उज्ज्वल निकम होणार राज्यसभा खासदार, राष्ट्रपतींकडून झाले नामनिर्देशित

नवी दिल्ली : वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रश्न समजून घेण्यास मदत व्हावी या उद्देशाने राष्ट्रपतींकडून विविध क्षेत्रातील निवडक मान्यवरांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले जाते. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल देवराव निकम, केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मस्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले आहे.

उज्ज्वल देवराव निकम हे प्रसिद्ध वकील आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे. मुंबईत झालेल्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सरकारी वकील म्हणून त्यांनी काम केले होते. तसेच त्यांनी दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध सरकारी वकील म्हणून सरकारची बाजू मांडली होती. काही महिन्यांपूर्वी उज्ज्वल निकम यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय झाला होता. निवडणुकीतील पराभवानंतर उज्ज्वल निकम राजकारणातून संन्यास घेणार का असा प्रश्न विचारला जात होता. या पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम राज्यसभेसाठी नामनिर्देशित झाले आहेत.



कोण आहेत उज्ज्वल निकम ?

उज्ज्वल निकम यांचा जन्म जळगाव येथे झाला. त्यांचे वडील देवराव माधवराव निकम हे देखील बॅरिस्टर होते. त्यांनी विज्ञान विषयात बॅचलर पदवी प्राप्त केली आणि नंतर जळगाव येथील एस.एस. मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले. उज्ज्वल निकम यांनी टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांची हत्या, भाजप नेते प्रमोद महाजन यांची हत्या आणि मुंबई सामूहिक बलात्कार यासारख्या अनेक हायप्रोफाइल खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून तपास संस्थेची बाजू मांडली होती.
Comments
Add Comment

Delhi Earthquake : ‘दिल्ली-एनसीआर’सह उत्तर भारतात ५.९ तीव्रतेचा भूकंप

- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल)

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न