बिहारच्या मतदारयादीत बांगलादेश, म्यानमार, नेपाळच्या नागरिकांची नावं


पाटणा : बिहारच्या विधानसभेचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून निवडणूक आयोगाने बिहारमध्ये मतदारयादीची सखोल तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत धक्कादायक माहिती हाती आली आहे. बिहारच्या मतदारयादीत बांगलादेश, म्यानमार, नेपाळच्या नागरिकांची नावं आढळली आहेत. ही नावं यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यादीतील या गंभीर चुकांसाठी निवडणूक आयोगाने ३५ बीएलओ आणि २६ सुपरवायझर यांचे वेतन स्थगित केले आहे. या अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.


निवडणूक अधिकारी बिहारमध्ये घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. ही तपासणी सुरू असतानाच बनावट कागदपत्रांच्या मदतीने अनेक विदेशी नागरिकांनी यादीत नावाचा समावेश करुन घेतल्याचे आढळले आहे. ही माहिती मिळताच निवडणूक आयोगाने मतदारयादीत घुसखोरी करणाऱ्या बांगलादेश, म्यानमार, नेपाळच्या नागरिकांची नावं यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणूक आयोगाची धडक कारवाई सुरू झाल्यापासून विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता दिसत आहे. काँग्रेसचे नेते निवडणूक आयोगाची कारवाई थांबवण्यासाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण न्यायालयीन पातळीवर त्यांना पुरते अपयश आल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोग ३० सप्टेंबर २०२५ रोजी बिहारच्या मतदारांची सुधारित यादी प्रसिद्ध करणार आहे. ही यादी प्रसिद्ध करण्याआधी बोगस मतदारांची नावं वगळण्याचे काम सुरू आहे.


बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संपणार आहे. याआधी निवडणूक घेऊन निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे. यामुळे बिहारमध्ये मतदार यादीच्या छाननीचे काम प्राधान्याने सुरू करण्यात आले आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. पण या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच मतदार यादी छाननीच्या प्रक्रियेमुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे दिसत आहे. आसाम, पद्दुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथे २०२६ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. यामुळे बिहार पाठापोठ या राज्यांमध्येही मतदार यादीच्या छाननीचे काम सुरू केले जाणार आहे.


विरोधकांनी ९ जुलै रोजी बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या कामाला विरोध म्हणून बंद पुकारला होता. हे आंदोलन झाले तरी निवडणूक आयोगाचे काम थांबलेले दिसत नाही. आयोगाच्या कामामुळे सत्ताधाऱ्यांऐवजी विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे.


Comments
Add Comment

India : भारत रशियाकडून तेलखरेदी सुरू ठेवणार

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून अमेरिकेने रशियन तेल खरेदीवर भारतावर निर्बंध लादले होते भारतावरील हे

Navapur : नवापूर एमआयडीसीत वनविभागाचा मोठा दणका; बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

नवापूर : नवापूर एमआयडीसी (MIDC) परिसरात बिबट्या या संरक्षित वन्यप्राण्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीचा

Women’s Reservation Bill : महिला आरक्षणामुळे दक्षिणी राज्यांचे कोणतेही नुकसान नाही - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दक्षिण भारतातील

Akasa Air and SpiceJet aircraft collide : दिल्ली विमानतळावर अकासा एअर आणि स्पाईसजेटच्या विमानाची टक्कर

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावर अकासा एअरचे विमान VT-YBA आणि स्पाईसजेटचे विमान VT-SLB यांची टक्कर झाली. फ्लाइटराडार24 च्या

Women’s Reservation Bill : काय आहे 'नारी शक्ती वंदन' कायदा ? जाणून घ्या महिला आरक्षणाचे संपूर्ण स्वरूप आणि फायदे

तीन प्रमुख घटनादुरुस्ती विधेयके सादर नवी दिल्ली : आज, १६ एप्रिल २०२६ रोजी, केंद्र सरकारने महिला आरक्षणाच्या

Nari Shakti Vandan : ही मोदींची गॅरंटी... महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींचे विरोधकांना भर सभागृहात खडेबोल

नवी दिल्ली : सध्या संसदेच्या विशेष अधिवेशनात 'नारी शक्ती वंदन अधिनियमा'वर (महिला आरक्षण विधेयक) ऐतिहासिक चर्चा