इराणने ५ लाखांहून अधिक अफगाणी नागरिकांना काढले देशाबाहेर

तेहरान : इस्रायल विरुद्धच्या युद्धानंतर इराणमधील परिस्थिती सुधारताना दिसत आहे. इराण युद्धात झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच आता इराणने अफगाणी नागरिकांवर कठोर कारवाई केल्याचे समोर आले आहे. गेल्या १६ दिवसांमध्ये ५ लाखांहून अधिक अफगाणी नागरिकांना इराणमधून हाकलून देण्यात आले आहे. हे या दशकातील जबरदस्तीने केलेले सर्वात मोठे विस्थापन मानले जात आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, इराणने २४ जून ते ९ जुलै या कालावधीत ५ लाख ८ हजारांहून अधिक अफगाण नागरिकांना देशाबाहेर काढले आहे. काही दिवसांपूर्वी इराणमधून एका दिवसात 51 हजार अफगाणी लोकांना हाकलून लावण्यात आले होते. इराणने कागदपत्रे नसलेल्या अफगाण नागरिकांनी देश सोडावा असे आवाहनही केले होते.


इराणने याआधीही देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या अफगाण नागिकांना देश सोडण्यास सांगितले होते. हे अफगाणी लोक इराणमध्ये कमी वेतनावर कामगार म्हणून काम करतात. अफगाणी लोक तेहरान, मशहाद आणि इस्फहान या शहरांमध्ये बांधकाम कामगार, साफसफाई कामगार म्हणून आणि शेतात काम करतात. मात्र आता या कामगारांना मायदेशात परतावे लागले आहे. अफगाणिस्तानमध्ये आधीच बेराजगारी आहे, त्यामुळे आता या नागरिकांना पोट भरण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१

बांगलादेशात रक्तरंजित राजकीय संघर्ष

आणखी एका हसीनाविरोधी नेत्याला घरात घुसून घातल्या गोळ्या बांग्लादेश : बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आणखी एका

बांगलादेशमध्ये उस्मान हादी पाठोपाठ मोहम्मद मोतालेब शिकदारची हत्या

ढाका : बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी

दक्षिण आफ्रिकेत गोळीबारात १० जण ठार

जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियामध्ये बाँडी बीचवर बेछूट गोळीबार करण्याची घटना ताजी असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतील

बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने