लॉर्ड्सवर राहुलची झुंझार शतकी खेळी; पंतचे अर्धशतक, जडेजा-रेड्डी स्थिरावले

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिला डाव भारतीय फलंदाजांनी गाजवला. भारतीय फलंदाज के. एल राहुलने ऐतिहासिक अशा लॉर्ड्स मैदानावर झुंझार शतकी खेळी खेळत फलंदाजी पुन्हा सिद्ध केली. त्याला यष्टीरक्षक रिषभ पंतनेही चांगली साथ देत अर्धशतकी खेळी केली.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवसाचा डाव सुरु झाला. भारताने आपला पहिला डाव तीन बाद १४५ धावांवर पुन्हा सुरू केला. के. एल राहुल आणि ऋषभ पंत मैदानावर होते. हळूहळू धावसंख्या पुढे नेत ऋषभ पंत आणि के.एल राहुल यांच्यातील चौथ्या विकेटसाठीची भागिदारी ७० हून अधिक धावांवर पोहोचली होती. पहिल्या डावात भारताची धावसंख्या १७० धावांच्या पुढे गेली होती. त्यानंतर भारताने २०० धावांचा टप्पा पार केला.



भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. पंत आणि के.एल राहुल यांनी १०९ धावांची भागीदारी केली आणि पहिल्या डावात भारताची धावसंख्या २०० धावांच्या पुढे नेली. मात्र ऋषभ पंत अर्धशतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. धावा चोरण्याचा प्रयत्न करताना पंत धावबाद झाला आणि त्याची विकेट गेली. पंतने ११२ चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांसह ७४ धावा कुटल्या. पंत आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी १४१ धावांची महत्वाची भागीदारी केली. उपहारापर्यंत भारताची धावसंख्या २४८-४ अशी होती. पहिल्या सत्रात भारताने १०३ धावा केल्या आणि फक्त एक विकेट गमावली. सुरुवातीच्या सत्रात भारताने ४.५८ च्या धावगतीने फलंदाजी केली. केएल राहुल ९८ धावांसह मैदानावर खेळत होता आणि शतकाच्या जवळ पोहोचला होता.
पंत बाद झाल्यावर राहुलला साथ देण्यासाठी अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा मैदानावर आला होता. जडेजाच्या साथीने राहुलने १७६ चेंडू खेळत आपले शतक साजरे केले. लॉर्ड्स मैदानावरील राहुलचे हे दुसरे शतक होते.


पहिल्या डावात भारताची धावसंख्या चार बाद २५४ वर पोचली होत. भारत अजूनही इंग्लंडपेक्षा १३३ धावांनी मागे होता. शतकी खेळी केल्यावर राहुल बाद झाला. २५४ धावसंख्यवर भारताने पाचवा गडी गमावला. शोएब बशीरने त्याला बाद केले. राहुल बाद झाल्यानंतर, नितीश रेड्डीसह जडेजाने संघाची सूत्रे हाती घेतली. जडेजा शानदार फलंदाजी करत होता, त्यामुळे भारताचा पहिला डाव २८० धावांच्या पुढे गेला होता. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाने ३०० धावा पूर्ण केल्या होत्या. जडेजा आणि नितीश रेड्डी यांच्यात चांगली भागीदारी निर्माण झाली होती. ते दोघेही मैदानावर स्थिरावले होते. भारताला इंग्लंडची धावसंख्या पार करण्यासाठी अजूनही ८७ धावांनी गरज होती.
चौकट



इंग्लंडच्या भूमीवर पंतने रचला महारेकॉर्ड


पंत हा कसोटी क्रिकेटमध्येही आपल्या शैलीतच खेळत असतो. पंत गोलंदाजांना आपल्यावर दबाव टाकायला देत नाही. पंतने या सामन्यातही आपल्या शैलीतच जोरदार फटकेबाजी केली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पंत ४९ धावांवर होता, तेव्हाही त्याने इंग्लंडच्या गोलंदाजीचे दडपण आपल्यावर घेतले नाही. कारण त्यावेळी पंतने धडाकेबाज फटकेबाजी करत षटकार मारला आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने या पहिल्या डावात संयतपणे फलंदाजी केली. पण या डावात भारताच्या एकाही फलंदाजाला षटकार मारता आला नाही. पण पंतने मात्र या सामन्यात दोन षटकार लगावले. भारताकडून षटकार लगावणारा तो एकमेव खेळाडू ठरला. त्याचबरोबर पंतने या सामन्यात ८८ कसोटी षटकार पूर्ण करत रोहित शर्माशी बरोबरी केली आहे. पंतने रोहितपेक्षा फार कमी सामन्यांमध्ये हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.



वेंगसरकरांच्या क्लबमध्ये राहुलची एन्ट्री


के.एल राहुलने ठोकलेले शतक हे लॉर्ड्सच्या मैदानातील त्याचे दुसरे शतक होते. या मैदानात सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकरसारख्या महान फलंदाजांना एकदाही शतक झळकावता आले नाही. पण राहुलने या लॉर्ड्सच्या मैदानात दुसरे शतक झळकावले आणि तो दिलीप वेंगसरकर यांच्या क्लबमध्ये जाऊन बसला. गेल्या २९ वर्षांत सचिन तेंडुलकरपासून ते थेट विराट कोहलीपर्यंत बरेच नामांकित खेळाडू खेळले. पण जे गेल्या २९ वर्षांत भारताच्या कोणत्याही खेळाडूला जमले नाही ते राहुलने केले आहे.

Comments
Add Comment

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी