बिहारच्या मतदारयादीत बांगलादेश, म्यानमार, नेपाळच्या नागरिकांची नावं


पाटणा : बिहारच्या विधानसभेचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून निवडणूक आयोगाने बिहारमध्ये मतदारयादीची सखोल तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत धक्कादायक माहिती हाती आली आहे. बिहारच्या मतदारयादीत बांगलादेश, म्यानमार, नेपाळच्या नागरिकांची नावं आढळली आहेत. ही नावं यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यादीतील या गंभीर चुकांसाठी निवडणूक आयोगाने ३५ बीएलओ आणि २६ सुपरवायझर यांचे वेतन स्थगित केले आहे. या अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.


निवडणूक अधिकारी बिहारमध्ये घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. ही तपासणी सुरू असतानाच बनावट कागदपत्रांच्या मदतीने अनेक विदेशी नागरिकांनी यादीत नावाचा समावेश करुन घेतल्याचे आढळले आहे. ही माहिती मिळताच निवडणूक आयोगाने मतदारयादीत घुसखोरी करणाऱ्या बांगलादेश, म्यानमार, नेपाळच्या नागरिकांची नावं यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणूक आयोगाची धडक कारवाई सुरू झाल्यापासून विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता दिसत आहे. काँग्रेसचे नेते निवडणूक आयोगाची कारवाई थांबवण्यासाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण न्यायालयीन पातळीवर त्यांना पुरते अपयश आल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोग ३० सप्टेंबर २०२५ रोजी बिहारच्या मतदारांची सुधारित यादी प्रसिद्ध करणार आहे. ही यादी प्रसिद्ध करण्याआधी बोगस मतदारांची नावं वगळण्याचे काम सुरू आहे.


बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संपणार आहे. याआधी निवडणूक घेऊन निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे. यामुळे बिहारमध्ये मतदार यादीच्या छाननीचे काम प्राधान्याने सुरू करण्यात आले आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. पण या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच मतदार यादी छाननीच्या प्रक्रियेमुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे दिसत आहे. आसाम, पद्दुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथे २०२६ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. यामुळे बिहार पाठापोठ या राज्यांमध्येही मतदार यादीच्या छाननीचे काम सुरू केले जाणार आहे.


विरोधकांनी ९ जुलै रोजी बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या कामाला विरोध म्हणून बंद पुकारला होता. हे आंदोलन झाले तरी निवडणूक आयोगाचे काम थांबलेले दिसत नाही. आयोगाच्या कामामुळे सत्ताधाऱ्यांऐवजी विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे.


Comments
Add Comment

Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेचा भूकंप; विशाखापट्टणमपर्यंत जाणवले धक्के

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून दूर बंगालच्या उपसागरात रविवारी पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेचा सौम्य

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत

PM Narendra Modi : 'ही घटना अत्यंत दुःखद...' व्हिएतनाम बोट दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला तीव्र शोक

व्हिएतनाम : व्हिएतनाममधील 'फू क्वोक' बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याची हृदयद्रावक घटना समोर

Vietnam Boat Accident : मोठी बातमी! व्हिएतनाम बोट दुर्घटनेत २१ जणांना वाचवण्यात यश, १५ भारतीयांचा मृत्यू; दूतावासाकडून तातडीची मदत

व्हिएतनाम : व्हिएतनाममधील (Vietnam boat accident)अतिशय लोकप्रिय अशा 'फू क्वोक' (Phu Quoc) बेटाजवळ पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांवर