सुवर्ण मंदिर आणि दुर्ग्याना मंदिरावर बॉम्ब हल्ल्याची धमकी

अमृतसर : पंजाबच्या अमृतसर येथील सुवर्ण मंदिर आणि दुर्ग्याना मंदिरावर बॉम्ब हल्ल्याची धमकी देणारे पत्र पाठवण्यात आले आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या नावानी लिहीलेले हे धमकीचे पत्र अमृतसर रेल्वे स्टेशनच्या अधीक्षकांना मिळाले आहे. त्यानंतर पोलिसांनी धार्मिक स्थळांभोवती आणि शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. रेल्वे स्टेशनसह इतर सार्वजनिक ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


याबाबत पोलिस आयुक्त सुधांशू शेखर श्रीवास्तव यांच्या आदेशानुसार सुवर्ण मंदिर आणि दुर्गायन मंदिराची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. तिथे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवले जात आहे. डीसीपी (कायदा आणि सुव्यवस्था) अमरिक सिंग पवार यांनी शहरातील रहिवाशांना पोलिसांना सहकार्य करण्याचे आणि अफवा पसरवणाऱ्यांबद्दल तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. तब्बल 2 पानांचे हे पत्र हिंदी भाषेमध्ये लिहिले आहे.


पत्र लिहिणाऱ्याने स्वतःला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा एरिया कमांडर तस्लीम मौलवी असे म्हंटले आहे. तसेच त्याने आपले पत्ता जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानचे कराची असा नमूद केला आहे. पत्रात लिहिले आहे की त्यांची संघटना कोणत्याही परिस्थितीत अमरनाथ यात्रा होऊ देणार नाही. या यात्रेत सहभागी होणाऱ्या कोणत्याही हिंदू किंवा शीख व्यक्तीला जम्मू मध्येच बॉम्बने उडवून दिले जाईल.' पत्रात लिहिले आहे की, 'आम्ही इशारा देत आहोत की कोणीही अमरनाथ यात्रा करू नये. लवकरच जम्मू रेल्वे स्टेशन, पठाणकोट, अमृतसर, फिरोजपूर, जयपूर, जोधपूर आणि बिकानेर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून दिली जातील. यासोबतच, अमृतसरचे सुवर्ण मंदिर आणि दुर्ग्याना मंदिर देखील उद्ध्वस्त केले जाईल. लवकरच, जम्मू-काश्मीर आणि पंजाबची भूमी रक्ताने रंगवली जाईल असा इशारा देण्यात आलाय.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे