्ये तणाव निर्माण झाला. यानंतर पहिल्यांदाच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर चीनच्या दौऱ्यावर आहेत. सकारात्मक चर्चेने एस. जयशंकर यांच्या चीन दौऱ्याची सुरुवात झाली आहे. दौरा यशस्वी होईल, असा विश्वास एस. जयशंकर यांनी व्यक्त केला.

भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचे सामान्यीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कैलास मानसरोवर यात्रा हा या प्रक्रियेचा एक भाग आहे. मानसरोवरला जाण्यासाठीचा सोपा मार्ग सध्या ज्या भूभाभागत चीनचे नियंत्रण आहे त्या भागातून जातो. भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चर्चेअंती चीनने या मार्गाचा वापर करुन पर्यटकांना मानसरोवला जाण्याची परवानगी दिली आहे. आता आणखी काही मुद्यांवर चर्चा होणार आहे. चर्चेद्वारे मैत्री वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीतही सहभागी होणार आहेत. तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठ होत आहे. या बैठकीत एस. जयशंकर भारताची बाजू मांडतील तसेच आशियाच्या विकासात परस्पर सहकार्यातून द्यायचे योगदान या विषयावर सविस्तर बोलणार आहेत. या व्यतिरिक्त परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या सदस्यांशी द्विपक्षीय चर्चा पण करणार आहेत.
Comments
Add Comment

इराणमधील हिंसक आंदोलनात आतापर्यंत ५ हजार जणांचा मृत्यू

तेहरान(वृत्तसंस्था): इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे आतापर्यंत किमान पाच हजार जणांचा मृत्यू झाला

महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी दुमदुमली झ्युरिकची भूमी...

महापालिका निवडणुकीतील यशाबद्दल ठिकठिकाणी अभिनंदन झ्युरिक :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे वर्ल्ड इकोनॉमिक

भारताचा पाकिस्तानवर 'फार्मा' स्ट्राइक!

अफगाणिस्तानमध्ये भारतीय औषधांचा दबदबा काबुल : अफगाणिस्तानच्या फार्मा बाजारात सध्या मोठा बदल पाहायला मिळत आहे.

भारताच्या मदतीने श्रीलंकेत तिसरा बेली ब्रिज पूर्ण

कँडी - नुवारा एलिया मार्ग खुला कोलंबो : श्रीलंकेत आलेल्या ‘दित्वाह’ वादळानंतर भारत सरकारकडून राबवण्यात येत

थायलंडमधील रेल्वेवर क्रेन कोसळल्याने २२ जणांचा मृत्यू

बँकॉक : थायलंडमध्ये एक अतिशय भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. थायलंडच्या ईशान्य प्रांतात एक अवजड क्रेन रेल्वेवर

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन