उज्ज्वल निकम होणार राज्यसभा खासदार, राष्ट्रपतींकडून झाले नामनिर्देशित

नवी दिल्ली : वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रश्न समजून घेण्यास मदत व्हावी या उद्देशाने राष्ट्रपतींकडून विविध क्षेत्रातील निवडक मान्यवरांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले जाते. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल देवराव निकम, केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मस्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले आहे.

उज्ज्वल देवराव निकम हे प्रसिद्ध वकील आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे. मुंबईत झालेल्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सरकारी वकील म्हणून त्यांनी काम केले होते. तसेच त्यांनी दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध सरकारी वकील म्हणून सरकारची बाजू मांडली होती. काही महिन्यांपूर्वी उज्ज्वल निकम यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय झाला होता. निवडणुकीतील पराभवानंतर उज्ज्वल निकम राजकारणातून संन्यास घेणार का असा प्रश्न विचारला जात होता. या पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम राज्यसभेसाठी नामनिर्देशित झाले आहेत.



कोण आहेत उज्ज्वल निकम ?

उज्ज्वल निकम यांचा जन्म जळगाव येथे झाला. त्यांचे वडील देवराव माधवराव निकम हे देखील बॅरिस्टर होते. त्यांनी विज्ञान विषयात बॅचलर पदवी प्राप्त केली आणि नंतर जळगाव येथील एस.एस. मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले. उज्ज्वल निकम यांनी टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांची हत्या, भाजप नेते प्रमोद महाजन यांची हत्या आणि मुंबई सामूहिक बलात्कार यासारख्या अनेक हायप्रोफाइल खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून तपास संस्थेची बाजू मांडली होती.
Comments
Add Comment

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार

गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' चित्ररथ सज्ज नवी दिल्ली: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या

आयडब्ल्यूडीसी ३.०' अंतर्देशीय जलमार्ग विकासाला नवी दिशा देणार

कोची : अंतर्देशीय जल वाहतूक (आयडब्ल्युटी) क्षेत्रातील यशावर प्रकाश टाकण्यासाठी आणि भविष्यातील दृष्टिकोन

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती नवी दिल्ली: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट

जम्मू काश्मीर : डोडा जिल्ह्यात लष्करी वाहनाला अपघात, १० जवानांचा मृत्यू

डोडा : जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लष्करी वाहन जरीत कोसळले. या अपघातात दहा जवानांचा मृत्यू झाला. तसेच अकरा

Vaishno Devi Dham : आता रात्रीही घेता येणार माता वैष्णोदेवीच्या प्राचीन गुहेचे दर्शन, वाचा नवीन वेळापत्रक

कटरा : माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी श्राईन बोर्डाने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय

चकमकीत ठार झाला एक कोटींचे बक्षीस लावलेला नक्षलवादी अनल दा, इतर १४ नक्षलवादीही ठार

रांची : गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे सापळा रचून झारखंड पोलिसांनी सारंडाच्या घनदाट जंगलात अनेक