इराणने ५ लाखांहून अधिक अफगाणी नागरिकांना काढले देशाबाहेर

तेहरान : इस्रायल विरुद्धच्या युद्धानंतर इराणमधील परिस्थिती सुधारताना दिसत आहे. इराण युद्धात झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच आता इराणने अफगाणी नागरिकांवर कठोर कारवाई केल्याचे समोर आले आहे. गेल्या १६ दिवसांमध्ये ५ लाखांहून अधिक अफगाणी नागरिकांना इराणमधून हाकलून देण्यात आले आहे. हे या दशकातील जबरदस्तीने केलेले सर्वात मोठे विस्थापन मानले जात आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, इराणने २४ जून ते ९ जुलै या कालावधीत ५ लाख ८ हजारांहून अधिक अफगाण नागरिकांना देशाबाहेर काढले आहे. काही दिवसांपूर्वी इराणमधून एका दिवसात 51 हजार अफगाणी लोकांना हाकलून लावण्यात आले होते. इराणने कागदपत्रे नसलेल्या अफगाण नागरिकांनी देश सोडावा असे आवाहनही केले होते.


इराणने याआधीही देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या अफगाण नागिकांना देश सोडण्यास सांगितले होते. हे अफगाणी लोक इराणमध्ये कमी वेतनावर कामगार म्हणून काम करतात. अफगाणी लोक तेहरान, मशहाद आणि इस्फहान या शहरांमध्ये बांधकाम कामगार, साफसफाई कामगार म्हणून आणि शेतात काम करतात. मात्र आता या कामगारांना मायदेशात परतावे लागले आहे. अफगाणिस्तानमध्ये आधीच बेराजगारी आहे, त्यामुळे आता या नागरिकांना पोट भरण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल