उज्ज्वल निकम होणार राज्यसभा खासदार, राष्ट्रपतींकडून झाले नामनिर्देशित

नवी दिल्ली : वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रश्न समजून घेण्यास मदत व्हावी या उद्देशाने राष्ट्रपतींकडून विविध क्षेत्रातील निवडक मान्यवरांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले जाते. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल देवराव निकम, केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मस्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले आहे.

उज्ज्वल देवराव निकम हे प्रसिद्ध वकील आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे. मुंबईत झालेल्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सरकारी वकील म्हणून त्यांनी काम केले होते. तसेच त्यांनी दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध सरकारी वकील म्हणून सरकारची बाजू मांडली होती. काही महिन्यांपूर्वी उज्ज्वल निकम यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय झाला होता. निवडणुकीतील पराभवानंतर उज्ज्वल निकम राजकारणातून संन्यास घेणार का असा प्रश्न विचारला जात होता. या पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम राज्यसभेसाठी नामनिर्देशित झाले आहेत.



कोण आहेत उज्ज्वल निकम ?

उज्ज्वल निकम यांचा जन्म जळगाव येथे झाला. त्यांचे वडील देवराव माधवराव निकम हे देखील बॅरिस्टर होते. त्यांनी विज्ञान विषयात बॅचलर पदवी प्राप्त केली आणि नंतर जळगाव येथील एस.एस. मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले. उज्ज्वल निकम यांनी टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांची हत्या, भाजप नेते प्रमोद महाजन यांची हत्या आणि मुंबई सामूहिक बलात्कार यासारख्या अनेक हायप्रोफाइल खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून तपास संस्थेची बाजू मांडली होती.
Comments
Add Comment

Krishna Heritage Tower : भारतात उभे राहणार ४३० फुटांचे सर्वात उंच आध्यात्मिक स्थळ; लवकरच साकारणार 'हरे कृष्ण हेरिटेज टॉवर'

हैदराबाद : आपले गजबजलेले रस्ते, शतकानुशतके जुने वास्तूशिल्प आणि लज्जतदार खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेले

Assam Emergency Landing Highway: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या विशेष 'इमर्जन्शी लँडिंग' सुविधेची सुरुवात

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली